शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

ग्रामीण भागातून गोबरगॅस कालबाह्य

By admin | Updated: June 12, 2016 01:53 IST

ग्रामीण भागात शेतीच्या कामाकरिता ट्रॅक्टरसह अन्य यंत्राचाही मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे. यातच सततचा दुष्काळ असल्याने जनावरांकरिता चारा मिळेना.

अनास्था : चारा व पाणी टंचाईमुळे गोधनात घटपिंपळखुटा : ग्रामीण भागात शेतीच्या कामाकरिता ट्रॅक्टरसह अन्य यंत्राचाही मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे. यातच सततचा दुष्काळ असल्याने जनावरांकरिता चारा मिळेना. परिणामी शेतकऱ्यांना पशुधन पाळणे कठीण झाले आहे. पशुधन घटल्याने शेण व शेणखत कमी झाले. यामुळे एकेकाळी महत्त्वाच्या घटक असलेला गोबर गॅस आता ग्रामीण भागातून कालबाह्य होत असल्याचे चिन्ह आहे.पिंपळखुटा व परिसर हा पशुधनाकरिता ओळखला जातो. यामुळे येथे गोबर गॅसची संख्या अधिक होती. मात्र आता शेण मिळणेही दुरापास्त होत असल्याने गोबर गॅसचा वापर करणे गैरसोयीचे ठरत आहे. शेती बरोबरच शेतकरी जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्ध व्यवसाय करीत असतो. आजही शेतकऱ्यांजवळ जनावरे आहेत. गुरेढोरे पाळण्याबरोबरच यातून इंधन मिळत होते. त्यामुळे पूर्वी ज्यांच्या घरी शेती आहे अशा बहुतांश शेतकऱ्यांच्या घरी गोबर गॅस पहायला मिळत असे. पाळीव जनावरापासून दुध व घरगुती वापराकरिता गॅसला इंधन मिळत होते. यामुळे गोबर गॅसचा वापर मोठया प्रमाणावर वाढला होता. पण कालांतराने पाणीटंचाई, चारा समस्या तथा यंत्राचा वापर वाढल्यामुळे पशुधन घटले. शेतीच्या यांत्रिक सामुग्रीत आधुनिकता आल्याने गायी बैलाचा वापर शेतीसाठी कमी प्रमाणात करण्यात येत आहे. चारा टंचाईमुळे जनावरांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. त्यामुळे शेण मिळत नाही. गोबर गॅस कालबाह्य होत असून त्याची जागा गॅस सिलिंडरनी घेतली आहे. पूर्वी शेतकऱ्यांच्या घरोघरी असणारे गोबर गॅस आता कालबाह्य झालेले दिसतात.कमी खर्चात संपूर्ण कुटूंबाकरिता लागत असलेल्या इंधनाची गरज गोबरगॅसमुळे आधी पूर्ण होत असे. त्यातच एलपीजी सिलिंडरचे दर वाढले आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांना ही बाब न परवडणारी आहे. शासनाने अनुदान देवून ही योजना पुनर्जीवित करण्याची गरज व्यक्त होत आहे. शासनाने याकडे लक्ष देत पशुधन वाढविण्यासाठी तरतुद केल्यास गोबर गॅसकरिता इंधनाची समस्या संपुष्टात येईल. त्यामुळे याकडे नव्याने लक्ष देण्याची गरज ग्रामस्थ व जाणकार व्यक्त करीत आहे.(वार्ताहर)पशुधन वाढविण्यासाठी उपाययोजना करण्याची गरजपशुधनाकरिता ओळख असलेल्या आर्वी तालुक्यात गोबर गॅसची संख्या अधिक होती. मात्र आता शेण मिळणे दुरापास्त होत असल्याने गोबर गॅसचा वापर करणे गैरसोयीचे ठरत आहे. परिणामी एलपीजी सिलिंडर वापरावे लागते. हे सिलिंडर महागडे असून अनेकदा खात्यात सबसिडी जमा होत नसल्याने बँकेत चकरा माराव्या लागतात. यात शेतकऱ्यांना नाहक भुर्दंड सोसावा लागतो. पशुधन वाढविण्यासाठी शासकीय स्तरावर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.