शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
3
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
4
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
5
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
6
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
7
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
8
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
9
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
10
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
11
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
12
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
13
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
14
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
15
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
16
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
17
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
18
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
19
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
20
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी जागा द्या ..अन्यथा तहसील कार्यालयाला घेराव घालू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 16:00 IST

अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल; तहसीलदारांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाची मागणी गेल्या कित्येक दिवसांपासून प्रलंबित आहे. या स्मारकासाठी जागा उपलब्ध करून द्या, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक तुषार उमाळे यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे मातंग समाजाचेच नव्हे, तर संपूर्ण बहुजन समाजाची अस्मिता आहे. स्वातंत्र्यलढ्यापासून ते संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपर्यंत महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक जडणघडणीत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे प्रचंड मोठे योगदान आहे. समाजव्यवस्थेने कायमच डावललेल्या मातंग समाजाला प्रत्येक प्रश्नासाठी सतत संघर्ष करावा लागतो. 

गावात मातंग समाजाची मोठी वस्ती आहे. मात्र, या समाजाला सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमास एकत्रित येण्यास कुठलेही स्थान आणि समाजाची प्रेरणा असणाऱ्या अण्णाभाऊ साठेंचा साधा पुतळादेखील नसल्याने मोठी अडचण समाजापुढे निर्माण झाली आहे. अण्णाभाऊ साठे यांची जयंती १ ऑगस्ट रोजी साजरी केली जाते. हा दिवस सामान्यतः पावसाळ्यात येत असल्यामुळे सभागृहाअभावी या दिवशी कुठलेही सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम होऊ शकत नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक व समाजभवनासाठी भूखंड मिळण्यासाठी संघर्ष सुरू आहे.

तत्कालीन तहसीलदार रमेश कोळपे यांनी २०२२ मध्ये एक महिन्यात भूखंड देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, मागील दोन वर्षांमध्ये त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे उमाळे यांच्या नेतृत्वाखाली मातंग समाजाच्या वतीने वर्धा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिक बंडू कासारे, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अतुल शेंदरे, जिल्हा सचिव राहुल गजभिये, तालुकाध्यक्ष प्रवीण ढाले. विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष वैभव कदम, विपिन नगराळे, अश्विन परमार, अॅड. कपिलवृक्ष गोडघाटे, शैलेश जगताप, निखिल नगराळे, आकाश मानकर, अजय डोंगरे, प्रशांत डोंगरे, सुनील बावनकर, आलोक चौधरी, अतुल बावणे, नितीन निखाडे, गंगा डोंगरे, वंदना कासारे, मनीषा डोंगरे, सुलभा बावनकर, कांचन बावनकर, मंदा गवळी, आदी उपस्थिती होती.

पंधरवड्याचा अल्टिमेटमयेत्या १५ दिवसांत सेवाग्राम येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी व सभा मंडपासाठी भूखंड न दिल्यास वर्धा जिल्ह्यातील मातंग समाज, संभाजी ब्रिगेडच्या नेतृत्वात तहसील कार्यालयाला घेराव घालेल. त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल असा इशारा यावेळी निवेद- नातून देण्यात आला.

 

टॅग्स :wardha-acवर्धा