शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

कुशल, अकुशल बेरोजगारांना कंपनीत नोकरी द्या

By admin | Updated: November 13, 2015 02:07 IST

लॅन्को थर्मल पॉवर मांडवाच्या वतीने मांडवा, पुलई, बेलगाव व अन्य काही गावांतील जमिनी अधिग्रहीत करण्यात आल्या.

शेतकरी पुत्रांची मागणी : लॅन्को थर्मल पावरच्या व्यवस्थापनाला निवेदन वर्धा : लॅन्को थर्मल पॉवर मांडवाच्या वतीने मांडवा, पुलई, बेलगाव व अन्य काही गावांतील जमिनी अधिग्रहीत करण्यात आल्या. यामुळे अनेक शेतकरी पुत्र बेरोजगार झाले. या सुशिक्षित बेरोजगार युवकांना लॅन्कोने कुशल, अकुशल सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी भूमिपुत्र संघर्ष समितीने केली आहे. याबाबत विदर्भ लॅन्को थर्मल पावरच्या मुख्य व्यवस्थापकांना निवेदनही देण्यात आले.निवेनदनानुसार मांडवा, पुलई, बेलगाव येथील बेरोजगार आयटीआय प्रशिक्षित तरूणांना कंपनीत कायम नोकरी द्यावी, तीन गावातील शिक्षण घेतलेले अभियंते, आयटीआय प्रशिक्षीत युवकांना लॅन्को कंपनीत नोकरी द्यावी, मांडवा, पुलई, बेलगाव येथील कंत्राटदारांना बांधकाम, मजूर पुरवठा ही कामे दिल्यास बेरोजगारी कमी होईल व गावाचा विकास होईल. लॅन्को कंपनी आल्याने मांडवा, पुलई, बेलगाव येथील शेतकऱ्यांची शेती गेली. यामुळे शेतकरी, त्यांची मुले व शेतमजूर बेकार झाले. या अकुशल कामगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, गतवर्षी आयटीआय प्रशिक्षित बेरोजगार तरूणांनी आंदोलन केले असता काहींवर गुन्हे दाखल करण्यात आले होते, ते गुन्हे परत घेण्यात यावे, आदी मागण्यांचा समावेश आहे.विदर्भ लॅन्को पॉवरचे काम गत दोन वर्षांपासून बंदस्थितीत होते. आता सुरू झाले आहे. लॅन्को थर्मल परिसरात आल्याने स्थानिक नागरिकांना मोठ्या अपेक्षा होत्या. हा प्रकल्प कार्यान्वित करण्याकरिता स्थानिकांनी मदत करण्याचे काम केले होते. परिसरातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल, परिसराच्या विकासाकरिता हातभार लागेल, हे अपेक्षित होते; पण गत काही दिवसांत कंपनी प्रशासन स्थानिकांना डावलून बाहेरील लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहे. बेरोजगार प्रशिक्षित नाीह, या कंपनीच्या कामाचा अनुभव नाही, की कारणे समोर केली जात आहेत.कंपनी परिसरात अनेक सुशिक्षित बेरोजगार स्वत: ठेकेदारीचे काम करण्यास तयार असताना व अनुभव असताना त्यांना डावलले जात आहे. कंपनीने हा प्रकार बंद करून बेरोजगारांना नोकरी द्यावी, अन्यथा आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही भूमिपुत्र संघर्ष समितीने दिला आहे.(कार्यालय प्रतिनिधी)\कंपनीकडून बेरोजगारांची थट्टाया प्रकारामुळे शेतकरी, शेतमजूर व त्यांच्या मुलांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. सुमारे एक हजार एकर शेतजमिनीवर ५०० शेतमजूर काम करीत होते. या जमिनीवर प्रकल्पाचे काम सुरू झाल्याने ५०० शेतमजुरांचा प्रश्न निर्माण झाला आहे. कंपनी प्रशासनाने प्रारंभी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे स्थानिकांचा रोजगार, गावाचा विकास या प्रश्नांकडे सोईस्कर दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. कंपनी प्रशासनाने आश्वासनाप्रमाणे मांडवा, पुलई, बेलगाव येथील १०० बेरोजगार तरुणांना आयटीआय प्रशिक्षण देत रोजगार उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली होती; पण वेळ मारून नेली जात आहे. कंपनी प्रशासन बेरोजगारांची थट्टा करीत आहे. मांडवा, बेलगाव, पुलई गावात बी.ई. इंजिनिअरींग, पॉलिटेक्निक, आयटीआय प्रशिक्षित अनेक बेरोजगार उपलब्ध असताना त्यांना डावलून परप्रांतीय युवकांना नोकरी देण्याचे काम सुरू आहे.