शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
3
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
4
दहा कोटीचे बक्षीस, चार तास चकमक ! दबा धरून बसलेल्या माओवाद्यांचा जवानांनी केला खात्मा
5
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
6
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
7
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
8
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
9
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
10
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
11
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
12
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
13
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
14
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
15
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
16
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
17
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
18
Viral Video : घर नव्हे हा तर अजूबा! अवघ्या ५२ इंचांच्या दोन मजली घरात डोकावून बघाल, तर हादरून जाल!
19
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
20
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

कृषिपंपांना दिवसा १२ तास वीज द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 05:00 IST

शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना दिवसाला १२ तास विद्युत पुरवठा देण्यात यावा यासह उभ्या पिकांची नासाडी करणाºया वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा या दोन प्रमुख मागणींसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किसान अधिकार अभियानच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकरी जंगली जनावरांच्या त्रासाने भयग्रस्त झाले आहेत

ठळक मुद्देकिसान अधिकार अभियानचे धरणे आंदोलन : मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना दिवसाला १२ तास विद्युत पुरवठा देण्यात यावा यासह उभ्या पिकांची नासाडी करणाºया वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा या दोन प्रमुख मागणींसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किसान अधिकार अभियानच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले.शेतकरी जंगली जनावरांच्या त्रासाने भयग्रस्त झाले आहेत. रोही, जंगली डुक्कर, निलगाय आदी वन्यप्राण्यांकडून शेतीतील उभ्या पिकांची नासाडी केली जात आहे. त्यामुळे वन्यजीव व मनुष्य संघर्ष टाळण्यासाठी जंगलाला योग्य प्रकारे कुंपन करण्यात यावे. शेतात येणाऱ्या जंगली जनावरांना मारण्याची परवानगी शेतकरी बांधवांना देण्यात यावी. विद्युत पुरवठा दिवसाला राहत नसल्याने जीवाचा मोठा धोका पत्कारून रात्रीला शेतकऱ्यांना सिंचन करावे लागत आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन शेतकऱ्याच्या कृषीपंपांना दिवसाला १२ तास विद्युत पुरवठा देण्यात यावा या मागण्या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून रेटण्यात आल्या. आंदोलनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आले. धरणे आंदोलनाचे नेतृत्त्व किसान अधिकार अभियानचे मुख्य प्रेरक अविनाश काकडे, जिल्हाध्यक्ष सुदाम पवार यांनी केले. आंदोलनात विठ्ठल झाडे, गोपाल दुधाने, गजानन गिरडे, मंगेश शेंडे, प्रशांत बोरीकर, चंदू दुर्गे, किशोर हनवते, गणेश झाडे, इरफान अली, गजानन कडू, बालू सोनटक्के, प्रविण शेळके, भाऊराव काकडे, राजु बीडकर, गजानन पाल, अरूण राऊत, संजय दुधबडे, उमेश नरांजे, धनराज डगवार, वैभव वानी, गोविंद पेटकर, मोहन निमसडे, गोविंद केळापुरे, अनंता ठाकरे, प्रफुल्ल कुकडे यांच्यासह किसान अधिकार अभियानचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.सूतकताईद्वारे नोंदविला निषेधसरकार कुठलेही असो शेतकऱ्याच्या समस्या निकाली काढण्यासाठी ते पूर्णपणे यशस्वी झालेले नाही. सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध म्हणून अविनाश काकडे यांनी चरख्यावर सूतकताई केली.

टॅग्स :Socialसामाजिक