शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

गुरुजी तुम्ही सुद्धा; जिल्ह्यात 16 शिक्षक आढळले बोगस?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2022 05:00 IST

शासनाच्या आदेशानुसार शिक्षण विभागाने प्राथमिकच्या दहा तर माध्यमिकच्या चार अशा एकूण १४ शिक्षकांचे प्रमाणपत्र पुण्याला पडताळणीकरिता पाठविले होते. पडताळणीकरिता प्रमाणपत्र पाठविल्याने अनेक शिक्षकांची धडधड वाढली आहे. आता शासनाने बोगस शिक्षकांची यादी जाहीर केली असून वर्धा जिल्ह्यात १६ शिक्षक बोगस असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता हे शिक्षक कोणत्या वर्षातील असेल? असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शिक्षकांचा टीईटी परीक्षेतील प्रमाणपत्र घोटाळा उघड झाल्यानंतर पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला २०१३ ते २०१९ या कालावधीतील सर्व प्रमाणपत्रे जमा करण्यास सांगितले होते. त्यानुसार शिक्षण विभागाने जिल्ह्यातील १४ शिक्षकांची प्रमाणपत्रे पुण्याला पडताळणीकरिता पाठविली होती. परंतु शासनाकडून जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यामध्ये १६ शिक्षक बोगस असल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे या आकडेवारीवरून संभ्रम निर्माण झाला आहे. जिल्ह्यामध्ये १३ फेब्रुवारी २०१३ पहिली ते पाचवीपर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळेत १४ तर खासगी शाळेमध्ये ५ शिक्षकांची नियुक्ती झाली आहे. यातील दहा शिक्षकांची नियुक्ती टीईटीच्या माध्यमातून झाली. तसेच माध्यमिक शाळांमध्ये ४ शिक्षकांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशानुसार शिक्षण विभागाने प्राथमिकच्या दहा तर माध्यमिकच्या चार अशा एकूण १४ शिक्षकांचे प्रमाणपत्र पुण्याला पडताळणीकरिता पाठविले होते. पडताळणीकरिता प्रमाणपत्र पाठविल्याने अनेक शिक्षकांची धडधड वाढली आहे. आता शासनाने बोगस शिक्षकांची यादी जाहीर केली असून वर्धा जिल्ह्यात १६ शिक्षक बोगस असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता हे शिक्षक कोणत्या वर्षातील असेल? असाही प्रश्न निर्माण झाला आहे.पडताळणीसाठी पुण्याला पाठविले होते १४ शिक्षकांची प्रमाणपत्रे- २०१२ पासून शिक्षक भरती प्रक्रिया बंद होती. तरीही प्राथमिक व उच्च प्राथमिक वर्गावर काही शिक्षकांच्या जिल्ह्यात किंवा जिल्ह्याबाहेरही नियुक्त्या झाल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या. पण, आता टीईटी परीक्षेतील बोगसपणाच चव्हाट्यावर आल्याने अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. जिल्ह्यात २०१३ ते २०१९ या कालावधीमध्ये टीईटीव्दारे १४ शिक्षकांची नियुक्ती झाल्याची माहिती पुढे आली आहे. यामध्ये प्राथमिकचे दहा तर माध्यमिकचे चार शिक्षक आहे. त्यामुळे या १४ शिक्षकांचे प्रमाणपत्र पुण्याला पडताळणीकरिता पाठविले होते.  आता त्या बोगस शिक्षकांची यादी तयार झाली असून आता नावांची प्रतीक्षा आहे. 

बोगस शिक्षकांमध्ये जिल्हा शेवटून पाचवापैशाच्या जोरावर टीईटीचे बोगस प्रमाणपत्र मिळवून नोकरी मिळविणाऱ्या गुरुजींचा बोगसगिरीचा बुरखा फाटला आहे. शिक्षण विभागाने प्रमाणपत्रांची पडताळणी करून बोगस शिक्षकांची यादी तयार केली आहे. या यादीनुसार जिल्ह्यात १६ शिक्षक बोगस असून आपल्या जिल्ह्याचा क्रमांक शेवटून पाचवा आहे. 

जि.प. प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत २०१३ नंतर जि.प.च्या शाळेत १४ तर खासगी शाळेमध्ये ५ शिक्षकांची नियुक्ती झाली. यातील दहा शिक्षक हे टीईटीव्दारे नियुक्त झाले. त्यामुळे प्राथमिक शिक्षण विभागाकडून या दहा शिक्षकांचे तर माध्यमिक शिक्षण विभागातील चार शिक्षक असे एकूण १४ शिक्षकांचे प्रमाणपत्र पुण्याला पडताळणीस पाठविले होते. परंतु आता शासनाकडून बोगस शिक्षकांची जिल्हानिहाय यादी आली. त्यात १६ शिक्षक असल्याचे दिसून येते. त्यामुळे आता हे शिक्षक कोणते? त्यासंदर्भात चौकशी केली जाईल. त्या सर्वांची नावे कळल्या शिवाय समजणार नाही. १६ बोगस शिक्षकांची नावे मागितली जाईल. - निंबाजी सोनवणे, शिक्षणाधिकारी प्राथमिक.

 

टॅग्स :Teacherशिक्षकEducation Sectorशिक्षण क्षेत्र