शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

कापसाला क्विंटलमागे १५०० रुपये बोनस द्या- राकाँ

By admin | Updated: November 29, 2014 01:59 IST

सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांच्या शेतात उत्पन्नाच्या खर्चावर आधारित आणखी ५० टक्के भाव वाढवून देण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले होते;...

वर्धा : सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांच्या शेतात उत्पन्नाच्या खर्चावर आधारित आणखी ५० टक्के भाव वाढवून देण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले होते; पण भाव वाढवून देण्याचे तर सोडाच असलेल्या भावाच्या ५० टक्के कमी भाव देण्यात येत आहे. केवळ ४०५० रुपये भाव देत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहे. शासनाने दिलेल्या हमीभावाचा निषेध करीत राष्ट्रवादीने शेतकरी जगवायचा असेल तर प्रती क्विंटल १५०० रुपये बोनस देण्याची मागणी केली आहे. सदर बोनस त्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावा, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय कृषीमंत्री एकनाथ खडसे यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले़ कृषी संजीवनी योजना अंमलात आली तो काळ हंगामाचा असल्याने शेतकऱ्यांकडे पुरेसा पैसा नव्हता. आता कृषी संजीवनी योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यातील सुमारे ३० हजार शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. या योजनेला मुदतवाढ द्यावी़ विशेष घटक योजनेंतर्गत विहिरीसाठी देण्यात येणारे १ लाख रुपये अनुदान तोकडे असून ते २ लाख ५० हजार रुपये करावे, वीज पुरवठा उपलब्ध करावा, कोरडवाहू शेतकऱ्यांना एकरी भरीव अनुदान द्यावे, पीक कर्ज धोरण, आणेवारी पद्धत बदलावी व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या त्वरित सोडवून दिलासा द्यावा आदी मागण्या आहेत़ दहा दिवसांत मागण्या पूर्ण न झाल्यास संपूर्ण आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, शशांक घोडमारे, समीर देशमुख, शरयू वांदिले, संजय काकडे, डॉ. अहमद रिझवी, प्रा. खलील खतीब, संदीप किटे, संदीप भांडवलकर आदींनी जाहीर केली़