शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

विकासाकरिता शासकीय यंत्रणेने समन्वयातून काम करावे - सुधीर मुनगंटीवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 13:20 IST

पालकमंत्र्यांनी घेतला विकासकामांचा आढावा

वर्धा : जिल्ह्यात जिल्हा वार्षिक योजनेसह विविध योजनांतून विकासाची कामे करताना ती गुणवत्तापूर्वक, कालमर्यादेत व पारदर्शकपणे होणे आवश्यक आहे. विभागांनी कामे करताना या बाबीचे पालन केले पाहिजे. जिल्ह्याला विकासाच्या बाबतीत पुढे नेण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने व सेवाभावनेतून काम करावे, अशा सूचना वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केल्या.

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा परिषदेच्या सिंधुताई सपकाळ सभागृहात विविध विभागांच्या विकास योजनांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, आमदार समीर कुणावार, आमदार दादाराव केचे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन, उपवनसंरक्षक राकेश सेपट उपस्थित होते. शिक्षण सर्व समाजाच्या प्रगतीचा पाया असून, समाजातील प्रत्येक घटकाला दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. शेतकरी ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून, शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी क्षेत्रात बदल करण्याची गरज आहे, असे पालकमंत्री म्हणाले.

शासन शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविते. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देऊन कृषी क्षेत्रात बदल घडविण्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे. कृषि विभागाने कृषी प्रदर्शनाचे आयोजन करून सेंद्रिय शेती, कृषी प्रक्रिया उद्योग, शेतकरी प्रशिक्षण, पॉली हाऊस, कृषी वाचनालय, दुग्ध योजना, वनशेती, माती परीक्षण, ड्रोन फवारणी याबाबत जनजागृती करावी, असेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सुरुवातीस जिल्ह्यात विविध विभागांमार्फत सुरू असलेल्या विकासकामांची माहिती दिली. बैठकीला सर्व विभाग प्रमुख, अधिकारी उपस्थित होते.

निराधारांचे मानधन वेळेत जमा करा

शासनाने निराधार योजनेच्या अनुदानात वाढ केली असून, त्यांना १२० दिवसांत अनुदान देणे अपेक्षित आहे. असे असताना काही ठिकाणी दिरंगाई होत असल्याचे दिसून येते. याबाबत स्वतंत्र बैठक घेऊन अनुदान वेळेवर लाभार्थींच्या खात्यात जमा होईल याकडे लक्ष द्यावे.

जिल्ह्यातील जीर्ण अवस्थेत असलेल्या शासकीय रुग्णालयांच्या बांधकामासाठी तत्काळ प्रस्ताव सादर करावा. रुग्णालयांमध्ये पर्याप्त प्रमाणात औषधी साठा उपलब्ध ठेवावा. रुग्णालयातील स्वच्छता, पाणी, बैठक व्यवस्था याकडे लक्ष सांगितले.

आमदारांनीही वेधले लक्ष

- आमदार समीर कुणावार : यांनी काही प्राथमिक आरोग्य केंद्राचे स्थानांतरण, जीर्ण झालेल्या आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम, नव्याने बांधण्यात आलेल्या नगर परिषद इमारतीच्या फर्निचर याकरिता निधीच्या मागणीसह शेतकऱ्यांना दिवसा वीज तसेच हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयाच्या श्रेणीवाढीचा मुद्दा उपस्थित केला.

- आमदार दादाराव केचे : यांनी आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यातील नदी काठावरील गावांच्या पूर संरक्षण भिंतीच्या बांधकामासाठी निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले. आरोग्य केंद्रातील रिक्त वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे तातडीने भरण्याबाबत प्रश्न उपस्थित करुन प्रशासनाचे लक्ष वेधले.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारGovernmentसरकारwardha-acवर्धा