शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
4
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
5
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
6
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
7
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
8
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
9
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
10
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
11
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
12
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
13
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
14
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
15
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
16
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
17
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
18
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
19
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
20
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली

गारपिटीचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 22:47 IST

एक आठवड्यापासून शेतकऱ्यांमध्ये धडकी भरविणारा पाऊस आणि गारपिटीने अखेर जिल्ह्याला झोडपून काढले. रविवारी जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पावसाने हजेरी लावली. कुठेही गारपिटीचे वा मुसळधार पावसाचे वृत्त नव्हते; पण सोमवारी सायंकाळनंतर सर्वत्र मुसळधार पावसासह गारपीट झाले.

ठळक मुद्देगारपिटीमुळे भाजीपाला नष्ट, झाडही कोसळले

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : एक आठवड्यापासून शेतकऱ्यांमध्ये धडकी भरविणारा पाऊस आणि गारपिटीने अखेर जिल्ह्याला झोडपून काढले. रविवारी जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पावसाने हजेरी लावली. कुठेही गारपिटीचे वा मुसळधार पावसाचे वृत्त नव्हते; पण सोमवारी सायंकाळनंतर सर्वत्र मुसळधार पावसासह गारपीट झाले. परिणामी, शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकरी पूरता गारद झाला आहे. खासदारांनी नुकसानाची पाहणी केली असली तरी शासकीय सुटी असल्याने प्रशासन निद्रीस्तच दिसून आले.काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने शेतकरी धास्तावले होते. काहींनी दक्षता घेत तुरीच्या पेट्या झाकून ठेवल्या; पण शेतातील पिकांचे रक्षण कसे करावे, हा प्रश्नच होता. रविवारी आलेल्या पावसामुळे फारसे नुकसान झाले नव्हते; पण सोमवारी आलेल्या मुसळधार पावसामुळे कापून ढीग मारून ठेवलेल्या तुरीसह शेतातील पिकांचीही धुळधान झाली. खरांगणा (मो.) परिसरात सोमवारी दुपारच्या सुमारास मुसळधार पावसाचे आगमन झाले. यानंतर देवळी-पुलगाव तालुक्यात मुसळधार पावसासह गारपिटीने धुमाकूळ घातला. लिंबाच्या आकाराची गार पडल्याने शेतातील कुठलेही पीक वाचू शकले नाही. गहू जमिनीवर लोळला असून चण्याचेही प्रचंड नुकसान झाले. गारपिटीमुळे गव्हाचे पीक नेस्तनाबूतच झाले असून उत्पादन झाले तरी त्या गव्हाला कुणी विचारणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. हरभरा जमिनीवर आडवा झाल्याने तो वाळू देत सवंगणी करणे याशिवाय पर्याय राहिलेला नाही. मुसळधार पावसामुळे शेतात गंजी लावून ठेवलेल्या तुरीही हाती येणार की नाही, ही शंकाच आहे. सर्वत्र पाण्याचे लोट गेल्याने झाकलेल्या ढीगातील तुरीचे उत्पन्नही कमी होणार असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.सोमवारी देवळी, आर्वी तालुक्यात झालेल्या गारपिटीमुळे जमीन शुभ्राच्छादित झाली होती. वर्धेतील रात्री १०.३० वाजताच्या सुमारास गारपीट झाले. जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या गारपिटीमुळे शेतकºयांसह सामान्य नागरिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेकांच्या घरावरील कवेलू फुटलेत. अनेकांच्या घरांची पडझड झाल्याचेही सांगण्यात आले आहे. असे असले तरी मंगळवारी प्रशासनाकडे किती व काय नुकसान झाले, याबाबत आकडेवारी नसल्याने आश्चर्य व्यक्त होत होते.गारपिटीमुळे भाजीपाला नष्ट, झाडही कोसळलेमुसळधार पाऊस आणि तुफान गारपिटीमुळे विरूळ (आकाजी) परिसरात भाजीपाला पिके पूर्णत: धुळीस मिळालीत. पालक, मेथीची शेती गारपिटीमुळे नष्ट झाल्याचे दिसून येत होते.शिवाय दाणापूर, ब्राह्मणवाडा, खैरवाडा येथे गारपिटीमुळे रबी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भाजीपाला पिके जमिनीवर लोळली तर मोठी झाडेही उन्मळून पडल्याचे दिसून येत होते.रबी पिकांना फटकादारोडा - सोमवारी सायंकाळी ६ ते ७ वाजताच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे चना, गहू, कापूस, तूर या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वादळामुळे घराची छप्परे उडाली. झाडे तुटून पडली. दारोडा येथील मोटघरे यांच्या घराचे टिनाचे छप्पर गावातील रस्त्यावर येऊन पडले. यात कुठलीही प्राणहाणी झाली नाही. पशू, पक्षी मृत झाल्याचे दिसून आले. गारपीट व वादळ १० ते १५ मिनिटपर्यंत सुरू असल्याने फारसे नुकसान झाले नाही; पण शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. पिके नष्ट झाल्याने शेतकरी चिंतातूर दिसून येतो. अनेक गावांना वादळी पावसाचा फटका बसला असून पिकांचे नुकसान झाले.वादळी पाऊस व गारपीटसेलगाव (लवणे) - दिवसभर ढगाळ वातावरणानंतर सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास परिसरात वादळी पाऊस व बोराच्या आकाराचे गारपीट झाले. यामुळे संत्रा, गहू, हरभरा पिकांना फटका बसला आहे. वादळामुळे शेतात झाकून असलेल्या तुरीच्या गंजीवरील ताडपत्र्या उडाल्याने संपूर्ण ढीग ओले झाले. वादळामुळे अनेक घरांवरील टिनपत्रे उडालीत. निसर्गाच्या प्रकोपामुळे पुन्हा एकदा शेतकरी अडचणीत आला आहे.पंचनामे करीत तात्काळ मदत द्या -रणजीत कांबळेराज्याच्या अनेक भागासह जिल्ह्यात वादळ व गारपिटीमुळे नुकसान झाले. या नुकसानाचे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना त्वरित भरपाई द्यावी. अद्याप अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही, किमान बाधित शेतकऱ्यांना त्वरित मदत तरी जाहीर करावी, अशी मागणी आ. रणजीत कांबळे यांनी केली आहे. विदर्भ, मराठवाडा व खान्देशात अनेक ठिकाणी वादळ व गारपिटीने थैमान घातल्याच्या तक्रारी आहेत. यात तिघांचा बळी गेला असून कांदा, हरभरा, गहू आदी रबी पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी उभी पिके बाधित झाली असून कापणी केलेल्या पिकांचेही नुकसान झाले आहे. वर्धा जिल्ह्यातही वादळी वाऱ्याने नुकसान झाल्याचे चित्र आहे. या नुकसानाची त्वरित मोका पाहणी करण्याची मागणी आम्ही केली होती. शासनाने आदेशही दिले आहेत. नुकसान झालेली घरे, शेती, पशूधन आदींचा आढावा घेत भरीव मदत देऊन दिलासा द्यावा, अशी मागणीही आ. रणजीत कांबळे यांनी केली आहे.

टॅग्स :Rainपाऊस