शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

भारतातच भारतीय चिकित्सेवर सरकारची वक्रदृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 05:00 IST

कोरोनामुळे संपूर्ण जग जेरीस आले असताना जो-तो, उपचार सुचवित आहे. ते करण्याकडे सगळ्यांचा कल आहे. प्लाझ्मा थेरपी, हायड्रोक्लोरोईन, डेक्सामिथॉझोन इतकेच नव्हे तर काल-परवा सूचविलेली रेमडिसिव्हर ही महागडी उपचारपद्धती मान्य केली. प्रयोगांती यातील काही औषधी वापरण्यावर मनाई करण्यात आली. जगातील पंधराहून अधिक देशात कोरोनावरील लस बनविण्याचे काम सुरू आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील आयुर्वेद तज्ज्ञांमध्ये संताप : केंद्रसरकारच्या आयुष मंत्रालयाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : संपूर्ण जगाला कोरोना महामारीने ग्रासले असून जागतिक आरोग्य संघटनेपासून बहुतेक सर्व राष्ट्रांनी आपआपल्यापरीने उपचारपद्धती वापरून या रोगावर मात करण्याचा प्रयत्न करीत आहे. भारतीय चिकित्सा पद्धतीसाठी उत्पादन करणाऱ्या पतंजलीने यावर औषध असल्याचा दावा करताच त्याला आयुष मंत्रालयाने थांबविले. त्यामुळे हे भारतीय चिकित्सापद्धतीवर भारतातच वक्रदृष्टी असल्यासारखे आहे, असा संताप आयुर्वेद क्षेत्रात काम करणाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.कोरोनामुळे संपूर्ण जग जेरीस आले असताना जो-तो, उपचार सुचवित आहे. ते करण्याकडे सगळ्यांचा कल आहे. प्लाझ्मा थेरपी, हायड्रोक्लोरोईन, डेक्सामिथॉझोन इतकेच नव्हे तर काल-परवा सूचविलेली रेमडिसिव्हर ही महागडी उपचारपद्धती मान्य केली. प्रयोगांती यातील काही औषधी वापरण्यावर मनाई करण्यात आली. जगातील पंधराहून अधिक देशात कोरोनावरील लस बनविण्याचे काम सुरू आहे. ती केव्हा येईल? त्याची किंमत किती राहील हे कुणालाही सांगता येत नाही. असे असताना प्रयोगशीलतेसाठी ओळखल्या जाणाºया स्वदेशीचा ध्यास असलेले योगगुरू रामदेवबाबा यांनी कोरोनील श्वासहारी व अनुतेलाचा उपयोग १०० रुग्णांवर करून त्यांना जो काही सकारात्मक निकाल मिळाला, त्याच्या आधारेच त्यांनी लोकोपयोगीसाठी सर्वांसमोर मांडला. कोट्यवधींची उलाढाल करणाºया पतंजलीकडे हे सर्व करण्याचे केंद्र व राज्य शासनाचे परवाने नक्कीच असेल. संशोधानात १०० ही सॅम्पल साईज मान्य केली जाते. त्यातील ६९ टक्के व्यक्तींना सकारात्मक परिवर्तन आढळले ते मान्य करण्यासारखे आहे. या औषधीनिर्मित वापरलेली घटक द्रव्ये ही सुद्धा ‘फार्मोकोपीया’ मध्ये मान्यता असलेली आहे, असे असताना तिला थांबविणे कितपत योग्य आहे, असा प्रश्नही आयुर्वेद तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. आयसीएमआरने आयुष डॉक्टरांना नॉन मेडिकल संबोधले त्यावेळी आयुष ने साधा जाबही विचारला नाही. तर दुसरीकडे आयुषचे चिकित्सक अहोरात्र सेवा देत असताना त्यांना न मिळणाºया सोयी, सुविधा व मोबदल्यातील भेदभाव या विषयीही कुणी अवाक्षरही काढले नाही. त्यामुळे आयुष डॉक्टरांची ना शासनाला चिंता आहे ना आयुष मंत्रालयाला असेही आयुर्वेद तज्ज्ञांनी म्हटले आहे.आयुष स्वतंत्र मंत्रालय झाल्यावर भारतीय चिकित्सापद्धतीला सर्वत्र मान्यता मिळेल असे स्वप्न आयुषच्या २० लाखांवर चिकित्सक व कोट्यवधी भारतीयांनी पाहिले. त्या स्वप्नाची पूर्ती होण्याऐवजी चुराडा होताना दिसतोय. भारतीय चिकित्सापद्धतीच्या कार्याची, त्यातील संशोधनाची, त्यात कार्यरत आयुष डॉक्टरांची स्वत:च्या देशातच परवड होत असेल तर याला काय म्हणावे? आत्मनिर्भर व स्वदेशीचा मंत्र देणाºया शासनाने वेळीच हा अन्याय दूर केला नाही तर याचा केव्हाही विस्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.- डॉ.श्याम भुतडा, आयुर्वेदाचार्य.आयुष फक्त नावापुरते आहे. स्व:ता काही करायचे नाही आणि इतरांवर विश्वास ठेवायचा नाही, असाच प्रकार सुरु आहे. फक्त मंत्रालय काढून काम चालत नाही तर नवीन संशोधन, नवीन कल्पनेस चालना देणे हेही महत्त्वाच आहे. कोविडसारख्या रोगावर आजपर्यंत जगात औषध नाही. पारंपरिक औषध वापरुन चिनने आजारावर नियंत्रण मिळविले पण, आपल्याकडे आयुर्वेदाचार्य असतानाही, त्याचा उपयोग आपणास करता येत नाही, हेच आपले दुर्भाग्य आहे.- नितीन मेशकर, आयुर्वेदाचार्य.

टॅग्स :Healthआरोग्य