शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

सायकलसाठी शासकीय दरबारी हेमंतच्या चकरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 22:32 IST

शासनाने दिव्यांगांना सन्मानाने जगता यावे याकरिता अर्थसहाय्य देणाऱ्या अनेक योजना कार्यान्वीत केल्या आहेत. या योजना असतानाही दिव्यांगाना त्याचा कवडीचाही लाभ होत नसल्याचे वर्धेत दिसत आहे.

ठळक मुद्देदिव्यांगाची हेळसांड : पोटाची खळगी भरण्यासाठी शिवतो चपला-जोडे

सचिन देवतळे ।लोकमत न्यूज नेटवर्कविरूळ (आकाजी) : शासनाने दिव्यांगांना सन्मानाने जगता यावे याकरिता अर्थसहाय्य देणाऱ्या अनेक योजना कार्यान्वीत केल्या आहेत. या योजना असतानाही दिव्यांगाना त्याचा कवडीचाही लाभ होत नसल्याचे वर्धेत दिसत आहे. याच शासकीय योजनेतून एक तीनइ चाकी सायकल मिळावी याकरिता रसुलाबाद येथील दिव्यांग हेमंत शेगोकार शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहे. पण त्याला कोणाकडूनही मदत मिळत नसल्याचे विदारक वास्तव आहे.हेमंतला वृद्ध आई सतत आजारी असलेली पत्नी व दोन चिमुकली मुलं असा संसाराचा गाढा रेटायचा आहे. संसाराचा हा गाडा चालविण्याकरिता हेमंत हा रोज २० की.मी.चा प्रवास करून तीनचाकी सायकल वर गावोगावी फीरुन चपला व जोडे शिवतो. यातुन मिळणाºया पैशातुन त्याचा उदरनिर्वाह चालतो. वृद्ध आईचा व आजारी असलेल्या पत्नीचा औषधाचा खर्च मुलांचे शिक्षण व पोटाची आग या कमाईतुन तो विझविण्याचा केविलवाणा प्रयत्न करतो. तीन चाकी सायकलवर तो आपले दुकान थाटुन गावोगावी चपला जोडे शिवायचा धंदा करतो. १५ वर्षांपासून त्याचा हा व्यवसाय सुरू आहे. सध्या त्याच्याकडे असलेल्या सायकलची खस्ता हाल झाल्याने त्याला या सायकलवरून प्रवास करणे कठीण झाले आहे. ही सायकल चालविताना त्याला थकवा येतो. यातून चक्कर आल्याने अनेक वेळा तो चक्कर येवून पडल्याचे प्रकार घडले आहेत. याचा त्याच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होवून त्याच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. यासाठी तो बँटरीवरची सायकल मिळावी म्हणून त्याने दोन वर्षांपूर्वी शासकीय दप्तरी अर्ज केला; परंतु दोन वर्षांपासून अजुनही त्याला बँटरीवर चालणारी सायकल मिळालीच नाही. या मागणीकरिता तो दोन वर्षांपासून शासकीय दप्तरी चकरा मारतो आहे. आमदार खासदारांनाही तो भेटला. पण त्याला कुणाकडूनच मदत मिळाली नाही.जन्मत:च दोन्ही पायांनी अधू असलेल्या हेमंतला चालताच येत नाही. इतरांच्या मदतीने दिवसभराच्या क्रीया पार पाडाव्या लागतात. कुणाची मदत भेटली तर ठीक नाही तर त्याच जागेवर पडुन राहावे लागते. एखाद्या परक्या व्यक्तीला तो सायकलवर बसून मागतो. चक्क २० किमी अंतर काूपन तो संसाराचा गाडा ओढतो. राहायला पडके घर आहे. शासनाच्या योजनेतून नवे घर मिळावे याकरिताही त्याचा संघर्ष सुरूच आहे.हेमंतची अवस्था पाहिल्यावर दिव्यांगाकरिता असलेल्या शासनाच्या योजना कदाचित त्याच्याकरिता नसाव्या असाच प्रयत्य येतो. यामुळे शासनाच्या अधिकाºयांनी गावातील लोकप्रतिनिधींनी हेमंतच्या वेदाना समजून त्याला मदत करून शासनाच्या योजनाचा लाभ मिळवून देण्याकरिता कार्य करण्याची गरज आहे.घरकुलासाठीही धावपळप्रत्येकाना हक्काचे घर मिळावे याकरिता शासनाच्यावतीने पंतप्रधान घरकुलन योजना अंमलात आणली. या योजनेत दारिद्र्य रेषेखाली असलेल्या व्यक्तीला घर देण्याकरिता शासन अनुदानही देत आहे. सर्वच निकषात बसत असलेल्या हेमंतला मात्र या घरकुलाकरिता संघर्ष करावा लागत असल्याचे दिसते.