शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

कर्जमाफीसाठी १५०० कोटींचे पॅकेज द्या

By admin | Updated: June 11, 2014 23:32 IST

देशात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रातील विदर्भात होतात़ त्यातही पॅकेजग्रस्त सहा जिल्हे वर्धा, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, अकोला, वाशीम येथे शेतकरी आत्महत्यांचा वेग अधिक आहे.

मागणी : पंतप्रधानांना पाठविले निवेदनवर्धा : देशात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रातील विदर्भात होतात़ त्यातही पॅकेजग्रस्त सहा जिल्हे वर्धा, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, अकोला, वाशीम येथे शेतकरी आत्महत्यांचा वेग अधिक आहे. दरवर्षी या जिल्ह्यांत एक हजारांहून अधिक शेतकरी आत्महत्या करतात़ यामुळे शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी १ हजार ५०० कोटी रुपयांचे पॅकेज द्यावे, अशी मागणी भाजपप्रणित किसान मोर्चाचे प्रशांत इंगळे तिगावकर यांनी केली आहे़ याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदनही पाठविले आहे़

भाजप पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्धेला जाहीर सभेसाठी आले असता शेतकरी आत्महत्यांबाबत माहिती दिली होती़ शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाहीही आपण दिली़ २००६ मध्ये या पॅकेजग्रस्त जिल्ह्यात तत्कालीन प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी शेतकऱ्यांना व्याज माफीचे पॅकेज दिले होते; पण मुद्दल तशीच कायम राहिली़ त्यावर गत आठ वर्षांत पुन्हा तेवढेच व्याज झाले आहे. राज्य व केंद्र शासनाला वारंवार सांगूनही विदर्भातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली नाही. पॅकेजग्रस्त जिल्ह्यांतील वर्धा व बुलडाणा जिल्हा सहकारी बँकाही डबघाईस आल्या़ शेतकऱ्यांकडे या जिल्ह्यांत किमान १५०० कोटी रुपयांची थकबाकी आहे. कर्ज वसुलीसाठी बँका शेतकऱ्याकडे जात असल्याने शेतकरी आत्महत्या करतात़ नापिकी, कर्जबाजारीपणा, शेतमालाला कमी भाव व चुकीचे कृषी धोरण यास कारणीभूत आहे़ जिल्ह्यातील सिंचन ४ टक्के आहे. अशावेळी त्वरित विदर्भातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी त्यांची संपूर्ण कर्ममाफी करण्यात यावी़ यासाठी १५०० कोटी रुपयांचे पॅकेज शासनाने त्वरित मंजूर करावे व शेतकऱ्यांना सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही त्यांनी निवेदनातून केली़(कार्यालय प्रतिनिधी)