शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

विकासाकरिता शासकीय यंत्रणेने समन्वयातून काम करावे - सुधीर मुनगंटीवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 13:20 IST

पालकमंत्र्यांनी घेतला विकासकामांचा आढावा

वर्धा : जिल्ह्यात जिल्हा वार्षिक योजनेसह विविध योजनांतून विकासाची कामे करताना ती गुणवत्तापूर्वक, कालमर्यादेत व पारदर्शकपणे होणे आवश्यक आहे. विभागांनी कामे करताना या बाबीचे पालन केले पाहिजे. जिल्ह्याला विकासाच्या बाबतीत पुढे नेण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने व सेवाभावनेतून काम करावे, अशा सूचना वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केल्या.

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा परिषदेच्या सिंधुताई सपकाळ सभागृहात विविध विभागांच्या विकास योजनांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, आमदार समीर कुणावार, आमदार दादाराव केचे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन, उपवनसंरक्षक राकेश सेपट उपस्थित होते. शिक्षण सर्व समाजाच्या प्रगतीचा पाया असून, समाजातील प्रत्येक घटकाला दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. शेतकरी ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून, शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी क्षेत्रात बदल करण्याची गरज आहे, असे पालकमंत्री म्हणाले.

शासन शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविते. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देऊन कृषी क्षेत्रात बदल घडविण्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे. कृषि विभागाने कृषी प्रदर्शनाचे आयोजन करून सेंद्रिय शेती, कृषी प्रक्रिया उद्योग, शेतकरी प्रशिक्षण, पॉली हाऊस, कृषी वाचनालय, दुग्ध योजना, वनशेती, माती परीक्षण, ड्रोन फवारणी याबाबत जनजागृती करावी, असेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सुरुवातीस जिल्ह्यात विविध विभागांमार्फत सुरू असलेल्या विकासकामांची माहिती दिली. बैठकीला सर्व विभाग प्रमुख, अधिकारी उपस्थित होते.

निराधारांचे मानधन वेळेत जमा करा

शासनाने निराधार योजनेच्या अनुदानात वाढ केली असून, त्यांना १२० दिवसांत अनुदान देणे अपेक्षित आहे. असे असताना काही ठिकाणी दिरंगाई होत असल्याचे दिसून येते. याबाबत स्वतंत्र बैठक घेऊन अनुदान वेळेवर लाभार्थींच्या खात्यात जमा होईल याकडे लक्ष द्यावे.

जिल्ह्यातील जीर्ण अवस्थेत असलेल्या शासकीय रुग्णालयांच्या बांधकामासाठी तत्काळ प्रस्ताव सादर करावा. रुग्णालयांमध्ये पर्याप्त प्रमाणात औषधी साठा उपलब्ध ठेवावा. रुग्णालयातील स्वच्छता, पाणी, बैठक व्यवस्था याकडे लक्ष सांगितले.

आमदारांनीही वेधले लक्ष

- आमदार समीर कुणावार : यांनी काही प्राथमिक आरोग्य केंद्राचे स्थानांतरण, जीर्ण झालेल्या आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम, नव्याने बांधण्यात आलेल्या नगर परिषद इमारतीच्या फर्निचर याकरिता निधीच्या मागणीसह शेतकऱ्यांना दिवसा वीज तसेच हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयाच्या श्रेणीवाढीचा मुद्दा उपस्थित केला.

- आमदार दादाराव केचे : यांनी आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यातील नदी काठावरील गावांच्या पूर संरक्षण भिंतीच्या बांधकामासाठी निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले. आरोग्य केंद्रातील रिक्त वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे तातडीने भरण्याबाबत प्रश्न उपस्थित करुन प्रशासनाचे लक्ष वेधले.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारGovernmentसरकारwardha-acवर्धा