शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

शेतमालाला भाव, तरुणांना रोजगार देण्यात सरकार अपयशी

By रवींद्र चांदेकर | Updated: November 8, 2024 18:05 IST

शरद पवार यांचा घणाघात : महाराष्ट्राचा चेहरा बदलण्यासाठी साथ देण्याचे आवाहन

हिंगणघाट (वर्धा) : कापूस, सोयाबीन, ऊस पिकांना भाव नाही. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारीमुळे आत्महत्या करीत आहेत. आमच्या हातात सत्ता होती, त्यावेळी सर्वच क्षेत्रात महाराष्ट्र नंबर एक होता. परंतु, भाजपच्या हातात सत्ता गेल्यावर राज्याचा पहिला नंबर घसरला, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी येथील गोकुळधाम मैदानावर आयोजित सभेत केला.

महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अतुल वांदिले यांच्या निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, देशात ६० टक्के शेतकरी आहेत. त्यांच्यावर सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आत्महत्या करण्याची वेळ येत आहे. सोयाबीन, कापूस, ऊस या पिकांना उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नाही. दुसरीकडे शेतीचा खर्च वाढत आहे. अशावेळी तरुणाच्या झुंडी नोकरीसाठी देशभरात हिंडत आहेत. देश रसातळाला जात असताना देशात जाती धर्माचे राजकारण सुरू आहे. भाजपने दहा वर्ष सत्ता उपभोगूनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे. शेतमालाचे भाव पडलेले आहेत. देश व राज्याची अर्थव्यवस्था संकटात आहे. तरुणांच्या हाताला काम नाही, त्यांना नोकरी नाही हे चित्र बदलायचे आहे. याकरिता महाविकास आघाडीच्या हातात पुन्हा एकदा सत्ता द्या, असे आवाहन त्यांनी केले.

भाजपची दहा वर्ष सत्ता असताना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत स्वबळावर सत्ता स्थापन करू शकले नाही. त्यांना अन्य पक्षांच्या मदतीने सरकार बनवावे लागले. हा देश शेतकऱ्यांचा आहे. सत्तेचा वापर शेतकऱ्यांसाठी झाला पाहिजे. मात्र, केंद्रातील भाजपला याची जाणीव नाही. मी कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी त्यांचे ७० हजार कोटींचे कर्ज माफ केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य लाभले होते. सध्या केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे पुन्हा शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येऊन ठेपल्याचा घणाघात त्यांनी केला.

सभेला राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, उमेदवार अतुल वांदिले, नीतेश कराळे, माजी उपनगराध्यक्ष मुरलीमनोहर व्यास यांनीही मार्गदर्शन केले. मंचावर माजी आमदार सुरेश देशमुख, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, माजी आमदार डॉ. वसंत बोंडे, उद्धवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजेंद्र खुपसरे, सतीश धोबे, काँग्रेसचे प्रवीण उपासे, पंढरी कापसे, भाईजी मुंजेवार उपस्थित होते. यावेळी सुनील डोंगरे व माजी नगरसेविका शुभांगी डोंगरे, आरपीआयचे अनिल मून यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा घोषित केला. विजय तामगाडगे यांनी सूत्रसंचालन केले.

विधानसभा डोळ्यांसमोर ठेवून निर्णयराज्य शासनाने विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून पैशांच्या योजना राबविण्याचा सपाटा लावला. १० वर्षे त्यांना या योजना राबवता आल्या नाही. ते पुन्हा सत्तेत आल्यास या योजनांचे खरे स्वरूप दिसेल. सर्व सामान्यांची फसगत होईल. महाविकास आघाडी सत्तेत आल्यास आम्ही महालक्ष्मी योजना, कृषी समृद्धी, युवकांना शब्द, कुटुंब संरक्षण आणि समानतेची हमी, या गॅरंटीवर काम करू, असा विश्वास शरद पवार यांनी दिला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४wardha-acवर्धाSharad Pawarशरद पवार