शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

देव तारी त्याला कोण मारी ....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 00:50 IST

आयुष्याची दोरी जर घट्ट बांधलेली असली तर कोणतेही संकट येवो कोणीतरी देवदूत संकटमोचक बनून येतो व पुन्हा नव्याने प्राण फुंकून जातो असाच अनुभव येथे आला.येथील नेताजी वार्डातील टीकाराम मुळे (४२) हा शेतकरी पुराच्या पाण्यात अडकला होता.

ठळक मुद्देयुवकांनी पुरातून शेतकऱ्याला काढले बाहेर : शेतात कामासाठी गेले अन् अडकले

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : आयुष्याची दोरी जर घट्ट बांधलेली असली तर कोणतेही संकट येवो कोणीतरी देवदूत संकटमोचक बनून येतो व पुन्हा नव्याने प्राण फुंकून जातो असाच अनुभव येथे आला.येथील नेताजी वार्डातील टीकाराम मुळे (४२) हा शेतकरी पुराच्या पाण्यात अडकला होता. पाणी वाढल्याने तब्बल चार तास तो झाडावर थांबून राहिला अखेरीस पुराच्या वेढ्यातून त्याला स्थानिक युवकांनी सुखरूप बाहेर काढले.येथून ५ कि.मी.अंतरावरील शहालगडी देवस्थानच्या मागे असलेल्या जुनोना शिवारात शनिवारी शेतात काम करण्यासाठी टीकाराम मुळे निघून गेले होते. दिवसभर काम करीत असताना कामाच्या धावपळीत आजूबाजूचा परिसर पुराच्या पाण्याने भरला हे त्याच्या लक्षात आले नाही. ज्यावेळी त्याचे लक्ष्य गेले तेव्हा बाहेर जाणारे रस्ते पुरामुळे बंद झाले होते.अन वेगाने पुराचे पाणी वाढत होते. पहाता पहाता टीकाराम असलेला पूर्ण परिसर पाण्यात वेढला गेला.जीव वाचविण्यासाठी त्यांनी बाजूला असलेल्या झाडाचा आश्रय घेतला. मदतीसाठी जीवाच्या आकांताने ते ओरडत होते. दूरवरच्या एका शेतकºयांला झाडावर बसलेला टीकाराम दिसला. त्याने टीकारामच्या घरी जाऊन त्याच्या पत्नीला यांची माहिती दिली. पत्नीने तत्काळ तहसील कार्यालय गाठून तहसीलदार सचिन यादव यांना माहिती दिली.त्यांनी पोलिसांना सूचना दिली त्यानंतर ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांनी तातडीने आपली चमू तयार केली. २० ते २५ पोलिसांचे पथक जीवनरक्षक साहित्यासह रवाना झाले.त्याचवेळी देवा जोशी, सूरज काटकर, अशोक मोरे व न प सदस्य धंनजय बकाने हे घटनास्थळी पोहचले. रात्रीचा किर्रर काळोखं,पुराचं वाढतं पाणी ,आणि सर्वत्र अंधारच साम्राज्य अशा बिकट परिस्थितीत त्याला सुखरूप परत आणणे हे प्रचंड आव्हान होतं. परंतु हे आव्हान स्वीकारलं चार युवकांनी. त्या काळोख्या रात्री त्या चौघांनीही भर नदीच्या पुरात उड्या घेतल्या.पोहत त्या झाडापर्यत पोहचले. दोराच्या सहाय्याने टीकारामला १५ फूट झाडावरून खाली उतरविले.त्या अंधाºया रात्री ट्यूबच्या सहाय्याने चौघांनी त्याला सुखरूप काठावर आणले.या युवकांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. समुद्रपूर , हिंगणघाट तालुक्याला पावसाने जबर तडाखा दिला.अनेक लोक पुरात अडकले होते त्यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने सुखरूप बाहेर काढले.

टॅग्स :floodपूरFarmerशेतकरी