शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीसाठी १५०० कोटींचे पॅकेज द्या

By admin | Updated: June 11, 2014 23:32 IST

देशात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रातील विदर्भात होतात़ त्यातही पॅकेजग्रस्त सहा जिल्हे वर्धा, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, अकोला, वाशीम येथे शेतकरी आत्महत्यांचा वेग अधिक आहे.

मागणी : पंतप्रधानांना पाठविले निवेदनवर्धा : देशात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रातील विदर्भात होतात़ त्यातही पॅकेजग्रस्त सहा जिल्हे वर्धा, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, अकोला, वाशीम येथे शेतकरी आत्महत्यांचा वेग अधिक आहे. दरवर्षी या जिल्ह्यांत एक हजारांहून अधिक शेतकरी आत्महत्या करतात़ यामुळे शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी १ हजार ५०० कोटी रुपयांचे पॅकेज द्यावे, अशी मागणी भाजपप्रणित किसान मोर्चाचे प्रशांत इंगळे तिगावकर यांनी केली आहे़ याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदनही पाठविले आहे़

भाजप पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्धेला जाहीर सभेसाठी आले असता शेतकरी आत्महत्यांबाबत माहिती दिली होती़ शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाहीही आपण दिली़ २००६ मध्ये या पॅकेजग्रस्त जिल्ह्यात तत्कालीन प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी शेतकऱ्यांना व्याज माफीचे पॅकेज दिले होते; पण मुद्दल तशीच कायम राहिली़ त्यावर गत आठ वर्षांत पुन्हा तेवढेच व्याज झाले आहे. राज्य व केंद्र शासनाला वारंवार सांगूनही विदर्भातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली नाही. पॅकेजग्रस्त जिल्ह्यांतील वर्धा व बुलडाणा जिल्हा सहकारी बँकाही डबघाईस आल्या़ शेतकऱ्यांकडे या जिल्ह्यांत किमान १५०० कोटी रुपयांची थकबाकी आहे. कर्ज वसुलीसाठी बँका शेतकऱ्याकडे जात असल्याने शेतकरी आत्महत्या करतात़ नापिकी, कर्जबाजारीपणा, शेतमालाला कमी भाव व चुकीचे कृषी धोरण यास कारणीभूत आहे़ जिल्ह्यातील सिंचन ४ टक्के आहे. अशावेळी त्वरित विदर्भातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी त्यांची संपूर्ण कर्ममाफी करण्यात यावी़ यासाठी १५०० कोटी रुपयांचे पॅकेज शासनाने त्वरित मंजूर करावे व शेतकऱ्यांना सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही त्यांनी निवेदनातून केली़(कार्यालय प्रतिनिधी)