शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

देव तारी त्याला कोण मारी ....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 00:50 IST

आयुष्याची दोरी जर घट्ट बांधलेली असली तर कोणतेही संकट येवो कोणीतरी देवदूत संकटमोचक बनून येतो व पुन्हा नव्याने प्राण फुंकून जातो असाच अनुभव येथे आला.येथील नेताजी वार्डातील टीकाराम मुळे (४२) हा शेतकरी पुराच्या पाण्यात अडकला होता.

ठळक मुद्देयुवकांनी पुरातून शेतकऱ्याला काढले बाहेर : शेतात कामासाठी गेले अन् अडकले

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : आयुष्याची दोरी जर घट्ट बांधलेली असली तर कोणतेही संकट येवो कोणीतरी देवदूत संकटमोचक बनून येतो व पुन्हा नव्याने प्राण फुंकून जातो असाच अनुभव येथे आला.येथील नेताजी वार्डातील टीकाराम मुळे (४२) हा शेतकरी पुराच्या पाण्यात अडकला होता. पाणी वाढल्याने तब्बल चार तास तो झाडावर थांबून राहिला अखेरीस पुराच्या वेढ्यातून त्याला स्थानिक युवकांनी सुखरूप बाहेर काढले.येथून ५ कि.मी.अंतरावरील शहालगडी देवस्थानच्या मागे असलेल्या जुनोना शिवारात शनिवारी शेतात काम करण्यासाठी टीकाराम मुळे निघून गेले होते. दिवसभर काम करीत असताना कामाच्या धावपळीत आजूबाजूचा परिसर पुराच्या पाण्याने भरला हे त्याच्या लक्षात आले नाही. ज्यावेळी त्याचे लक्ष्य गेले तेव्हा बाहेर जाणारे रस्ते पुरामुळे बंद झाले होते.अन वेगाने पुराचे पाणी वाढत होते. पहाता पहाता टीकाराम असलेला पूर्ण परिसर पाण्यात वेढला गेला.जीव वाचविण्यासाठी त्यांनी बाजूला असलेल्या झाडाचा आश्रय घेतला. मदतीसाठी जीवाच्या आकांताने ते ओरडत होते. दूरवरच्या एका शेतकºयांला झाडावर बसलेला टीकाराम दिसला. त्याने टीकारामच्या घरी जाऊन त्याच्या पत्नीला यांची माहिती दिली. पत्नीने तत्काळ तहसील कार्यालय गाठून तहसीलदार सचिन यादव यांना माहिती दिली.त्यांनी पोलिसांना सूचना दिली त्यानंतर ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांनी तातडीने आपली चमू तयार केली. २० ते २५ पोलिसांचे पथक जीवनरक्षक साहित्यासह रवाना झाले.त्याचवेळी देवा जोशी, सूरज काटकर, अशोक मोरे व न प सदस्य धंनजय बकाने हे घटनास्थळी पोहचले. रात्रीचा किर्रर काळोखं,पुराचं वाढतं पाणी ,आणि सर्वत्र अंधारच साम्राज्य अशा बिकट परिस्थितीत त्याला सुखरूप परत आणणे हे प्रचंड आव्हान होतं. परंतु हे आव्हान स्वीकारलं चार युवकांनी. त्या काळोख्या रात्री त्या चौघांनीही भर नदीच्या पुरात उड्या घेतल्या.पोहत त्या झाडापर्यत पोहचले. दोराच्या सहाय्याने टीकारामला १५ फूट झाडावरून खाली उतरविले.त्या अंधाºया रात्री ट्यूबच्या सहाय्याने चौघांनी त्याला सुखरूप काठावर आणले.या युवकांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. समुद्रपूर , हिंगणघाट तालुक्याला पावसाने जबर तडाखा दिला.अनेक लोक पुरात अडकले होते त्यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने सुखरूप बाहेर काढले.

टॅग्स :floodपूरFarmerशेतकरी