शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ग्रीन आर्मी ५० कोटी वृक्ष लागवडीसाठी सज्ज

By admin | Updated: May 13, 2017 01:17 IST

वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे महत्त्व खऱ्या अर्थाने नागरिकांनी ओळखले पाहिजे. वनखात्याचे महत्त्व सध्याच्या मंत्री महोदयांनी

दिगंबर पगार : २७ हजार वृक्षप्रेमी झाले वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन चळवळीचे सदस्य लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे महत्त्व खऱ्या अर्थाने नागरिकांनी ओळखले पाहिजे. वनखात्याचे महत्त्व सध्याच्या मंत्री महोदयांनी ओळखून महाराष्ट्रात ५० कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यांच्याच नेतृत्त्वात चित्ररथाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात प्रचार व प्रसाराचे कार्य सुरू आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे चित्ररथ जिल्ह्यात दाखल झाला नसला तरी ५० कोटी वृक्ष लागवड या उपक्रमासाठी जिल्ह्यातील ग्रीन आर्मी सज्ज आहे. जिल्ह्यातील २७ हजार वृक्षप्रेमी ग्रीन आर्मीचे सदस्य झाले असल्याची माहिती उपवनसंरक्षक दिगंबर पगार यांनी दिली. स्थानिक शिवाजी चौक येथे वन विभागाच्यावतीने आयोजित चित्ररथाच्या स्वागतार्थ छोटेखानी कार्यक्रमात शुक्रवारी ते बोलत होते. व्यासपीठावर सहाय्यक वनसंरक्षक आर.के. चव्हाण, सोहम पांड्या, निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे, गडेकर, प्रा. मोहन गुजरकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. पगार पुढे म्हणाले, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनासाठी जिल्ह्याला १ कोटी ग्रीन आर्मीचे सदस्य करायचे आहेत. युद्धपातळीवर हे काम सुरू आहे. सध्यास्थितीत २७ हजार १४५ सदस्यांची नोंदणी करण्यात आली. या आर्मीत शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचाही समावेश करण्यात येणार आहे. ग्रीन आर्मीचे सदस्य झालेल्यांना विविध सोई-सुविधा देण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. यंदाचा ५० कोटी वृक्षलागवड उपक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रीन आर्मीसह जिल्ह्यातील विविध सामाजिक व सेवाभावी संस्थांचेही सहकार्य घेण्यात येणार आहे. प्रचार-प्रसारासाठी जिल्ह्यात दोन दिवसांकरिता येऊ घातलेला आकर्षक चित्ररथ काही तांत्रिक अडचणींमुळे शुक्रवारी सकाळी १० वाजेपर्यंत दाखल होऊ शकला नाही. तो जिल्ह्यातही यावा यासाठी आमचे प्रयत्न सुरूच आहे. चित्ररथ वर्धेत दाखल न झाल्यास वन विभागाच्यावतीने जिल्ह्यातच चित्ररथ तयार करून प्रचार व प्रसार करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. सहाय्यक वनसंरक्षक आर. के. चव्हाण यांनी निसर्ग हा उद्धारकर्ता असून त्याचे संगोपन आपण केले पाहिजे. वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाच्या चळवळीत प्रत्येक नागरिकाने सहभागी होण्याचे आवाहन केले. सोहम पांड्या यांनी आपण वृक्षसंवर्धनासंबंधी एक आराखडा तयार केला असून तो शासनाला पाठविला आहे. तो शासनाने ग्राह्य धरून पुढील वाटचाल केली तर महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देश हिरवा होईल असे सांगितले. वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाची समाजात जाणीव व जागृती असून प्रभावी कृती होणे बाकी आहे. लग्नाचा किंवा मुलाबाळांचा तसेच स्वत:चा वाढदिवस, लग्न आदी औचित्याने नागरिकांनी वृक्षारोपण केले पाहिजे. केवळ वृक्षारोपण करून चालणार नाही तर लावलेल्या वृक्षाचे जतनही त्यांनी केले पाहिजे असे निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे यांनी सांगितले. यावेळी प्रा. मोहन गुजरकर, गुरूदेव सेवा मंडळाचे बा.दे. हांडे यांनीही मनोगत व्यक्त केले. आयोजित कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता वर्धा वनपरिक्षेत्र अधिकारी पवार यांच्या नेतृत्त्वात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. ६० सदस्यांनी नोंदणी केली ग्रीन आर्मीचे सदस्य होऊ इच्छिणाऱ्यांसाठी कार्यक्रमस्थळी शुक्रवारी दिवसभऱ्यासाठी विशेष केंद्र देण्यात आले होते. दिवसभऱ्यात शिवाजी चौक येथील केंद्रात योगेश पिसे व योगेश मोरस्कर यांनी जवळपास ६० वर्धेकरांची ग्रीन आर्मीचे सदस्य म्हणून नोंदणी करून घेतली. ग्रीन आर्मी सदस्य नोंदणीत सेलू पुढे ग्रीन आर्मी सदस्य नोंदणीचे काम जिल्ह्यात युद्धपातळीवर सुरू आहे. एकूण २७ हजार १४५ जणांनी नोंदणी केली असून यात आर्वी तालुक्यातील २ हजार ५५७, आष्टी (श.) ३२३४, देवळी ७५४, हिंगणघाट २ हजार १५०, कारंजा (घा.) ५ हजार ४३४, समुद्रपूर ३ हजार ६६३, सेलू ५ हजार ९५२ व वर्धा तालुक्यातील ३ हजार ४०१ नागरिकांचा समावेश आहे. शिवाजी चौकात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण शिवाजी चौकात आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी कार्यक्रमाला खासदार रामदास तडस यांनी उपस्थिती दर्शविली नसली तरी त्यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्याचे उपवनसंरक्षक पगार यांनी सांगितले. कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिवाजी चौक परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.