शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

उद्योगांमध्ये शासन निर्णयाची पायमल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 06:00 IST

उद्योग असलेल्या ठिकाणी तेथील ८० टक्के नागरिकांना रोजगार उपलब्ध करून १८ नोव्हेंबर १९६८ चा शासनाचा निर्णय आहे. मात्र, जिल्ह्यातील एकाही उद्योगात शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली नसून नियम धाब्यावर बसविले जात आहेत.

ठळक मुद्देस्थानिकांना रोजगार नाहीच : बुधवारी मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील उद्योगांमध्ये स्थानिकांचा हक्क डावलून मोठ्या प्रमाणावर परप्रांतीयांचा भरणा करण्यात आला आहे. याकडे शासन-प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. उद्योगांमध्ये स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. उज्ज्वल काशीकर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने गुरुवारी प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून केली.उद्योग असलेल्या ठिकाणी तेथील ८० टक्के नागरिकांना रोजगार उपलब्ध करून १८ नोव्हेंबर १९६८ चा शासनाचा निर्णय आहे. मात्र, जिल्ह्यातील एकाही उद्योगात शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली नसून नियम धाब्यावर बसविले जात आहेत. याकडे जिल्हा प्रशासनाचेही दुर्लक्ष होत आहे. परिणामी जिल्ह्यात सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम नाही. येथील बेरोजगारांना अन्य जिल्ह्यात रोजगार शोधावा लागत आहे. लोकप्रतिनिधींकडूनही या प्रश्नावर आग्रही भूमिका घेतली जात नसल्याने कंपनी व्यवस्थापनांचा कारभार आलबेल सुरू आहे. जिल्ह्यात उत्तम व्हॅल्यू स्टील इंडस्ट्रीज, भूगाव यासह देवळी तालुक्यात उद्योग आहेत. या उद्योगांमध्ये स्थानिकांची संख्या अल्प असून परप्रांतीयांची संख्या मोठी आहे. यामुळे नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. उद्योगांमध्ये स्थानिकांना रोजगार मिळवून देण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी ११ सप्टेंबरला मोर्चा काढण्याचा इशारा अ‍ॅड. उज्ज्वल काशीकर, राकेश पांडे, समीर राऊत आदींनी निवेदनातून दिला आहे. मोर्चाला छत्रपती शिवाजी महाराज येथून सुरुवात होणार असून बजाज चौक, इंझापूर असे मार्गक्रमण करून उत्तम स्टील व्हॅल्यू उद्योगावर धडक देत व्यवस्थापकांना निवेदन सादर केले जाणार आहे.

टॅग्स :Governmentसरकार