शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

कुशल, अकुशल बेरोजगारांना कंपनीत नोकरी द्या

By admin | Updated: November 13, 2015 02:07 IST

लॅन्को थर्मल पॉवर मांडवाच्या वतीने मांडवा, पुलई, बेलगाव व अन्य काही गावांतील जमिनी अधिग्रहीत करण्यात आल्या.

शेतकरी पुत्रांची मागणी : लॅन्को थर्मल पावरच्या व्यवस्थापनाला निवेदन वर्धा : लॅन्को थर्मल पॉवर मांडवाच्या वतीने मांडवा, पुलई, बेलगाव व अन्य काही गावांतील जमिनी अधिग्रहीत करण्यात आल्या. यामुळे अनेक शेतकरी पुत्र बेरोजगार झाले. या सुशिक्षित बेरोजगार युवकांना लॅन्कोने कुशल, अकुशल सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी भूमिपुत्र संघर्ष समितीने केली आहे. याबाबत विदर्भ लॅन्को थर्मल पावरच्या मुख्य व्यवस्थापकांना निवेदनही देण्यात आले.निवेनदनानुसार मांडवा, पुलई, बेलगाव येथील बेरोजगार आयटीआय प्रशिक्षित तरूणांना कंपनीत कायम नोकरी द्यावी, तीन गावातील शिक्षण घेतलेले अभियंते, आयटीआय प्रशिक्षीत युवकांना लॅन्को कंपनीत नोकरी द्यावी, मांडवा, पुलई, बेलगाव येथील कंत्राटदारांना बांधकाम, मजूर पुरवठा ही कामे दिल्यास बेरोजगारी कमी होईल व गावाचा विकास होईल. लॅन्को कंपनी आल्याने मांडवा, पुलई, बेलगाव येथील शेतकऱ्यांची शेती गेली. यामुळे शेतकरी, त्यांची मुले व शेतमजूर बेकार झाले. या अकुशल कामगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, गतवर्षी आयटीआय प्रशिक्षित बेरोजगार तरूणांनी आंदोलन केले असता काहींवर गुन्हे दाखल करण्यात आले होते, ते गुन्हे परत घेण्यात यावे, आदी मागण्यांचा समावेश आहे.विदर्भ लॅन्को पॉवरचे काम गत दोन वर्षांपासून बंदस्थितीत होते. आता सुरू झाले आहे. लॅन्को थर्मल परिसरात आल्याने स्थानिक नागरिकांना मोठ्या अपेक्षा होत्या. हा प्रकल्प कार्यान्वित करण्याकरिता स्थानिकांनी मदत करण्याचे काम केले होते. परिसरातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल, परिसराच्या विकासाकरिता हातभार लागेल, हे अपेक्षित होते; पण गत काही दिवसांत कंपनी प्रशासन स्थानिकांना डावलून बाहेरील लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहे. बेरोजगार प्रशिक्षित नाीह, या कंपनीच्या कामाचा अनुभव नाही, की कारणे समोर केली जात आहेत.कंपनी परिसरात अनेक सुशिक्षित बेरोजगार स्वत: ठेकेदारीचे काम करण्यास तयार असताना व अनुभव असताना त्यांना डावलले जात आहे. कंपनीने हा प्रकार बंद करून बेरोजगारांना नोकरी द्यावी, अन्यथा आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही भूमिपुत्र संघर्ष समितीने दिला आहे.(कार्यालय प्रतिनिधी)\कंपनीकडून बेरोजगारांची थट्टाया प्रकारामुळे शेतकरी, शेतमजूर व त्यांच्या मुलांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. सुमारे एक हजार एकर शेतजमिनीवर ५०० शेतमजूर काम करीत होते. या जमिनीवर प्रकल्पाचे काम सुरू झाल्याने ५०० शेतमजुरांचा प्रश्न निर्माण झाला आहे. कंपनी प्रशासनाने प्रारंभी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे स्थानिकांचा रोजगार, गावाचा विकास या प्रश्नांकडे सोईस्कर दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. कंपनी प्रशासनाने आश्वासनाप्रमाणे मांडवा, पुलई, बेलगाव येथील १०० बेरोजगार तरुणांना आयटीआय प्रशिक्षण देत रोजगार उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली होती; पण वेळ मारून नेली जात आहे. कंपनी प्रशासन बेरोजगारांची थट्टा करीत आहे. मांडवा, बेलगाव, पुलई गावात बी.ई. इंजिनिअरींग, पॉलिटेक्निक, आयटीआय प्रशिक्षित अनेक बेरोजगार उपलब्ध असताना त्यांना डावलून परप्रांतीय युवकांना नोकरी देण्याचे काम सुरू आहे.