शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

आमदारांचा असाही अट्टाहास; म्हणे, हाच कंत्राटदार माझा खास; सोशल मीडियावर पत्र होतयं व्हायरल

By आनंद इंगोले | Updated: March 28, 2023 10:55 IST

कंत्राट देण्यासाठी चक्क बीडीओंना पत्र

वर्धा : गावाच्या विकासाकरिता शासन स्तरावरून निधी खेचून आणणे हे लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे. आमदार निधी कोणत्या कामावर खर्च करायचा, हा त्यांचा अधिकार आहे. परंतु विकास निधीतून होणारी कामे माझ्याच कंत्राटदाराला द्यावीत, असा अट्टाहास एका आमदारांनी धरल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्या आमदारांनी चक्क मतदारसंघातील गटविकास अधिकाऱ्यांना पत्र पाठवून त्यावर कंत्राटदाराची नावे व कामे नमूद केली आहेत. त्यामुळे ‘दादासाहेब’ आता हे अति होतेय, अशा प्रतिक्रियाही व्यक्त व्हायला लागल्या आहेत.

‘घर फिरलं की वासेही फिरतात’ अशी गावगाड्यातील म्हण आहे. त्यामुळे परिस्थितीनुसार पायाखालची वाळू सरकायला लागली की, मन:स्थितीही विचलित होते आणि आपले निर्णयही चुकायला लागतात. याचाच फायदा घेत जवळचेच चुकीचा मार्ग दाखवून ‘मोडक्या कुपावर पाय देण्याचा प्रयत्न करतात’. असाच काहीसा प्रकार आर्वी विधानसभा क्षेत्रातील आमदारांसोबत तर घडत नाही ना? असं काही प्रकारावरून दिसतं. पण, हे योग्य नाही. सध्या हे आमदार महोदय पत्राचारामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांनी आपल्या लेटर हेडवर मतदारसंघातील सर्व पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांच्या नावे पत्रे पाठविली. त्या पत्रांवर चक्क कंत्राटदाराचे नाव आणि कामाचे नाव नमूद करून त्यांनाच कामे द्यावीत, असा आग्रह धरला आहे. त्यामुळे एका आमदारांनी अशा प्रकारे पत्र पाठविणे हा पहिलाच प्रकार असल्याने अधिकारीही थक्क झालेत. आता हे पत्र सोशल मीडियाद्वारे व्हायरल झाल्याने इतर कंत्राटदारांमध्येही रोष व्यक्त होत आहे. विशेषत: पत्रावर नमूद असलेले कंत्राटदार त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते असल्याने हे कितपत योग्य, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ग्रामपंचायतच्या कामातही लुडबुड

आमदारांनी दिलेल्या पत्रामध्ये जिल्हा वार्षिक योजना अ, क, ड अंतर्गत, आर्वी विधानसभेतील मंजूर असलेली कामे, जिल्हा नियोजन समिती ग्रामपंचायत भवन व जनसुविधांच्या कामांचा समावेश आहे. आमदारांनी आता ग्रामपंचायतींच्या कामांमध्येही लुडबुड चालविल्याने सरपंचांकडूनही रोष व्यक्त होत आहे. परंतु आमदारांना या कामांमध्ये इतका ‘इन्ट्रेस’ का, हाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांवर दबावतंत्र

आर्वी विधानसभा क्षेत्राच्या आमदारांसह त्यांच्याच पक्षातील काही जिल्हा परिषदेच्या माजी पदाधिकाऱ्यांकडून अधिकाऱ्यांवर रोख झाडला जात आहे. विशेषत: बरेच माजी पदाधिकारी किंवा त्यांचे पतीदेव हेच स्वत: कंत्राटदार असल्याने सत्तेचा गैरफायदा घेत आहेत. स्वीय साहाय्यकही साहेबांच्या नावाने मिनी मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर रुबाब झाडत आहेत. या दबावतंत्रामुळे अधिकाऱ्यांचीही मन:स्थिती खालावत असून, तणावात काम करावे लागत आहे.

आमची सत्ता असून आमच्या कार्यकर्त्यांना कामे मिळाली पाहिजेत. कार्यकर्त्यांच्या अपेक्षा आता पूर्ण नाही करणार तर कधी? काँग्रेसचे कार्यकर्ते बिलोमध्ये निविदा भरतात. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांना कामे मिळत नाहीत. आणि ते कामही बोगस होते. म्हणून गटविकास अधिकाऱ्यांना पत्र देऊन कामे देण्यास सांगितले आहे.

- दादाराव केचे, आमदार आर्वी

टॅग्स :PoliticsराजकारणSocial Viralसोशल व्हायरलMLAआमदारwardha-acवर्धा