शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
2
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन
3
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
4
Beed: लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण
5
Viral Video : अरे बापरे हे काय बघितलं! महिलेने कॅमेरा सुरू केला अन् पुढे जे काही घडलं... ; व्हिडीओ बघून तुम्हीही हैराण व्हाल!
6
सरकारी बँकांमध्ये वाढणार परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा! सरकार करतंय मोठी तयारी
7
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...
8
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
9
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
10
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
11
'माझ्या बायकोला तू पळवून लावलंस!'; रागाच्या भरात भावाने बहिणीची केली निर्घृण हत्या
12
"लग्न नाही, फॅमिली नाही विचार करा...", फुकटचा सल्ला देणाऱ्या चाहत्याला जुईचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "अशा माणसांची..."
13
नवरात्रीतील विनायक चतुर्थी २०२५: 'या' ८ राशींसाठी जुळून आले ३ महाशुभ योग; मिळेल विशेष धनलाभ!
14
मुलाला तुरुंगवास, धक्का बसलेल्या वडिलांनी संपवलं जीवन, अंत्यसंस्कारावेळी घडलं असं काही, ७ पोलीस निलंबित
15
पाकिस्तान युद्धात सैनिक लढला होता, नंतर पेन्शनशिवाय काढून टाकले; पत्नीला ५७ वर्षांनंतर मिळाला न्याय
16
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
17
Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु!
18
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
19
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
20
एकाच वेळी पाच-सहा मराठी सिनेमे रिलीज, कसं व्हायचं? प्रसिद्ध गायकाने मांडलं मत, इंडस्ट्रीबद्दल म्हणाला...

खासगीसह शासकीय कार्य गांधी विचारातून व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 05:00 IST

खासगी तसेच शासकीय स्तरावरील कोणतेही कार्य गांधी विचाराचा आधार घेत करायला हवे. कारण विश्वातील प्रश्नाचे उत्तर हे गांधी विचारामध्येच आहे. प्रत्येक कार्याचे नियोजन हे गांधी विचारातून झाल्यास सर्वदूर समतुल्य विकास साधल्या जाईल, असे विचार जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : विश्व-शांतीचा संदेश देणारी ‘जय जगत’ पदयात्रा वर्ध्यात दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा गांधी यांनी ग्रामोद्योग व ग्रामविकास यावर विशेष लक्ष दिले. गांधीजींच्या स्वप्नातील भारत म्हणजे ग्राम होय; पण सध्या आपल्याला ग्रामोद्योग व ग्रामविकास घडवून आणायचा असेल तर खासगी तसेच शासकीय स्तरावरील कोणतेही कार्य गांधी विचाराचा आधार घेत करायला हवे. कारण विश्वातील प्रश्नाचे उत्तर हे गांधी विचारामध्येच आहे. प्रत्येक कार्याचे नियोजन हे गांधी विचारातून झाल्यास सर्वदूर समतुल्य विकास साधल्या जाईल, असे विचार जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी व्यक्त केले.पी. वी. राजगोपाल यांच्या नेतृत्वात गांधी संदेश घेवून येथे आलेल्या ‘जय जगत’ विश्व शांती पदयात्रेचे स्वागत जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी ते मनोगत व्यक्त करताना बोलत होते. याप्रसंगी जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शंकरप्रसाद अग्निहोत्री यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या पदयात्रेच्या माध्यमातून बापूंच्या शांती, सद्भावना व बंधुभाव हे सूत्र संपूर्ण जगात पोहोचविले जात आहे. राजघाट दिल्ली ते सेवाग्राम पदयात्रेचा एक टप्पा म्हणून ही पदयात्रा वर्धेतील अग्निहोत्री कॉलेज परिसरात शनिवारी सायंकाळी उशीरा पोहचली. तेथे रविवारी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी येऊन पी. वी. राजगोपाल यांच्यासह सर्व यात्रेकरूंचे स्वागत केले. याप्रसंगी शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनीही मनोगत व्यक्त केले. गांधी सिद्धांतामध्ये विचार, आचार व प्रचार हे मुळ आहे. विचारासोबत आचरण असले पाहिजे आणि या आचरणातून आपण प्रचार केला पाहिजे असे त्यांनी सांगितले. यावेळी १५ आंतरराष्ट्रीय पदचारींसह सुमारे १०० सत्याग्रही व जय महाकाली शिक्षण संस्थेचे जनसंपर्क अधिकारी प्रमोद गिरडकर, अरुण वसू, दत्तात्रय कानस्कर आदी उपस्थित होते.यात्रेचा पहिला टप्पा पूर्ण - पी. वी. राजगोपालजय जगत पदयात्रेचा बापूंच्या भूमीत २००० कि.मी. अंतराचा पहिला टप्पा पूर्ण होत आहे. या यात्रेदरम्यान विविध विषयांवर ठिकठिकाणी चर्चा झाली. येत्या गांधी पुण्यतिथीपर्यंत नॉन व्हायलेंट एकॉनोमी व नॉन व्हायलेंट गर्व्हनन्स या दोन मुद्द्यांवर महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, वर्धा व सेवाग्राम आश्रम येथे विविध तज्ञांसोबत चर्चा होणार असल्याचे याप्रसंगी पी. वी. राजगोपाल यांनी सांगितले. कार्यक्रमादरम्यान काही मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :Socialसामाजिक