शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

अप्पर वर्धाने दिले जलदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 21:35 IST

नगरपंचायत प्रशासनाने वारंवार केलेल्या पाठपुराव्यानंतर वर्धा धरणाचे ममदापूर तलावात पाणी सोडण्यात आले. यामुळे दहाच दिवसात आष्टी शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यात नगरपंचायतीला यश आले आहे. रखरखत्या उन्हात पाण्याकरिता होणारी भटकंती थांबल्याने, सोबतच स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठ्यामुळे आष्टीकरांनी नगरपंचायतीचे आभार मानले आहे.

ठळक मुद्देदहा दिवसात पाणीप्रश्न निकाली : नगरपंचायतीचे प्रयत्न; नागरिकांना दिलासा

अमोल सोटे।लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : नगरपंचायत प्रशासनाने वारंवार केलेल्या पाठपुराव्यानंतर वर्धा धरणाचे ममदापूर तलावात पाणी सोडण्यात आले. यामुळे दहाच दिवसात आष्टी शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यात नगरपंचायतीला यश आले आहे. रखरखत्या उन्हात पाण्याकरिता होणारी भटकंती थांबल्याने, सोबतच स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठ्यामुळे आष्टीकरांनी नगरपंचायतीचे आभार मानले आहे.ममदापूर तलाव शंभर टक्के कोरडा पडल्याने आष्टी शहरातील पाणीपुरवठा ठप्प झाला होता. विरोधकांनी याकडे लक्ष वेधले होते. त्यामुळे सत्ताधारी खडबडून जागे झाले. पाण्याच्या विषयावर कुठलेही राजकारण न करता मुख्याधिकाऱ्यांनी सत्ताधारी व विरोधकांना एकीचे बळ मागितले होते.नगराध्यक्ष अनिता भातकुलकर, भाजप गटनेते अशोक विजयकर, शहर अध्यक्ष अनिता भातकुलकर, भाजप गटनेते अशोक विजयकर, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक अ‍ॅड. मनीष ठोंबरे, मुख्याधिकारी पंकज गोसावी यांनी ममदापूर तलावातील गाळ काढण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर राबविली. त्यानंतर अप्पर वर्धा धरण विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार केला. अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी झाल्या, पाणी सोडण्याला होकार मिळाला.तीन दिवस तलाव ८५ टक्के पूर्ण भरून घेण्यात आला. सुरुवातीला मुख्य केंद्राच्या सभोवताल १०० मीटर अंतरामधील गाळ काढण्यात आला. त्यानंतर तलावाच्या उर्वरित भागातील गाळ काढण्यात आला.जलशुद्धीकरण केंद्रही स्वच्छ करण्यात आले. त्यामुळे नागरिकांना शुद्ध व स्वच्छ पाणी मिळण्यास सुरुवात झाली. अप्पर वर्धा धरण विभागाने पाणी दिले नसते तर जूनच्या अखेरीसपर्यंत नळाला कोरड कायम राहिली असती. मात्र, प्रशासनाने सक्रिय भूमिका घेतली. दरम्यानच्या काळात टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. प्रभाग क्रमांक २ मध्ये इंदिरानगरात काही समाजकंटकांनी पाण्याच्या टॅँकरवर दगडफेक करून वाहनचालकाला मारले. दुसºया दिवशी पैसे घेऊन पाणी विकण्याचा केविलवाणा प्रकार केला. मात्र, नगरसेवक ठोंबरे यांनी हा सर्व प्रकार धुडकावून लावत पुन्हा नगरपंचायतीच्या अग्निशमन गाडीने पाणीपुरवठा सुरू करून नागरिकांना दिलासा दिला. पाण्याच्या माध्यमातून नागरिकांची होणारी आर्र्थिक लूट थांबविली. अखेर अप्पर वर्धा धरणानेच जलदान दिल्याची भावना आष्टी शहरातील नागरिकांनी व्यक्त करीत नगरपंचायत प्रशासनाचे आभार मानले आहे.ममदापूर तलाव मागील १५ वर्षांपासून पाण्याने भरूनच राहिल्याने गाळ काढण्याच्या कामात अडथळा निर्माण झाला. यावेळी तलावातील जलसाठा संपल्याने गाळ काढून अप्पर वर्धा धरणाच्या पाण्याने भरण्यात आला. त्यामुळे पाणीप्रश्न मार्गी लावण्यात यश आले.- अनिता भातकुलकर, नगराध्यक्ष, नगरपंचायत, आष्टी (शहीद).आम्ही विरोधक नक्कीच आहोत मात्र, आष्टी शहराच्या विकासासाठी सत्ताधारी गटाला सातत्याने मदत करण्याची आमची भावना आहे. पाण्यासाठी कर्तव्य पार पाडले.- अशोक विजयकर, भाजप गटनेते तथा नगरसेवक, आष्टी (शहीद).मागील दहा दिवसात सत्ताधारी आणि विरोधक यांनी चांगली भूमिका बजावली. त्यामुळे पाण्यासारखा ज्वलंत प्रश्न मार्गी लावता आला.- पंकज गोसावी, मुख्याधिकारी, नगरपंचायत, आष्टी (शहीद).