शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
3
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
4
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
5
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
6
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
7
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
8
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
9
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
10
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
11
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
12
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
13
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
14
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
15
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
16
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
17
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
18
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
19
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
20
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
Daily Top 2Weekly Top 5

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी जागा द्या ..अन्यथा तहसील कार्यालयाला घेराव घालू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 16:00 IST

अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल; तहसीलदारांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाची मागणी गेल्या कित्येक दिवसांपासून प्रलंबित आहे. या स्मारकासाठी जागा उपलब्ध करून द्या, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक तुषार उमाळे यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे मातंग समाजाचेच नव्हे, तर संपूर्ण बहुजन समाजाची अस्मिता आहे. स्वातंत्र्यलढ्यापासून ते संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपर्यंत महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक जडणघडणीत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे प्रचंड मोठे योगदान आहे. समाजव्यवस्थेने कायमच डावललेल्या मातंग समाजाला प्रत्येक प्रश्नासाठी सतत संघर्ष करावा लागतो. 

गावात मातंग समाजाची मोठी वस्ती आहे. मात्र, या समाजाला सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमास एकत्रित येण्यास कुठलेही स्थान आणि समाजाची प्रेरणा असणाऱ्या अण्णाभाऊ साठेंचा साधा पुतळादेखील नसल्याने मोठी अडचण समाजापुढे निर्माण झाली आहे. अण्णाभाऊ साठे यांची जयंती १ ऑगस्ट रोजी साजरी केली जाते. हा दिवस सामान्यतः पावसाळ्यात येत असल्यामुळे सभागृहाअभावी या दिवशी कुठलेही सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम होऊ शकत नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक व समाजभवनासाठी भूखंड मिळण्यासाठी संघर्ष सुरू आहे.

तत्कालीन तहसीलदार रमेश कोळपे यांनी २०२२ मध्ये एक महिन्यात भूखंड देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, मागील दोन वर्षांमध्ये त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे उमाळे यांच्या नेतृत्वाखाली मातंग समाजाच्या वतीने वर्धा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिक बंडू कासारे, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अतुल शेंदरे, जिल्हा सचिव राहुल गजभिये, तालुकाध्यक्ष प्रवीण ढाले. विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष वैभव कदम, विपिन नगराळे, अश्विन परमार, अॅड. कपिलवृक्ष गोडघाटे, शैलेश जगताप, निखिल नगराळे, आकाश मानकर, अजय डोंगरे, प्रशांत डोंगरे, सुनील बावनकर, आलोक चौधरी, अतुल बावणे, नितीन निखाडे, गंगा डोंगरे, वंदना कासारे, मनीषा डोंगरे, सुलभा बावनकर, कांचन बावनकर, मंदा गवळी, आदी उपस्थिती होती.

पंधरवड्याचा अल्टिमेटमयेत्या १५ दिवसांत सेवाग्राम येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी व सभा मंडपासाठी भूखंड न दिल्यास वर्धा जिल्ह्यातील मातंग समाज, संभाजी ब्रिगेडच्या नेतृत्वात तहसील कार्यालयाला घेराव घालेल. त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल असा इशारा यावेळी निवेद- नातून देण्यात आला.

 

टॅग्स :wardha-acवर्धा