शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
3
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
4
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
5
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
6
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
7
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
8
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
9
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
10
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
11
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
12
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
13
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
14
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
15
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
16
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
17
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
18
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
19
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
20
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

गारपीटग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 22:38 IST

ऑनलाईन लोकमतदेवळी : शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याकरिता कृषी विभागाने मदत कक्ष स्थापन करावा. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे त्वरित पंचनामे पूर्ण करावेत. प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून मदतीसाठी पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाहीचे निर्देशही खा. रामदास तडस यांनी दिले.जिल्हातील सर्व तालुक्यांत अनेक गावांना रविवारी आणि सोमवारी गारपिटीचा तडाखा बसला. ...

ठळक मुद्देरामदास तडस : देवळी व आर्वी तालुक्यातील गारपीटग्रस्त भागाची पाहणी

ऑनलाईन लोकमतदेवळी : शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याकरिता कृषी विभागाने मदत कक्ष स्थापन करावा. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे त्वरित पंचनामे पूर्ण करावेत. प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून मदतीसाठी पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाहीचे निर्देशही खा. रामदास तडस यांनी दिले.जिल्हातील सर्व तालुक्यांत अनेक गावांना रविवारी आणि सोमवारी गारपिटीचा तडाखा बसला. रबी व खरीप तसेच फळबागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानीची पाहणी मंगळवारी सकाळी खा. रामदास तडस यांनी केली. यावेळी देवळी तालुक्यातील नाचणगाव, विजयगोपाल, आपटी, कोळोणा (घोडेगाव), शेंदरी, इंझाळा, तळणी, शिरपूर, कोटेश्वर या गावांमध्ये प्रत्यक्ष खा. तडस यांच्यासोबत जि.प. कृषी सभापती मुकेश भिसे, दीपक फुलकरी, मिलिंद भेंडे, युवराज खडतकर, शंकर उईके, स्वप्नील खडसे, तलाठी राऊत , गजानन राऊत, नितीन होले, गजानन तिवरे, भीमराव नागपुरे, ज्ञानेश्वर टिपले, प्रवीण लोखंडे यांनी भेट दिली.रविवारी दुपारी व सोमवारी पहाटे तथा रात्री पावसाने चांगलाच कहर केला. देवळी तालुक्यातील पुलगाव, नाचणगाव, विजयगोपाल, आपटी, कोळोणा (घोडेगाव), शेंदरी, इंझाळा, पिंपळगाव, वडाळा, सोरटा, सालफळ, मार्डा, तांभा, निमगव्हाण, मुरदगाव, सोनेगाव, दिघी, अडेगाव, बोपापूर तर आर्वी तालुक्यात खरांगणा, मोरांगणा, पिंपळखुटा, विरूळ, रसुलाबाद, रोहणा यासह अन्य गावांतही मोठ्या प्रमाणात गारपीट झाले. गारपीट व वाऱ्यामुळे गहू पूरता झोपला तर चण्याच्या घाट्या फुटल्या. यामुळे शेतकऱ्यांचे चांगलेच नुकसान झाले. शेतात पिकांवर गारांचे आच्छादन असल्याने पिकेक नेस्तनाबूत झालीत. या गारपिटीमुळे शेतकरी पूरता अडचणीत आला आहे. पावसामुळे शेतातील कापूस ओला झाला. शिवाय फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.याप्रसंगी खा. तडस यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना दूरध्वनीवरून जिल्ह्यातील नुकसानग्रस्त गावातील नुकसानाचे त्वरित पंचनामे करावे. शेतकऱ्यांना प्राथमिक मदत मिळवून द्यावी, अशा सूचना दिल्या. शिवाय तहसीलदार, कृषी अधिकारी, कृषी सहायक व तलाठी यांना त्वरित पंचनामे करण्याचे आदेशही देण्यात आलेत.आठ गावांत प्राथमिक सर्वेक्षणमंडळ अधिकारी, तलाठी व कृषी सहायकांनी मंगळवारी शेंदरी, सोनोरा, कांदेगाव, घोडेगाव, नाचणगाव, कोळोणा, पुलगाव, दहेगाव येथील नुकसानग्रस्त भागाचे प्राथमिक सर्वेक्षण करून अहवाल सादर केला आहे.

टॅग्स :Rainपाऊस