शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

गारपिटीचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 22:47 IST

एक आठवड्यापासून शेतकऱ्यांमध्ये धडकी भरविणारा पाऊस आणि गारपिटीने अखेर जिल्ह्याला झोडपून काढले. रविवारी जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पावसाने हजेरी लावली. कुठेही गारपिटीचे वा मुसळधार पावसाचे वृत्त नव्हते; पण सोमवारी सायंकाळनंतर सर्वत्र मुसळधार पावसासह गारपीट झाले.

ठळक मुद्देगारपिटीमुळे भाजीपाला नष्ट, झाडही कोसळले

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : एक आठवड्यापासून शेतकऱ्यांमध्ये धडकी भरविणारा पाऊस आणि गारपिटीने अखेर जिल्ह्याला झोडपून काढले. रविवारी जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पावसाने हजेरी लावली. कुठेही गारपिटीचे वा मुसळधार पावसाचे वृत्त नव्हते; पण सोमवारी सायंकाळनंतर सर्वत्र मुसळधार पावसासह गारपीट झाले. परिणामी, शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकरी पूरता गारद झाला आहे. खासदारांनी नुकसानाची पाहणी केली असली तरी शासकीय सुटी असल्याने प्रशासन निद्रीस्तच दिसून आले.काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने शेतकरी धास्तावले होते. काहींनी दक्षता घेत तुरीच्या पेट्या झाकून ठेवल्या; पण शेतातील पिकांचे रक्षण कसे करावे, हा प्रश्नच होता. रविवारी आलेल्या पावसामुळे फारसे नुकसान झाले नव्हते; पण सोमवारी आलेल्या मुसळधार पावसामुळे कापून ढीग मारून ठेवलेल्या तुरीसह शेतातील पिकांचीही धुळधान झाली. खरांगणा (मो.) परिसरात सोमवारी दुपारच्या सुमारास मुसळधार पावसाचे आगमन झाले. यानंतर देवळी-पुलगाव तालुक्यात मुसळधार पावसासह गारपिटीने धुमाकूळ घातला. लिंबाच्या आकाराची गार पडल्याने शेतातील कुठलेही पीक वाचू शकले नाही. गहू जमिनीवर लोळला असून चण्याचेही प्रचंड नुकसान झाले. गारपिटीमुळे गव्हाचे पीक नेस्तनाबूतच झाले असून उत्पादन झाले तरी त्या गव्हाला कुणी विचारणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. हरभरा जमिनीवर आडवा झाल्याने तो वाळू देत सवंगणी करणे याशिवाय पर्याय राहिलेला नाही. मुसळधार पावसामुळे शेतात गंजी लावून ठेवलेल्या तुरीही हाती येणार की नाही, ही शंकाच आहे. सर्वत्र पाण्याचे लोट गेल्याने झाकलेल्या ढीगातील तुरीचे उत्पन्नही कमी होणार असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.सोमवारी देवळी, आर्वी तालुक्यात झालेल्या गारपिटीमुळे जमीन शुभ्राच्छादित झाली होती. वर्धेतील रात्री १०.३० वाजताच्या सुमारास गारपीट झाले. जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या गारपिटीमुळे शेतकºयांसह सामान्य नागरिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेकांच्या घरावरील कवेलू फुटलेत. अनेकांच्या घरांची पडझड झाल्याचेही सांगण्यात आले आहे. असे असले तरी मंगळवारी प्रशासनाकडे किती व काय नुकसान झाले, याबाबत आकडेवारी नसल्याने आश्चर्य व्यक्त होत होते.गारपिटीमुळे भाजीपाला नष्ट, झाडही कोसळलेमुसळधार पाऊस आणि तुफान गारपिटीमुळे विरूळ (आकाजी) परिसरात भाजीपाला पिके पूर्णत: धुळीस मिळालीत. पालक, मेथीची शेती गारपिटीमुळे नष्ट झाल्याचे दिसून येत होते.शिवाय दाणापूर, ब्राह्मणवाडा, खैरवाडा येथे गारपिटीमुळे रबी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भाजीपाला पिके जमिनीवर लोळली तर मोठी झाडेही उन्मळून पडल्याचे दिसून येत होते.रबी पिकांना फटकादारोडा - सोमवारी सायंकाळी ६ ते ७ वाजताच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे चना, गहू, कापूस, तूर या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वादळामुळे घराची छप्परे उडाली. झाडे तुटून पडली. दारोडा येथील मोटघरे यांच्या घराचे टिनाचे छप्पर गावातील रस्त्यावर येऊन पडले. यात कुठलीही प्राणहाणी झाली नाही. पशू, पक्षी मृत झाल्याचे दिसून आले. गारपीट व वादळ १० ते १५ मिनिटपर्यंत सुरू असल्याने फारसे नुकसान झाले नाही; पण शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. पिके नष्ट झाल्याने शेतकरी चिंतातूर दिसून येतो. अनेक गावांना वादळी पावसाचा फटका बसला असून पिकांचे नुकसान झाले.वादळी पाऊस व गारपीटसेलगाव (लवणे) - दिवसभर ढगाळ वातावरणानंतर सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास परिसरात वादळी पाऊस व बोराच्या आकाराचे गारपीट झाले. यामुळे संत्रा, गहू, हरभरा पिकांना फटका बसला आहे. वादळामुळे शेतात झाकून असलेल्या तुरीच्या गंजीवरील ताडपत्र्या उडाल्याने संपूर्ण ढीग ओले झाले. वादळामुळे अनेक घरांवरील टिनपत्रे उडालीत. निसर्गाच्या प्रकोपामुळे पुन्हा एकदा शेतकरी अडचणीत आला आहे.पंचनामे करीत तात्काळ मदत द्या -रणजीत कांबळेराज्याच्या अनेक भागासह जिल्ह्यात वादळ व गारपिटीमुळे नुकसान झाले. या नुकसानाचे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना त्वरित भरपाई द्यावी. अद्याप अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही, किमान बाधित शेतकऱ्यांना त्वरित मदत तरी जाहीर करावी, अशी मागणी आ. रणजीत कांबळे यांनी केली आहे. विदर्भ, मराठवाडा व खान्देशात अनेक ठिकाणी वादळ व गारपिटीने थैमान घातल्याच्या तक्रारी आहेत. यात तिघांचा बळी गेला असून कांदा, हरभरा, गहू आदी रबी पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी उभी पिके बाधित झाली असून कापणी केलेल्या पिकांचेही नुकसान झाले आहे. वर्धा जिल्ह्यातही वादळी वाऱ्याने नुकसान झाल्याचे चित्र आहे. या नुकसानाची त्वरित मोका पाहणी करण्याची मागणी आम्ही केली होती. शासनाने आदेशही दिले आहेत. नुकसान झालेली घरे, शेती, पशूधन आदींचा आढावा घेत भरीव मदत देऊन दिलासा द्यावा, अशी मागणीही आ. रणजीत कांबळे यांनी केली आहे.

टॅग्स :Rainपाऊस