शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

शासनाची कर्जमाफी नसून कर्जवसुलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:00 IST

फडणवीस शासनाने ऐतिहासिक कर्जमाफी जाहीर केल्याचे सांगितले जात आहे. वास्तविकतेत ही कर्जमाफी शेतकऱ्यांची दिशाभुल करणारी आहे.

अजित नवले यांची टीका : सुकाणू समितीचे शेतकरी जनजागरण संमेलनलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : फडणवीस शासनाने ऐतिहासिक कर्जमाफी जाहीर केल्याचे सांगितले जात आहे. वास्तविकतेत ही कर्जमाफी शेतकऱ्यांची दिशाभुल करणारी आहे. या निर्णयाचा पीक कर्ज घेणाऱ्या केवळ २९.८२ टक्के शेतकऱ्यांनाच लाभ होणार आहे. यामुळे कर्जमाफीच्या निर्णयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नापास झाले असून जाहीर केलेली कर्जमाफी ही कर्जमाफी नसून ती कर्जवसुलीच असल्याची टीका सुकाणू समितीचे राज्य नियंत्रक डॉ. अजित नवले यांनी वर्धेत केली. ते स्थानिक माहेश्वरी भवन येथे सोमवारी शेतकरी सुकाणू समितीच्यावतीने आयोजित शेतकरी जनजागरण संमेलनात बोलत होते.यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय किसान सभेचे डॉ. अशोक ढवळे, किशोर ढबाले, गणेश जगताप, श्रीनिवास खांदेवाले, महेश कोपूलवार, कवी ज्ञानेश वाकोडकर, गजेंद्र सुरकार आदींची उपस्थिती होती.डॉ. नवले पुढे म्हणाले, प्रमुख तीन मागण्यांवर एकमत करून सुकाणू समिती तयार झाली आहे. विविध आंदोलनानंतर सुरुवातीला राज्यातील भाजपा सरकार अल्प भुधारक शेतकऱ्यांचे कर्ज माफ करायला तयार होते; परंतु, ते आम्हाला मान्य नव्हते. त्यानंतर सरसकट कर्ज माफीचे आश्वासन मिळाल्याने आम्ही आंदोलन मागे घेतले. यात पुन्हा सरकारने दगाबाजी केली. पाच एकरपेक्षा जास्त भुधारक कोरडवाहू शेतकरी आहेत. ५८ लाख शेतकरी माय-माऊलीचे दागिने गहाण ठेऊन पुन्हा कर्ज मिळेल या आशेने बँकेकडून घेतलेल्या कर्जाची वेळीच परतफेड करतात. त्यांच्या तोंडाला देखील या सरकारने पाने पुसली. वेळोवेळी मुख्यमंत्र्यांकडून शब्द फिरविल्या जात असल्याने सरकारने जाहीर केलेला निर्णय कर्जमाफीचा की कर्जवसुलीचा हेच कळायला मार्ग नाही. चांगले पिकल्यावर सरकारने शेतकऱ्यांना वेठीस धरून लुटले आहे. आम्ही सरसकट कर्जमाफी मागतोय म्हणजे भिक मागत नसून शेतकऱ्यांना लुटून नेलेल्यातील मुठभर मागत आहे. २३ जुलैला पुण्याच्या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा निश्चित होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळावा. अन्यथा शेतकरी सरसकट कर्जमाफी किंवा सरसकट मुख्यमंत्र्यांची उचलबांगडी करतील. २६ जुलैपर्यंत राज्य सरकारने योग्य निर्णय घ्यावा अन्यथा त्यानंतर महाराष्ट्र पेटेल असा इशाराही यावेळी डॉ. नवले यांनी दिली.डॉ. अशोक ढवळे यांनी शेतकरी आत्महत्येत महाराष्ट्र देशात पहिला क्रमांकावर असून त्यातही महाराष्ट्रात विदर्भ प्रथम आहे. त्याला १९९१ चे शेतकरी विरोधी धोरण कारणीभूत आहे. उत्पादन खर्च वाढला असून त्याच्या तुलनेत सध्या शेतमालाला भाव नाही. ४३९ जाहीर सभा घेऊन निवडणुकीच्या काळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करू असे आश्वासन दिले होते. परंतु, सत्तेत आल्यावर त्यांनी न्यायालयात हे आम्ही लागू करू शकत नसल्याचे शपथपत्र न्यायालयात सादर केले. हा प्रकार शेतकऱ्यांची फसवणूक करणारा असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.संमेलनात गोंदिया येथील संजय देवळे, सुभाष काकुस्ते, गणेश जगताप, किशोर ढबाले, ज्ञानेश वाकोडकर, खांदेवाले, महेश कोपूलवार यांनीही विचार मांडले. संचालन नगरसेवक यशवंत झाडे यांनी केले तर आभार गजेंद्र सुरकार यांनी मानले. संमेलनाला सुकाणू समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शेकडो शेतकरी उपस्थित होते. राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता झाली.शहरातून काढली दुचाकी रॅलीसंमेलनाच्या पूर्वी सुकाणू समितीच्यावतीने स्थानिक शास्त्री चौक ते बजाज चौकापर्यंत दुचाकी रॅली काढण्यात आली. सदर रॅलीने पावडे नर्सिंग होम, शिवाजी चौक ते बजाज चौक असे मार्गक्रमण केले. शिवाजी चौकात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. दुचाकी रॅलीत मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले होते.