शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

सरकारने शेतीची नीती बदलविण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 05:00 IST

नयी तालिम समिती परिसरातील शांती भवन मध्ये राष्ट्रीय युवा संघटनेचे राज्य स्तरीय शिबिर सुरू आहे. पहिल्या सत्रात शेती व शेतकऱ्यांवर कार्य करणारे विवेकानंद माथने यांनी ‘शेतकºयांची शेती व दुर्दशा’ यावर मार्गदर्शन केले. या प्रसंगी सत्यप्रकाश भारत उपस्थित होते. पुढे बोलताना विवेकानंद माथने म्हणाले, दरवर्षी दहा ते बारा हजार शेतकरी आत्महत्या करीत आहेत.

ठळक मुद्देविवेकानंद माथने : राष्ट्रीय युवा संघटनेचे राज्यस्तरीय शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : नैसर्गिक संपत्ती व मानवाचे श्रम यांच्या एकत्रिपणाने जगातील संपत्ती निर्माण होत असते. शेती उत्पादने जगण्याचे आणि अत्यावश्यक साधने असल्याने देशाने त्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. शेती करणारा आत्महत्या करीत आहेत पण; कुटुंब मात्र उद्धवस्त होते. शेतकऱ्यांना पिकांचा योग्य हमीभाव दिल्या जात नाही. शेती आणि शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावयाची असेल तर सरकारने शेतीची नीती बदलणे आवश्यक आहे, असे मत विवेकानंद माथने यांनी व्यक्त केले.नयी तालिम समिती परिसरातील शांती भवन मध्ये राष्ट्रीय युवा संघटनेचे राज्य स्तरीय शिबिर सुरू आहे. पहिल्या सत्रात शेती व शेतकऱ्यांवर कार्य करणारे विवेकानंद माथने यांनी ‘शेतकºयांची शेती व दुर्दशा’ यावर मार्गदर्शन केले. या प्रसंगी सत्यप्रकाश भारत उपस्थित होते. पुढे बोलताना विवेकानंद माथने म्हणाले, दरवर्षी दहा ते बारा हजार शेतकरी आत्महत्या करीत आहेत. ज्यांच्या नावे शेती आहे त्यांचीच नोंदणी होत आहे पण; त्यांचे कुटुंबही आत्महत्या करते. तेव्हा ही संख्या साठ हजारावर जाते. आज अकुशल मजुरांची मजुरी निश्चित आहे पण; शेतकºयांची नाही. हिशेब काढला तर ती ९२ रुपये रोज इतके पडते. यात एकटा माणूसही व्यवस्थित जगू शकत नाहीत. विकासासाठी औद्योगिकीकरण सुरू करण्यात आले. मात्र यातुनही शोषण वाढतच असून ते निरंतर होत राहणार. एवढेच नाही तर या औद्योगिकीकरणामुळे रोजगारही कमी झाल्याचे दिसून येते. त्यामुळे अती औद्योगिकीकरणही मारक ठरत असल्याचे माथने म्हणाले. आजची परिस्थिती पाहता स्वदेशीचा स्विकार करावा लागेल. समान न्याय, समान कायदे, श्रमावर आधारीत मूल्य या तीन गोष्टींची मागणी शासनाकडे सर्व समस्यांच्या निवारणासाठी करावी लागेल आणि त्यासाठी सर्वांना संघटीत होऊन प्रयत्न करावा लागेल. तरच शेतीची दुर्दशा व शोषणकारी अर्थव्यवस्था संपेल असा विश्वासही माथने यांनी व्यक्त केला.सत्यप्रकाश भारत यावेळी म्हणाले, जे युवा वेळेनुसार घडणाºया बदलाला बघू शकत नाही. त्यांनी भारत मातेवर प्रेम दाखवू नये. कायद्यान्वये सर्व व्यवस्था या मानवाच्या सुखासाठी की दुखासाठी हा प्रश्न आहे. शिक्षणाचे मानवीकरण करण्याचे चालू आहे पण; यापेक्षा अर्थव्यवस्थेचे मानवीकरण झाले पाहिजे. भारताचा विकास हा गरीब व श्रीमंतीच्या निर्माणाकडे वाटचाल करीत आहेत. यामुळे देशात लोकतंत्र नसल्याचे दिसते. ही परिस्थिती आणि सुधारणा करण्याची जबाबदारी युवकांवर असल्याने याबाबत सकारात्मक विचार युवकांना करायचा आहे. या देशात जी समस्या निर्माण झाली ती शिक्षितांमुळेच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या सत्राचे संचालन भारती तर आभार प्रदर्शन मनोज ठाकरे यांनी केले.

टॅग्स :Socialसामाजिक