शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

गारपीटग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 22:38 IST

ऑनलाईन लोकमतदेवळी : शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याकरिता कृषी विभागाने मदत कक्ष स्थापन करावा. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे त्वरित पंचनामे पूर्ण करावेत. प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून मदतीसाठी पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाहीचे निर्देशही खा. रामदास तडस यांनी दिले.जिल्हातील सर्व तालुक्यांत अनेक गावांना रविवारी आणि सोमवारी गारपिटीचा तडाखा बसला. ...

ठळक मुद्देरामदास तडस : देवळी व आर्वी तालुक्यातील गारपीटग्रस्त भागाची पाहणी

ऑनलाईन लोकमतदेवळी : शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याकरिता कृषी विभागाने मदत कक्ष स्थापन करावा. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे त्वरित पंचनामे पूर्ण करावेत. प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून मदतीसाठी पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाहीचे निर्देशही खा. रामदास तडस यांनी दिले.जिल्हातील सर्व तालुक्यांत अनेक गावांना रविवारी आणि सोमवारी गारपिटीचा तडाखा बसला. रबी व खरीप तसेच फळबागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानीची पाहणी मंगळवारी सकाळी खा. रामदास तडस यांनी केली. यावेळी देवळी तालुक्यातील नाचणगाव, विजयगोपाल, आपटी, कोळोणा (घोडेगाव), शेंदरी, इंझाळा, तळणी, शिरपूर, कोटेश्वर या गावांमध्ये प्रत्यक्ष खा. तडस यांच्यासोबत जि.प. कृषी सभापती मुकेश भिसे, दीपक फुलकरी, मिलिंद भेंडे, युवराज खडतकर, शंकर उईके, स्वप्नील खडसे, तलाठी राऊत , गजानन राऊत, नितीन होले, गजानन तिवरे, भीमराव नागपुरे, ज्ञानेश्वर टिपले, प्रवीण लोखंडे यांनी भेट दिली.रविवारी दुपारी व सोमवारी पहाटे तथा रात्री पावसाने चांगलाच कहर केला. देवळी तालुक्यातील पुलगाव, नाचणगाव, विजयगोपाल, आपटी, कोळोणा (घोडेगाव), शेंदरी, इंझाळा, पिंपळगाव, वडाळा, सोरटा, सालफळ, मार्डा, तांभा, निमगव्हाण, मुरदगाव, सोनेगाव, दिघी, अडेगाव, बोपापूर तर आर्वी तालुक्यात खरांगणा, मोरांगणा, पिंपळखुटा, विरूळ, रसुलाबाद, रोहणा यासह अन्य गावांतही मोठ्या प्रमाणात गारपीट झाले. गारपीट व वाऱ्यामुळे गहू पूरता झोपला तर चण्याच्या घाट्या फुटल्या. यामुळे शेतकऱ्यांचे चांगलेच नुकसान झाले. शेतात पिकांवर गारांचे आच्छादन असल्याने पिकेक नेस्तनाबूत झालीत. या गारपिटीमुळे शेतकरी पूरता अडचणीत आला आहे. पावसामुळे शेतातील कापूस ओला झाला. शिवाय फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.याप्रसंगी खा. तडस यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना दूरध्वनीवरून जिल्ह्यातील नुकसानग्रस्त गावातील नुकसानाचे त्वरित पंचनामे करावे. शेतकऱ्यांना प्राथमिक मदत मिळवून द्यावी, अशा सूचना दिल्या. शिवाय तहसीलदार, कृषी अधिकारी, कृषी सहायक व तलाठी यांना त्वरित पंचनामे करण्याचे आदेशही देण्यात आलेत.आठ गावांत प्राथमिक सर्वेक्षणमंडळ अधिकारी, तलाठी व कृषी सहायकांनी मंगळवारी शेंदरी, सोनोरा, कांदेगाव, घोडेगाव, नाचणगाव, कोळोणा, पुलगाव, दहेगाव येथील नुकसानग्रस्त भागाचे प्राथमिक सर्वेक्षण करून अहवाल सादर केला आहे.

टॅग्स :Rainपाऊस