शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

कुशल, अकुशल बेरोजगारांना कंपनीत नोकरी द्या

By admin | Updated: November 13, 2015 02:07 IST

लॅन्को थर्मल पॉवर मांडवाच्या वतीने मांडवा, पुलई, बेलगाव व अन्य काही गावांतील जमिनी अधिग्रहीत करण्यात आल्या.

शेतकरी पुत्रांची मागणी : लॅन्को थर्मल पावरच्या व्यवस्थापनाला निवेदन वर्धा : लॅन्को थर्मल पॉवर मांडवाच्या वतीने मांडवा, पुलई, बेलगाव व अन्य काही गावांतील जमिनी अधिग्रहीत करण्यात आल्या. यामुळे अनेक शेतकरी पुत्र बेरोजगार झाले. या सुशिक्षित बेरोजगार युवकांना लॅन्कोने कुशल, अकुशल सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी भूमिपुत्र संघर्ष समितीने केली आहे. याबाबत विदर्भ लॅन्को थर्मल पावरच्या मुख्य व्यवस्थापकांना निवेदनही देण्यात आले.निवेनदनानुसार मांडवा, पुलई, बेलगाव येथील बेरोजगार आयटीआय प्रशिक्षित तरूणांना कंपनीत कायम नोकरी द्यावी, तीन गावातील शिक्षण घेतलेले अभियंते, आयटीआय प्रशिक्षीत युवकांना लॅन्को कंपनीत नोकरी द्यावी, मांडवा, पुलई, बेलगाव येथील कंत्राटदारांना बांधकाम, मजूर पुरवठा ही कामे दिल्यास बेरोजगारी कमी होईल व गावाचा विकास होईल. लॅन्को कंपनी आल्याने मांडवा, पुलई, बेलगाव येथील शेतकऱ्यांची शेती गेली. यामुळे शेतकरी, त्यांची मुले व शेतमजूर बेकार झाले. या अकुशल कामगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, गतवर्षी आयटीआय प्रशिक्षित बेरोजगार तरूणांनी आंदोलन केले असता काहींवर गुन्हे दाखल करण्यात आले होते, ते गुन्हे परत घेण्यात यावे, आदी मागण्यांचा समावेश आहे.विदर्भ लॅन्को पॉवरचे काम गत दोन वर्षांपासून बंदस्थितीत होते. आता सुरू झाले आहे. लॅन्को थर्मल परिसरात आल्याने स्थानिक नागरिकांना मोठ्या अपेक्षा होत्या. हा प्रकल्प कार्यान्वित करण्याकरिता स्थानिकांनी मदत करण्याचे काम केले होते. परिसरातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल, परिसराच्या विकासाकरिता हातभार लागेल, हे अपेक्षित होते; पण गत काही दिवसांत कंपनी प्रशासन स्थानिकांना डावलून बाहेरील लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहे. बेरोजगार प्रशिक्षित नाीह, या कंपनीच्या कामाचा अनुभव नाही, की कारणे समोर केली जात आहेत.कंपनी परिसरात अनेक सुशिक्षित बेरोजगार स्वत: ठेकेदारीचे काम करण्यास तयार असताना व अनुभव असताना त्यांना डावलले जात आहे. कंपनीने हा प्रकार बंद करून बेरोजगारांना नोकरी द्यावी, अन्यथा आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही भूमिपुत्र संघर्ष समितीने दिला आहे.(कार्यालय प्रतिनिधी)\कंपनीकडून बेरोजगारांची थट्टाया प्रकारामुळे शेतकरी, शेतमजूर व त्यांच्या मुलांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. सुमारे एक हजार एकर शेतजमिनीवर ५०० शेतमजूर काम करीत होते. या जमिनीवर प्रकल्पाचे काम सुरू झाल्याने ५०० शेतमजुरांचा प्रश्न निर्माण झाला आहे. कंपनी प्रशासनाने प्रारंभी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे स्थानिकांचा रोजगार, गावाचा विकास या प्रश्नांकडे सोईस्कर दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. कंपनी प्रशासनाने आश्वासनाप्रमाणे मांडवा, पुलई, बेलगाव येथील १०० बेरोजगार तरुणांना आयटीआय प्रशिक्षण देत रोजगार उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली होती; पण वेळ मारून नेली जात आहे. कंपनी प्रशासन बेरोजगारांची थट्टा करीत आहे. मांडवा, बेलगाव, पुलई गावात बी.ई. इंजिनिअरींग, पॉलिटेक्निक, आयटीआय प्रशिक्षित अनेक बेरोजगार उपलब्ध असताना त्यांना डावलून परप्रांतीय युवकांना नोकरी देण्याचे काम सुरू आहे.