शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

गोठ्याच्या तळघरातच गावठी दारूचा अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 06:00 IST

राज्यातील वर्धा जिल्ह्यात सर्वप्रथम १९६० मध्ये दारूबंदी करण्याचे निश्चित करण्यात आले होते. परंतु, त्याची अंमलबजावणी त्यावेळी झाली नाही. तर तत्कालीन राज्य शासनाने पुढाकार घेत १९७४ मध्ये वर्धा जिल्ह्यात दारूबंदी केली. शिवाय या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यावर दारूबंदीची अंमलबजावणी करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस विभागाकडून मुंबई दारूबंदी कायद्यान्वये कारवाई केली जाते.

ठळक मुद्देरामपुरी येथील प्रकार : १.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा/ वायगाव (नि.) : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी राहिलेल्या वर्धा जिल्ह्यात १९७४ मध्ये दारूबंदी लागू करण्यात आली. परंतु, ही दारूबंदी केवळ कागदावरच असल्याचा प्रत्यय अनेकदा येतो. याच पार्श्वभूमीवर एका दारूविक्रेत्याकडून चक्क शेतातील गोठ्यात तळघर तयार करून तेथे गावठी दारू गाळली जात असल्याचा धक्कादायक प्रकार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर उघडकीस आला आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी दारूसाठ्यासह एकूण १.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.राज्यातील वर्धा जिल्ह्यात सर्वप्रथम १९६० मध्ये दारूबंदी करण्याचे निश्चित करण्यात आले होते. परंतु, त्याची अंमलबजावणी त्यावेळी झाली नाही. तर तत्कालीन राज्य शासनाने पुढाकार घेत १९७४ मध्ये वर्धा जिल्ह्यात दारूबंदी केली. शिवाय या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यावर दारूबंदीची अंमलबजावणी करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस विभागाकडून मुंबई दारूबंदी कायद्यान्वये कारवाई केली जाते. मात्र, होणाऱ्या या कारवाईचाही धाक दारू माफियांना नसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. वर्धा शहरापासून अवघ्या १२ कि.मी. अंतरावर असलेल्या वायगाव (नि.) येथील सुमेध नगराळे (३४) याने त्याच्या रामपुरी भागातील शेतातील गोठ्यात तळ घर तयार केले. शिवाय याच तळ घरात तो गावठी दारू गाळत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने छापा टाकून सुमेध नगराळे याला ताब्यात घेत गोठ्याची बारकाईने पाहणी केली असता तळघरात मोठ्या प्रमाणात कच्चा मोहरसायन सडवा आणि गावठी दारू आढळून आली.तळघराबाबत कुणालाही संशय येऊ नये म्हणून तळघरात जाण्यासाठीच्या मार्गावर आरोपीने कापसाचे गाठोडे ठेवले होते. पोलिसांनी तळघरातून १५ ड्रम मधील कच्चा मोह रसायन सडवा तसेच दारू गाळण्याचे साहित्य असा एकूण १.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक आशिष मोरखडे, निरंजन वरभे, नरेंद्र डहाके, विकास अवचट, संघसेन कांबळे, राकेश आष्टणकर, नितीन इटकरे यांनी केली.

टॅग्स :liquor banदारूबंदी