शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

चार पालिका प्लास्टिकवर गप्पच

By admin | Updated: November 6, 2014 02:04 IST

प्लास्टिकचा अतिरेकी वापर होत असल्याने शहरात अस्वच्छता पसरली आहे़ नाल्या तुंबत असून सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे़ ...

वर्धा : प्लास्टिकचा अतिरेकी वापर होत असल्याने शहरात अस्वच्छता पसरली आहे़ नाल्या तुंबत असून सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे़ यामुळे नगर विकास विभागाद्वारे नगर पालिकांच्या हद्दीत प्लास्टिक बंदीच्या निर्णयावर कठोर अंमल करण्याचे आदेश देण्यात आले आहे़ यानुसार वर्धा जिल्ह्यातील आर्वी व वर्धा नगर परिषदेने पुढाकार घेत कारवाई केली; पण जिल्ह्यातील चार नगर पालिकांनी अद्याप हे निर्देश गांभीर्याने घेतले नसल्याचेच दिसते़ प्लास्टिकच्या अतिवापरामुळे अस्वच्छता वाढली असून जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे़ शिवाय पर्यावरणाला धोका निर्माण झाल्याने शासनाने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकवर बंदी घातली आहे़ राज्यभर ही बंदी लागू असून यापूर्वी सदर आदेशाचे गंभीरतेने पालन झाले नाही़ यामुळे नगर विकास विभागाच्यावतीने या निर्णयावर कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश जारी केले आहेत़ यामुळे राज्यातील बहुतांश नगर पालिका कामाला लागल्या आहेत़ जिल्ह्यातील वर्धा आणि आर्वी नगर पालिकेनेही सूचना जारी करून नागरिक तसेच व्यापाऱ्यांना ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लास्टिक आढळून आल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा दिला़ यानंतर दोन्ही पालिकांनी तत्सम शोध मोहीम राबवून व्यावसायिक व नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला़ यात वर्धा शहरात मंगळवारी (दि़४) नगर परिषदेने कारवाई करीत आठ दुकांनावर धाड टाकली़ यात ५०० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. शिवाय त्यांना दंडही ठोठावण्यात आला़ शासनाच्या निर्देशानुसार पालिका प्रशासनाने कारवाईचा सपाटा सुरू केला आहे़ यात वर्धेत ऩप़ मुख्याधिकारी, नायब तहसीलदार व पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई पार पाडली़ प्लास्टिक विकणाऱ्या व्यावसायिकांना पालिकेने प्रत्येक एक हजार रुपयांचा दंडही ठोठावला़ शिवाय भाजी विक्रीसह अन्य व्यवसाय करणाऱ्या लहान व्यावसायिकांच्या दुकानांचीही झडती घेतली. पालिकेने केवळ धाडच टाकली नाही तर, शासनाने दिलेल्या नवीन नियमांची माहितीही देण्यात आली़ शिवाय ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लास्टिक वापरल्यास दंडात्मक कारवाईबाबतही माहिती दिली़वर्धा आणि आर्वी नगर परिषद प्रशासनाने कारवाईचा धडाका सुरू केला असताना पुलगाव, देवळी, हिंगणघाट आणि सिंदी (रेल्वे) नगर परिषद प्रशासनाला हा निर्णय निर्णय अधिक गंभीरतेने घेण्याची गरज वाटली नसल्याचेच दिसून येत आहे़ या चार पालिका प्रशासनाने अद्याप तत्सम सूचनाही जारी केल्या नाहीत़ यामुळे त्या-त्या पालिकांच्या हद्दीत ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक थैल्या वापरण्यास अधिकृत परवानगी देण्यात आली आहे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़ चारही नगर पालिका प्रशासनाने प्लास्टिक निर्मूलन मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे़(कार्यालय प्रतिनिधी)