शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेतमालाला भाव, तरुणांना रोजगार देण्यात सरकार अपयशी

By रवींद्र चांदेकर | Updated: November 8, 2024 18:05 IST

शरद पवार यांचा घणाघात : महाराष्ट्राचा चेहरा बदलण्यासाठी साथ देण्याचे आवाहन

हिंगणघाट (वर्धा) : कापूस, सोयाबीन, ऊस पिकांना भाव नाही. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारीमुळे आत्महत्या करीत आहेत. आमच्या हातात सत्ता होती, त्यावेळी सर्वच क्षेत्रात महाराष्ट्र नंबर एक होता. परंतु, भाजपच्या हातात सत्ता गेल्यावर राज्याचा पहिला नंबर घसरला, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी येथील गोकुळधाम मैदानावर आयोजित सभेत केला.

महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अतुल वांदिले यांच्या निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, देशात ६० टक्के शेतकरी आहेत. त्यांच्यावर सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आत्महत्या करण्याची वेळ येत आहे. सोयाबीन, कापूस, ऊस या पिकांना उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नाही. दुसरीकडे शेतीचा खर्च वाढत आहे. अशावेळी तरुणाच्या झुंडी नोकरीसाठी देशभरात हिंडत आहेत. देश रसातळाला जात असताना देशात जाती धर्माचे राजकारण सुरू आहे. भाजपने दहा वर्ष सत्ता उपभोगूनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे. शेतमालाचे भाव पडलेले आहेत. देश व राज्याची अर्थव्यवस्था संकटात आहे. तरुणांच्या हाताला काम नाही, त्यांना नोकरी नाही हे चित्र बदलायचे आहे. याकरिता महाविकास आघाडीच्या हातात पुन्हा एकदा सत्ता द्या, असे आवाहन त्यांनी केले.

भाजपची दहा वर्ष सत्ता असताना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत स्वबळावर सत्ता स्थापन करू शकले नाही. त्यांना अन्य पक्षांच्या मदतीने सरकार बनवावे लागले. हा देश शेतकऱ्यांचा आहे. सत्तेचा वापर शेतकऱ्यांसाठी झाला पाहिजे. मात्र, केंद्रातील भाजपला याची जाणीव नाही. मी कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी त्यांचे ७० हजार कोटींचे कर्ज माफ केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य लाभले होते. सध्या केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे पुन्हा शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येऊन ठेपल्याचा घणाघात त्यांनी केला.

सभेला राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, उमेदवार अतुल वांदिले, नीतेश कराळे, माजी उपनगराध्यक्ष मुरलीमनोहर व्यास यांनीही मार्गदर्शन केले. मंचावर माजी आमदार सुरेश देशमुख, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, माजी आमदार डॉ. वसंत बोंडे, उद्धवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजेंद्र खुपसरे, सतीश धोबे, काँग्रेसचे प्रवीण उपासे, पंढरी कापसे, भाईजी मुंजेवार उपस्थित होते. यावेळी सुनील डोंगरे व माजी नगरसेविका शुभांगी डोंगरे, आरपीआयचे अनिल मून यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा घोषित केला. विजय तामगाडगे यांनी सूत्रसंचालन केले.

विधानसभा डोळ्यांसमोर ठेवून निर्णयराज्य शासनाने विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून पैशांच्या योजना राबविण्याचा सपाटा लावला. १० वर्षे त्यांना या योजना राबवता आल्या नाही. ते पुन्हा सत्तेत आल्यास या योजनांचे खरे स्वरूप दिसेल. सर्व सामान्यांची फसगत होईल. महाविकास आघाडी सत्तेत आल्यास आम्ही महालक्ष्मी योजना, कृषी समृद्धी, युवकांना शब्द, कुटुंब संरक्षण आणि समानतेची हमी, या गॅरंटीवर काम करू, असा विश्वास शरद पवार यांनी दिला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४wardha-acवर्धाSharad Pawarशरद पवार