शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
2
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
3
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!
4
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
5
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
6
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
7
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
8
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
9
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
10
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
11
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
12
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
13
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
14
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
15
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
16
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
17
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
18
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
19
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
20
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी

ग्रामीण भागातून गोबरगॅस कालबाह्य

By admin | Updated: June 12, 2016 01:53 IST

ग्रामीण भागात शेतीच्या कामाकरिता ट्रॅक्टरसह अन्य यंत्राचाही मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे. यातच सततचा दुष्काळ असल्याने जनावरांकरिता चारा मिळेना.

अनास्था : चारा व पाणी टंचाईमुळे गोधनात घटपिंपळखुटा : ग्रामीण भागात शेतीच्या कामाकरिता ट्रॅक्टरसह अन्य यंत्राचाही मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे. यातच सततचा दुष्काळ असल्याने जनावरांकरिता चारा मिळेना. परिणामी शेतकऱ्यांना पशुधन पाळणे कठीण झाले आहे. पशुधन घटल्याने शेण व शेणखत कमी झाले. यामुळे एकेकाळी महत्त्वाच्या घटक असलेला गोबर गॅस आता ग्रामीण भागातून कालबाह्य होत असल्याचे चिन्ह आहे.पिंपळखुटा व परिसर हा पशुधनाकरिता ओळखला जातो. यामुळे येथे गोबर गॅसची संख्या अधिक होती. मात्र आता शेण मिळणेही दुरापास्त होत असल्याने गोबर गॅसचा वापर करणे गैरसोयीचे ठरत आहे. शेती बरोबरच शेतकरी जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्ध व्यवसाय करीत असतो. आजही शेतकऱ्यांजवळ जनावरे आहेत. गुरेढोरे पाळण्याबरोबरच यातून इंधन मिळत होते. त्यामुळे पूर्वी ज्यांच्या घरी शेती आहे अशा बहुतांश शेतकऱ्यांच्या घरी गोबर गॅस पहायला मिळत असे. पाळीव जनावरापासून दुध व घरगुती वापराकरिता गॅसला इंधन मिळत होते. यामुळे गोबर गॅसचा वापर मोठया प्रमाणावर वाढला होता. पण कालांतराने पाणीटंचाई, चारा समस्या तथा यंत्राचा वापर वाढल्यामुळे पशुधन घटले. शेतीच्या यांत्रिक सामुग्रीत आधुनिकता आल्याने गायी बैलाचा वापर शेतीसाठी कमी प्रमाणात करण्यात येत आहे. चारा टंचाईमुळे जनावरांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. त्यामुळे शेण मिळत नाही. गोबर गॅस कालबाह्य होत असून त्याची जागा गॅस सिलिंडरनी घेतली आहे. पूर्वी शेतकऱ्यांच्या घरोघरी असणारे गोबर गॅस आता कालबाह्य झालेले दिसतात.कमी खर्चात संपूर्ण कुटूंबाकरिता लागत असलेल्या इंधनाची गरज गोबरगॅसमुळे आधी पूर्ण होत असे. त्यातच एलपीजी सिलिंडरचे दर वाढले आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांना ही बाब न परवडणारी आहे. शासनाने अनुदान देवून ही योजना पुनर्जीवित करण्याची गरज व्यक्त होत आहे. शासनाने याकडे लक्ष देत पशुधन वाढविण्यासाठी तरतुद केल्यास गोबर गॅसकरिता इंधनाची समस्या संपुष्टात येईल. त्यामुळे याकडे नव्याने लक्ष देण्याची गरज ग्रामस्थ व जाणकार व्यक्त करीत आहे.(वार्ताहर)पशुधन वाढविण्यासाठी उपाययोजना करण्याची गरजपशुधनाकरिता ओळख असलेल्या आर्वी तालुक्यात गोबर गॅसची संख्या अधिक होती. मात्र आता शेण मिळणे दुरापास्त होत असल्याने गोबर गॅसचा वापर करणे गैरसोयीचे ठरत आहे. परिणामी एलपीजी सिलिंडर वापरावे लागते. हे सिलिंडर महागडे असून अनेकदा खात्यात सबसिडी जमा होत नसल्याने बँकेत चकरा माराव्या लागतात. यात शेतकऱ्यांना नाहक भुर्दंड सोसावा लागतो. पशुधन वाढविण्यासाठी शासकीय स्तरावर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.