शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीसाठी १५०० कोटींचे पॅकेज द्या

By admin | Updated: June 11, 2014 23:32 IST

देशात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रातील विदर्भात होतात़ त्यातही पॅकेजग्रस्त सहा जिल्हे वर्धा, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, अकोला, वाशीम येथे शेतकरी आत्महत्यांचा वेग अधिक आहे.

मागणी : पंतप्रधानांना पाठविले निवेदनवर्धा : देशात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रातील विदर्भात होतात़ त्यातही पॅकेजग्रस्त सहा जिल्हे वर्धा, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, अकोला, वाशीम येथे शेतकरी आत्महत्यांचा वेग अधिक आहे. दरवर्षी या जिल्ह्यांत एक हजारांहून अधिक शेतकरी आत्महत्या करतात़ यामुळे शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी १ हजार ५०० कोटी रुपयांचे पॅकेज द्यावे, अशी मागणी भाजपप्रणित किसान मोर्चाचे प्रशांत इंगळे तिगावकर यांनी केली आहे़ याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदनही पाठविले आहे़

भाजप पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्धेला जाहीर सभेसाठी आले असता शेतकरी आत्महत्यांबाबत माहिती दिली होती़ शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाहीही आपण दिली़ २००६ मध्ये या पॅकेजग्रस्त जिल्ह्यात तत्कालीन प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी शेतकऱ्यांना व्याज माफीचे पॅकेज दिले होते; पण मुद्दल तशीच कायम राहिली़ त्यावर गत आठ वर्षांत पुन्हा तेवढेच व्याज झाले आहे. राज्य व केंद्र शासनाला वारंवार सांगूनही विदर्भातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली नाही. पॅकेजग्रस्त जिल्ह्यांतील वर्धा व बुलडाणा जिल्हा सहकारी बँकाही डबघाईस आल्या़ शेतकऱ्यांकडे या जिल्ह्यांत किमान १५०० कोटी रुपयांची थकबाकी आहे. कर्ज वसुलीसाठी बँका शेतकऱ्याकडे जात असल्याने शेतकरी आत्महत्या करतात़ नापिकी, कर्जबाजारीपणा, शेतमालाला कमी भाव व चुकीचे कृषी धोरण यास कारणीभूत आहे़ जिल्ह्यातील सिंचन ४ टक्के आहे. अशावेळी त्वरित विदर्भातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी त्यांची संपूर्ण कर्ममाफी करण्यात यावी़ यासाठी १५०० कोटी रुपयांचे पॅकेज शासनाने त्वरित मंजूर करावे व शेतकऱ्यांना सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही त्यांनी निवेदनातून केली़(कार्यालय प्रतिनिधी)