शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

सेवाग्राम परिसरात काँग्रेसला अच्छे दिन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 04:49 IST

जिल्ह्यातील चारपैकी तीन मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तर एका मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवित आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची कर्मभूमी असलेल्या वर्धा जिल्ह्यात २०१४ च्या मोदी लाटेतही दोन विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाने विजय मिळविला होता. यावेळीही काँग्रेसची परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील चारपैकी तीन मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तर एका मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवित आहे. देवळी मतदारसंघात शिवसेनेने समीर देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. येथे भाजपचे जिल्हाध्यक्ष बंडखोर म्हणून निवडणूक लढवित आहे. तर हिंगणघाट मतदारसंघात भाजप उमेदवाराविरोधात शिवसेनेच्या माजी आमदाराने बंड केले आहे. देवळी मतदारसंघात विद्यमान काँग्रेस आमदार रणजित कांबळे यांच्यासमोर शिवसेना-भाजपचे उमेदवार समीर देशमुख, बंडखोर अपक्ष उमेदवाराचे तगडे आवाहन आहे. या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर मतविभाजन होण्याची चिन्हे आहेत.

वर्धा विधानसभा मतदार संघात दोनवेळा पराभूत झालेले शेखर शेंडे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. त्यांची लढत भाजपचे डॉ. पंकज भोयर यांच्यासोबत आहे. आर्वी मतदारसंघात काँग्रेस व भाजपमध्ये थेट लढत आहे. काँग्रेसकडे असलेल्या या मतदार संघात विद्यमान आमदार अमर काळे यांचा सामना भाजपचे दादाराव केचे यांच्याशी आहे. मागील पाच वर्षांत ग्रामीण भागात भाजपने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. साडेबारा वर्षांपासून अ‍ॅन्टी इनकम्बन्सी या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर काँग्रेससमोर आहे.

अशीच अ‍ॅन्टी इनकम्बन्सी देवळी मतदारसंघातही दिसून येत आहे. आर्वीत भाजपला विजयाची मोठी आशा आहे. हिंगणघाट मतदारसंघात भाजपचे समीर कुणावार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रा. राजू तिमांडे व शिवसेना बंडखोर अशोक शिंदे यांच्यात लढत आहे. गेल्यावेळी ६५ हजार मतांनी विजयी होणारे कुणावार यांचे मताधिक्य या निवडणुकीत घटण्याची शक्यता आहे. संपूर्ण वर्धा जिल्ह्याच्या चार मतदारसंघात जातीय समीकरणाने मोठी उचल खाल्ल्याचे चित्र आहे.

हिंगणघाट मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस लढत आहे. तर वर्ध्यातून राष्ट्रवादीची काँग्रेसला साथ आहे. देवळी मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचे समीर देशमुख यांच्या प्रचाराला लागली आहे. आर्वी मतदारसंघात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपच्या तंबूत शिरले आहेत. वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी, दलित, मुस्लिम मतदार यांच्यात होणाऱ्या विभाजनावर निवडणुकांचे निकाल अवलंबून आहे. वर्धा, आर्वी या मतदारसंघात भाजप-काँग्रेसमध्येच थेट लढत आहे.देवळी मतदारसंघात काँग्रेस आ. रणजित कांबळेंसह १४ उमेदवार रिंगणात आहेत. येथे अपक्ष उमेदवारही तगडे असल्याने मतविभाजन कोण किती प्रमाणात करतो, यावर येथील निकाल अवलंबून राहणार आहे.

टॅग्स :wardha-acवर्धाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019