शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

सेवाग्राम परिसरात काँग्रेसला अच्छे दिन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 04:49 IST

जिल्ह्यातील चारपैकी तीन मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तर एका मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवित आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची कर्मभूमी असलेल्या वर्धा जिल्ह्यात २०१४ च्या मोदी लाटेतही दोन विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाने विजय मिळविला होता. यावेळीही काँग्रेसची परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील चारपैकी तीन मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तर एका मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवित आहे. देवळी मतदारसंघात शिवसेनेने समीर देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. येथे भाजपचे जिल्हाध्यक्ष बंडखोर म्हणून निवडणूक लढवित आहे. तर हिंगणघाट मतदारसंघात भाजप उमेदवाराविरोधात शिवसेनेच्या माजी आमदाराने बंड केले आहे. देवळी मतदारसंघात विद्यमान काँग्रेस आमदार रणजित कांबळे यांच्यासमोर शिवसेना-भाजपचे उमेदवार समीर देशमुख, बंडखोर अपक्ष उमेदवाराचे तगडे आवाहन आहे. या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर मतविभाजन होण्याची चिन्हे आहेत.

वर्धा विधानसभा मतदार संघात दोनवेळा पराभूत झालेले शेखर शेंडे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. त्यांची लढत भाजपचे डॉ. पंकज भोयर यांच्यासोबत आहे. आर्वी मतदारसंघात काँग्रेस व भाजपमध्ये थेट लढत आहे. काँग्रेसकडे असलेल्या या मतदार संघात विद्यमान आमदार अमर काळे यांचा सामना भाजपचे दादाराव केचे यांच्याशी आहे. मागील पाच वर्षांत ग्रामीण भागात भाजपने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. साडेबारा वर्षांपासून अ‍ॅन्टी इनकम्बन्सी या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर काँग्रेससमोर आहे.

अशीच अ‍ॅन्टी इनकम्बन्सी देवळी मतदारसंघातही दिसून येत आहे. आर्वीत भाजपला विजयाची मोठी आशा आहे. हिंगणघाट मतदारसंघात भाजपचे समीर कुणावार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रा. राजू तिमांडे व शिवसेना बंडखोर अशोक शिंदे यांच्यात लढत आहे. गेल्यावेळी ६५ हजार मतांनी विजयी होणारे कुणावार यांचे मताधिक्य या निवडणुकीत घटण्याची शक्यता आहे. संपूर्ण वर्धा जिल्ह्याच्या चार मतदारसंघात जातीय समीकरणाने मोठी उचल खाल्ल्याचे चित्र आहे.

हिंगणघाट मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस लढत आहे. तर वर्ध्यातून राष्ट्रवादीची काँग्रेसला साथ आहे. देवळी मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचे समीर देशमुख यांच्या प्रचाराला लागली आहे. आर्वी मतदारसंघात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपच्या तंबूत शिरले आहेत. वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी, दलित, मुस्लिम मतदार यांच्यात होणाऱ्या विभाजनावर निवडणुकांचे निकाल अवलंबून आहे. वर्धा, आर्वी या मतदारसंघात भाजप-काँग्रेसमध्येच थेट लढत आहे.देवळी मतदारसंघात काँग्रेस आ. रणजित कांबळेंसह १४ उमेदवार रिंगणात आहेत. येथे अपक्ष उमेदवारही तगडे असल्याने मतविभाजन कोण किती प्रमाणात करतो, यावर येथील निकाल अवलंबून राहणार आहे.

टॅग्स :wardha-acवर्धाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019