शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

चार पालिका प्लास्टिकवर गप्पच

By admin | Updated: November 6, 2014 02:04 IST

प्लास्टिकचा अतिरेकी वापर होत असल्याने शहरात अस्वच्छता पसरली आहे़ नाल्या तुंबत असून सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे़ ...

वर्धा : प्लास्टिकचा अतिरेकी वापर होत असल्याने शहरात अस्वच्छता पसरली आहे़ नाल्या तुंबत असून सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे़ यामुळे नगर विकास विभागाद्वारे नगर पालिकांच्या हद्दीत प्लास्टिक बंदीच्या निर्णयावर कठोर अंमल करण्याचे आदेश देण्यात आले आहे़ यानुसार वर्धा जिल्ह्यातील आर्वी व वर्धा नगर परिषदेने पुढाकार घेत कारवाई केली; पण जिल्ह्यातील चार नगर पालिकांनी अद्याप हे निर्देश गांभीर्याने घेतले नसल्याचेच दिसते़ प्लास्टिकच्या अतिवापरामुळे अस्वच्छता वाढली असून जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे़ शिवाय पर्यावरणाला धोका निर्माण झाल्याने शासनाने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकवर बंदी घातली आहे़ राज्यभर ही बंदी लागू असून यापूर्वी सदर आदेशाचे गंभीरतेने पालन झाले नाही़ यामुळे नगर विकास विभागाच्यावतीने या निर्णयावर कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश जारी केले आहेत़ यामुळे राज्यातील बहुतांश नगर पालिका कामाला लागल्या आहेत़ जिल्ह्यातील वर्धा आणि आर्वी नगर पालिकेनेही सूचना जारी करून नागरिक तसेच व्यापाऱ्यांना ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लास्टिक आढळून आल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा दिला़ यानंतर दोन्ही पालिकांनी तत्सम शोध मोहीम राबवून व्यावसायिक व नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला़ यात वर्धा शहरात मंगळवारी (दि़४) नगर परिषदेने कारवाई करीत आठ दुकांनावर धाड टाकली़ यात ५०० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. शिवाय त्यांना दंडही ठोठावण्यात आला़ शासनाच्या निर्देशानुसार पालिका प्रशासनाने कारवाईचा सपाटा सुरू केला आहे़ यात वर्धेत ऩप़ मुख्याधिकारी, नायब तहसीलदार व पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई पार पाडली़ प्लास्टिक विकणाऱ्या व्यावसायिकांना पालिकेने प्रत्येक एक हजार रुपयांचा दंडही ठोठावला़ शिवाय भाजी विक्रीसह अन्य व्यवसाय करणाऱ्या लहान व्यावसायिकांच्या दुकानांचीही झडती घेतली. पालिकेने केवळ धाडच टाकली नाही तर, शासनाने दिलेल्या नवीन नियमांची माहितीही देण्यात आली़ शिवाय ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लास्टिक वापरल्यास दंडात्मक कारवाईबाबतही माहिती दिली़वर्धा आणि आर्वी नगर परिषद प्रशासनाने कारवाईचा धडाका सुरू केला असताना पुलगाव, देवळी, हिंगणघाट आणि सिंदी (रेल्वे) नगर परिषद प्रशासनाला हा निर्णय निर्णय अधिक गंभीरतेने घेण्याची गरज वाटली नसल्याचेच दिसून येत आहे़ या चार पालिका प्रशासनाने अद्याप तत्सम सूचनाही जारी केल्या नाहीत़ यामुळे त्या-त्या पालिकांच्या हद्दीत ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक थैल्या वापरण्यास अधिकृत परवानगी देण्यात आली आहे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़ चारही नगर पालिका प्रशासनाने प्लास्टिक निर्मूलन मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे़(कार्यालय प्रतिनिधी)