शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

भारतातच भारतीय चिकित्सेवर सरकारची वक्रदृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 05:00 IST

कोरोनामुळे संपूर्ण जग जेरीस आले असताना जो-तो, उपचार सुचवित आहे. ते करण्याकडे सगळ्यांचा कल आहे. प्लाझ्मा थेरपी, हायड्रोक्लोरोईन, डेक्सामिथॉझोन इतकेच नव्हे तर काल-परवा सूचविलेली रेमडिसिव्हर ही महागडी उपचारपद्धती मान्य केली. प्रयोगांती यातील काही औषधी वापरण्यावर मनाई करण्यात आली. जगातील पंधराहून अधिक देशात कोरोनावरील लस बनविण्याचे काम सुरू आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील आयुर्वेद तज्ज्ञांमध्ये संताप : केंद्रसरकारच्या आयुष मंत्रालयाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : संपूर्ण जगाला कोरोना महामारीने ग्रासले असून जागतिक आरोग्य संघटनेपासून बहुतेक सर्व राष्ट्रांनी आपआपल्यापरीने उपचारपद्धती वापरून या रोगावर मात करण्याचा प्रयत्न करीत आहे. भारतीय चिकित्सा पद्धतीसाठी उत्पादन करणाऱ्या पतंजलीने यावर औषध असल्याचा दावा करताच त्याला आयुष मंत्रालयाने थांबविले. त्यामुळे हे भारतीय चिकित्सापद्धतीवर भारतातच वक्रदृष्टी असल्यासारखे आहे, असा संताप आयुर्वेद क्षेत्रात काम करणाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.कोरोनामुळे संपूर्ण जग जेरीस आले असताना जो-तो, उपचार सुचवित आहे. ते करण्याकडे सगळ्यांचा कल आहे. प्लाझ्मा थेरपी, हायड्रोक्लोरोईन, डेक्सामिथॉझोन इतकेच नव्हे तर काल-परवा सूचविलेली रेमडिसिव्हर ही महागडी उपचारपद्धती मान्य केली. प्रयोगांती यातील काही औषधी वापरण्यावर मनाई करण्यात आली. जगातील पंधराहून अधिक देशात कोरोनावरील लस बनविण्याचे काम सुरू आहे. ती केव्हा येईल? त्याची किंमत किती राहील हे कुणालाही सांगता येत नाही. असे असताना प्रयोगशीलतेसाठी ओळखल्या जाणाºया स्वदेशीचा ध्यास असलेले योगगुरू रामदेवबाबा यांनी कोरोनील श्वासहारी व अनुतेलाचा उपयोग १०० रुग्णांवर करून त्यांना जो काही सकारात्मक निकाल मिळाला, त्याच्या आधारेच त्यांनी लोकोपयोगीसाठी सर्वांसमोर मांडला. कोट्यवधींची उलाढाल करणाºया पतंजलीकडे हे सर्व करण्याचे केंद्र व राज्य शासनाचे परवाने नक्कीच असेल. संशोधानात १०० ही सॅम्पल साईज मान्य केली जाते. त्यातील ६९ टक्के व्यक्तींना सकारात्मक परिवर्तन आढळले ते मान्य करण्यासारखे आहे. या औषधीनिर्मित वापरलेली घटक द्रव्ये ही सुद्धा ‘फार्मोकोपीया’ मध्ये मान्यता असलेली आहे, असे असताना तिला थांबविणे कितपत योग्य आहे, असा प्रश्नही आयुर्वेद तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. आयसीएमआरने आयुष डॉक्टरांना नॉन मेडिकल संबोधले त्यावेळी आयुष ने साधा जाबही विचारला नाही. तर दुसरीकडे आयुषचे चिकित्सक अहोरात्र सेवा देत असताना त्यांना न मिळणाºया सोयी, सुविधा व मोबदल्यातील भेदभाव या विषयीही कुणी अवाक्षरही काढले नाही. त्यामुळे आयुष डॉक्टरांची ना शासनाला चिंता आहे ना आयुष मंत्रालयाला असेही आयुर्वेद तज्ज्ञांनी म्हटले आहे.आयुष स्वतंत्र मंत्रालय झाल्यावर भारतीय चिकित्सापद्धतीला सर्वत्र मान्यता मिळेल असे स्वप्न आयुषच्या २० लाखांवर चिकित्सक व कोट्यवधी भारतीयांनी पाहिले. त्या स्वप्नाची पूर्ती होण्याऐवजी चुराडा होताना दिसतोय. भारतीय चिकित्सापद्धतीच्या कार्याची, त्यातील संशोधनाची, त्यात कार्यरत आयुष डॉक्टरांची स्वत:च्या देशातच परवड होत असेल तर याला काय म्हणावे? आत्मनिर्भर व स्वदेशीचा मंत्र देणाºया शासनाने वेळीच हा अन्याय दूर केला नाही तर याचा केव्हाही विस्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.- डॉ.श्याम भुतडा, आयुर्वेदाचार्य.आयुष फक्त नावापुरते आहे. स्व:ता काही करायचे नाही आणि इतरांवर विश्वास ठेवायचा नाही, असाच प्रकार सुरु आहे. फक्त मंत्रालय काढून काम चालत नाही तर नवीन संशोधन, नवीन कल्पनेस चालना देणे हेही महत्त्वाच आहे. कोविडसारख्या रोगावर आजपर्यंत जगात औषध नाही. पारंपरिक औषध वापरुन चिनने आजारावर नियंत्रण मिळविले पण, आपल्याकडे आयुर्वेदाचार्य असतानाही, त्याचा उपयोग आपणास करता येत नाही, हेच आपले दुर्भाग्य आहे.- नितीन मेशकर, आयुर्वेदाचार्य.

टॅग्स :Healthआरोग्य