शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

सेवाग्राम परिसरात काँग्रेसला अच्छे दिन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 04:49 IST

जिल्ह्यातील चारपैकी तीन मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तर एका मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवित आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची कर्मभूमी असलेल्या वर्धा जिल्ह्यात २०१४ च्या मोदी लाटेतही दोन विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाने विजय मिळविला होता. यावेळीही काँग्रेसची परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील चारपैकी तीन मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तर एका मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवित आहे. देवळी मतदारसंघात शिवसेनेने समीर देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. येथे भाजपचे जिल्हाध्यक्ष बंडखोर म्हणून निवडणूक लढवित आहे. तर हिंगणघाट मतदारसंघात भाजप उमेदवाराविरोधात शिवसेनेच्या माजी आमदाराने बंड केले आहे. देवळी मतदारसंघात विद्यमान काँग्रेस आमदार रणजित कांबळे यांच्यासमोर शिवसेना-भाजपचे उमेदवार समीर देशमुख, बंडखोर अपक्ष उमेदवाराचे तगडे आवाहन आहे. या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर मतविभाजन होण्याची चिन्हे आहेत.

वर्धा विधानसभा मतदार संघात दोनवेळा पराभूत झालेले शेखर शेंडे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. त्यांची लढत भाजपचे डॉ. पंकज भोयर यांच्यासोबत आहे. आर्वी मतदारसंघात काँग्रेस व भाजपमध्ये थेट लढत आहे. काँग्रेसकडे असलेल्या या मतदार संघात विद्यमान आमदार अमर काळे यांचा सामना भाजपचे दादाराव केचे यांच्याशी आहे. मागील पाच वर्षांत ग्रामीण भागात भाजपने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. साडेबारा वर्षांपासून अ‍ॅन्टी इनकम्बन्सी या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर काँग्रेससमोर आहे.

अशीच अ‍ॅन्टी इनकम्बन्सी देवळी मतदारसंघातही दिसून येत आहे. आर्वीत भाजपला विजयाची मोठी आशा आहे. हिंगणघाट मतदारसंघात भाजपचे समीर कुणावार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रा. राजू तिमांडे व शिवसेना बंडखोर अशोक शिंदे यांच्यात लढत आहे. गेल्यावेळी ६५ हजार मतांनी विजयी होणारे कुणावार यांचे मताधिक्य या निवडणुकीत घटण्याची शक्यता आहे. संपूर्ण वर्धा जिल्ह्याच्या चार मतदारसंघात जातीय समीकरणाने मोठी उचल खाल्ल्याचे चित्र आहे.

हिंगणघाट मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस लढत आहे. तर वर्ध्यातून राष्ट्रवादीची काँग्रेसला साथ आहे. देवळी मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचे समीर देशमुख यांच्या प्रचाराला लागली आहे. आर्वी मतदारसंघात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपच्या तंबूत शिरले आहेत. वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी, दलित, मुस्लिम मतदार यांच्यात होणाऱ्या विभाजनावर निवडणुकांचे निकाल अवलंबून आहे. वर्धा, आर्वी या मतदारसंघात भाजप-काँग्रेसमध्येच थेट लढत आहे.देवळी मतदारसंघात काँग्रेस आ. रणजित कांबळेंसह १४ उमेदवार रिंगणात आहेत. येथे अपक्ष उमेदवारही तगडे असल्याने मतविभाजन कोण किती प्रमाणात करतो, यावर येथील निकाल अवलंबून राहणार आहे.

टॅग्स :wardha-acवर्धाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019