शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
2
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
4
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
5
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
6
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
7
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
8
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
11
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
12
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
14
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
15
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
16
Panvel Crime News: धक्कादायक! नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मताच रस्त्यावर फेकलं, पनवेल येथील घटना
17
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
18
‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
19
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
20
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती

सोयाबीन पिकाला पाखरांनी केले लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2015 02:30 IST

यंदा सोयाबीन पिकाच्या उत्पादनावर नुकसानीचे सावट असतानाच उरल्यासुरल्या शेंगांना पाखरांसह माकडांची लक्ष केले आहे.

आंजी (मोठी) : यंदा सोयाबीन पिकाच्या उत्पादनावर नुकसानीचे सावट असतानाच उरल्यासुरल्या शेंगांना पाखरांसह माकडांची लक्ष केले आहे. यामुळे सोयाबीनचे थोडे थोडके पीकही हातून जाण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी हवालदिल झाले झाले आहेत. जून अखेरीस व जुलैच्या पहिल्या आठवड्यात अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली. पावसाने दडी मारल्याने त्या कालावधीत ड्रीप व तुषार सिंचनाच्या सहाय्याने ओलित केले. तरीही यंदा सोयाबीनच्या शेंगा भरण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. ज्या शेंगा भरल्या आहेत त्याच्यावर रोग, किड आणि पाखरांनी हल्ला चढविला आहे. माकडांचे कळपही या पिकांमध्ये उच्छांद मांडत असल्याचे या परिसरात फेरफटका मारल्यानंतर निदर्शनास येते तीन वर्षापासून नापिकी, दुष्काळ व अन्य संकटांचा सामना करावा लागत आहे. असे असतानाही शेतकऱ्यांसमोर पुन्हा नव्याने संकट उभे ठाकले आहे आंजी परिसरात सकाळच्या सुमारास शेतांमध्ये पिकांवर पाखरांचे थवे बसलेले आढळतात. ही पाखरं सोयाबीनमधील दाणे फस्त करतात. भरीस भर म्हणून मागील काही दिवसांपासून माकडांनी पिकांमध्ये हैदोस घालणे सुरू केले आहे. काही शेत शिवारांमध्ये शेतकरी पिंप वाजवून पिकांची राखण करीत असले तरी पाखरांना आता हा आवाज नेहमीचाच झाला आहे. त्यामुळे पाखरे आवाजाने दुसरीकडे जात नसल्याचे शेतकरी सांगतात.शेती क्षेत्रातील जाणकारांनी यंदा सोयाबीन पिकात घट येण्याचा अंदाज वर्तविला असतानाच उरलेले पीक पाखरे आणि माकडे फस्त करीत असल्याने शेतकरी विवंचनेत दिसून येत आहेत. कृषी विभागाने उपाययोजना सुचवाव्या तसेच नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत.(वार्ताहर)