शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

गुरुजी तुम्ही सुद्धा; जिल्ह्यात 16 शिक्षक आढळले बोगस?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2022 05:00 IST

शासनाच्या आदेशानुसार शिक्षण विभागाने प्राथमिकच्या दहा तर माध्यमिकच्या चार अशा एकूण १४ शिक्षकांचे प्रमाणपत्र पुण्याला पडताळणीकरिता पाठविले होते. पडताळणीकरिता प्रमाणपत्र पाठविल्याने अनेक शिक्षकांची धडधड वाढली आहे. आता शासनाने बोगस शिक्षकांची यादी जाहीर केली असून वर्धा जिल्ह्यात १६ शिक्षक बोगस असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता हे शिक्षक कोणत्या वर्षातील असेल? असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शिक्षकांचा टीईटी परीक्षेतील प्रमाणपत्र घोटाळा उघड झाल्यानंतर पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला २०१३ ते २०१९ या कालावधीतील सर्व प्रमाणपत्रे जमा करण्यास सांगितले होते. त्यानुसार शिक्षण विभागाने जिल्ह्यातील १४ शिक्षकांची प्रमाणपत्रे पुण्याला पडताळणीकरिता पाठविली होती. परंतु शासनाकडून जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यामध्ये १६ शिक्षक बोगस असल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे या आकडेवारीवरून संभ्रम निर्माण झाला आहे. जिल्ह्यामध्ये १३ फेब्रुवारी २०१३ पहिली ते पाचवीपर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळेत १४ तर खासगी शाळेमध्ये ५ शिक्षकांची नियुक्ती झाली आहे. यातील दहा शिक्षकांची नियुक्ती टीईटीच्या माध्यमातून झाली. तसेच माध्यमिक शाळांमध्ये ४ शिक्षकांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशानुसार शिक्षण विभागाने प्राथमिकच्या दहा तर माध्यमिकच्या चार अशा एकूण १४ शिक्षकांचे प्रमाणपत्र पुण्याला पडताळणीकरिता पाठविले होते. पडताळणीकरिता प्रमाणपत्र पाठविल्याने अनेक शिक्षकांची धडधड वाढली आहे. आता शासनाने बोगस शिक्षकांची यादी जाहीर केली असून वर्धा जिल्ह्यात १६ शिक्षक बोगस असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता हे शिक्षक कोणत्या वर्षातील असेल? असाही प्रश्न निर्माण झाला आहे.पडताळणीसाठी पुण्याला पाठविले होते १४ शिक्षकांची प्रमाणपत्रे- २०१२ पासून शिक्षक भरती प्रक्रिया बंद होती. तरीही प्राथमिक व उच्च प्राथमिक वर्गावर काही शिक्षकांच्या जिल्ह्यात किंवा जिल्ह्याबाहेरही नियुक्त्या झाल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या. पण, आता टीईटी परीक्षेतील बोगसपणाच चव्हाट्यावर आल्याने अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. जिल्ह्यात २०१३ ते २०१९ या कालावधीमध्ये टीईटीव्दारे १४ शिक्षकांची नियुक्ती झाल्याची माहिती पुढे आली आहे. यामध्ये प्राथमिकचे दहा तर माध्यमिकचे चार शिक्षक आहे. त्यामुळे या १४ शिक्षकांचे प्रमाणपत्र पुण्याला पडताळणीकरिता पाठविले होते.  आता त्या बोगस शिक्षकांची यादी तयार झाली असून आता नावांची प्रतीक्षा आहे. 

बोगस शिक्षकांमध्ये जिल्हा शेवटून पाचवापैशाच्या जोरावर टीईटीचे बोगस प्रमाणपत्र मिळवून नोकरी मिळविणाऱ्या गुरुजींचा बोगसगिरीचा बुरखा फाटला आहे. शिक्षण विभागाने प्रमाणपत्रांची पडताळणी करून बोगस शिक्षकांची यादी तयार केली आहे. या यादीनुसार जिल्ह्यात १६ शिक्षक बोगस असून आपल्या जिल्ह्याचा क्रमांक शेवटून पाचवा आहे. 

जि.प. प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत २०१३ नंतर जि.प.च्या शाळेत १४ तर खासगी शाळेमध्ये ५ शिक्षकांची नियुक्ती झाली. यातील दहा शिक्षक हे टीईटीव्दारे नियुक्त झाले. त्यामुळे प्राथमिक शिक्षण विभागाकडून या दहा शिक्षकांचे तर माध्यमिक शिक्षण विभागातील चार शिक्षक असे एकूण १४ शिक्षकांचे प्रमाणपत्र पुण्याला पडताळणीस पाठविले होते. परंतु आता शासनाकडून बोगस शिक्षकांची जिल्हानिहाय यादी आली. त्यात १६ शिक्षक असल्याचे दिसून येते. त्यामुळे आता हे शिक्षक कोणते? त्यासंदर्भात चौकशी केली जाईल. त्या सर्वांची नावे कळल्या शिवाय समजणार नाही. १६ बोगस शिक्षकांची नावे मागितली जाईल. - निंबाजी सोनवणे, शिक्षणाधिकारी प्राथमिक.

 

टॅग्स :Teacherशिक्षकEducation Sectorशिक्षण क्षेत्र