शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

शासनाची कर्जमाफी नसून कर्जवसुलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:00 IST

फडणवीस शासनाने ऐतिहासिक कर्जमाफी जाहीर केल्याचे सांगितले जात आहे. वास्तविकतेत ही कर्जमाफी शेतकऱ्यांची दिशाभुल करणारी आहे.

अजित नवले यांची टीका : सुकाणू समितीचे शेतकरी जनजागरण संमेलनलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : फडणवीस शासनाने ऐतिहासिक कर्जमाफी जाहीर केल्याचे सांगितले जात आहे. वास्तविकतेत ही कर्जमाफी शेतकऱ्यांची दिशाभुल करणारी आहे. या निर्णयाचा पीक कर्ज घेणाऱ्या केवळ २९.८२ टक्के शेतकऱ्यांनाच लाभ होणार आहे. यामुळे कर्जमाफीच्या निर्णयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नापास झाले असून जाहीर केलेली कर्जमाफी ही कर्जमाफी नसून ती कर्जवसुलीच असल्याची टीका सुकाणू समितीचे राज्य नियंत्रक डॉ. अजित नवले यांनी वर्धेत केली. ते स्थानिक माहेश्वरी भवन येथे सोमवारी शेतकरी सुकाणू समितीच्यावतीने आयोजित शेतकरी जनजागरण संमेलनात बोलत होते.यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय किसान सभेचे डॉ. अशोक ढवळे, किशोर ढबाले, गणेश जगताप, श्रीनिवास खांदेवाले, महेश कोपूलवार, कवी ज्ञानेश वाकोडकर, गजेंद्र सुरकार आदींची उपस्थिती होती.डॉ. नवले पुढे म्हणाले, प्रमुख तीन मागण्यांवर एकमत करून सुकाणू समिती तयार झाली आहे. विविध आंदोलनानंतर सुरुवातीला राज्यातील भाजपा सरकार अल्प भुधारक शेतकऱ्यांचे कर्ज माफ करायला तयार होते; परंतु, ते आम्हाला मान्य नव्हते. त्यानंतर सरसकट कर्ज माफीचे आश्वासन मिळाल्याने आम्ही आंदोलन मागे घेतले. यात पुन्हा सरकारने दगाबाजी केली. पाच एकरपेक्षा जास्त भुधारक कोरडवाहू शेतकरी आहेत. ५८ लाख शेतकरी माय-माऊलीचे दागिने गहाण ठेऊन पुन्हा कर्ज मिळेल या आशेने बँकेकडून घेतलेल्या कर्जाची वेळीच परतफेड करतात. त्यांच्या तोंडाला देखील या सरकारने पाने पुसली. वेळोवेळी मुख्यमंत्र्यांकडून शब्द फिरविल्या जात असल्याने सरकारने जाहीर केलेला निर्णय कर्जमाफीचा की कर्जवसुलीचा हेच कळायला मार्ग नाही. चांगले पिकल्यावर सरकारने शेतकऱ्यांना वेठीस धरून लुटले आहे. आम्ही सरसकट कर्जमाफी मागतोय म्हणजे भिक मागत नसून शेतकऱ्यांना लुटून नेलेल्यातील मुठभर मागत आहे. २३ जुलैला पुण्याच्या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा निश्चित होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळावा. अन्यथा शेतकरी सरसकट कर्जमाफी किंवा सरसकट मुख्यमंत्र्यांची उचलबांगडी करतील. २६ जुलैपर्यंत राज्य सरकारने योग्य निर्णय घ्यावा अन्यथा त्यानंतर महाराष्ट्र पेटेल असा इशाराही यावेळी डॉ. नवले यांनी दिली.डॉ. अशोक ढवळे यांनी शेतकरी आत्महत्येत महाराष्ट्र देशात पहिला क्रमांकावर असून त्यातही महाराष्ट्रात विदर्भ प्रथम आहे. त्याला १९९१ चे शेतकरी विरोधी धोरण कारणीभूत आहे. उत्पादन खर्च वाढला असून त्याच्या तुलनेत सध्या शेतमालाला भाव नाही. ४३९ जाहीर सभा घेऊन निवडणुकीच्या काळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करू असे आश्वासन दिले होते. परंतु, सत्तेत आल्यावर त्यांनी न्यायालयात हे आम्ही लागू करू शकत नसल्याचे शपथपत्र न्यायालयात सादर केले. हा प्रकार शेतकऱ्यांची फसवणूक करणारा असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.संमेलनात गोंदिया येथील संजय देवळे, सुभाष काकुस्ते, गणेश जगताप, किशोर ढबाले, ज्ञानेश वाकोडकर, खांदेवाले, महेश कोपूलवार यांनीही विचार मांडले. संचालन नगरसेवक यशवंत झाडे यांनी केले तर आभार गजेंद्र सुरकार यांनी मानले. संमेलनाला सुकाणू समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शेकडो शेतकरी उपस्थित होते. राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता झाली.शहरातून काढली दुचाकी रॅलीसंमेलनाच्या पूर्वी सुकाणू समितीच्यावतीने स्थानिक शास्त्री चौक ते बजाज चौकापर्यंत दुचाकी रॅली काढण्यात आली. सदर रॅलीने पावडे नर्सिंग होम, शिवाजी चौक ते बजाज चौक असे मार्गक्रमण केले. शिवाजी चौकात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. दुचाकी रॅलीत मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले होते.