शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढच्यावेळी रॉबर्ट वाड्रा संसदेत दिसणार?; प्रियंका गांधी वायनाडला जाताच पतीची घोषणा
2
सरकारचा एक निर्णय अन् लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला; RTE प्रवेश पुन्हा रखडले
3
वर्षा गायकवाडांचा आमदारकीचा राजीनामा; काँग्रेस- शिवसेनेचे आणखी काही आमदार राजीनामा देणार
4
खळबळजनक! T20 World Cup मध्ये मॅच फिक्सिंगचा प्रयत्न, वेगवेगळ्या नंबरवरून आले फोन
5
फडणवीसांशिवाय मंत्रिमंडळात भाजप असणे अशक्य; राष्ट्रवादीच्या मंत्र्याचे खळबळजनक वक्तव्य
6
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे लोकार्पण कधी? उद्धव ठाकरेंनी केली बांधकामाची पाहणी
7
सुख-शांती हिरावून घेऊ शकतं स्मार्टफोनचं व्यसन; 'या' आजारांचा धोका, काय आहे Nomophobia?
8
पश्चिम बंगालमध्ये नवा ट्विस्ट! CM ममता बॅनर्जी भाजपा खासदाराच्या घरी; चर्चांना उधाण
9
"पप्पा फक्त एकदा परत या आणि..."; शहीद वडिलांना आजही व्हॉईस मेसेज पाठवतो ७ वर्षांचा लेक
10
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ जुलैला मतदान आणि निकाल लागणार
11
'भाजपशासित राज्ये पेपरफुटीची केंद्रे बनली', NEET परीक्षेतील गोंधळावरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Paras Defence And Space Technologies : एका दिवसात २० टक्क्यांचे रिटर्न; 'या' स्मॉलकॅप डिफेन्स कंपनीचे शेअर्स का बनलेत रॉकेट?
13
'मला न्याय द्या...', स्वाती मालीवाल यांचे शरद पवार, राहुल गांधींना पत्र; भेटीची वेळ मागितली!
14
वयानुसार किती वेळ आणि कोणता प्रकारचा करावा व्यायाम?; WHO ने दिल्या गाइडलाईन्स
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली; आता 'या' खात्याची मिळाली जबाबदारी
16
"मी तर वारकऱ्यांमध्ये गेलो होतो पण..."; कार्यकर्त्याने पाय धुतल्यावर नाना पटोलेंचे स्पष्टीकरण
17
लोकसभेनंतर विधानसभेतही अजित पवारांना धोबीपछाड?; शरद पवारांकडून बारामतीत मोर्चेबांधणी
18
Godawari Power and Ispat shares : अधिक पैसे देऊन आपलेच शेअर खरेदी करणार 'ही' कंपनी, वृत्तानंतर गुंतवणूकदाराच्या शेअरवर उड्या
19
VIDEO: "हा काय भारत नाही"; चाहत्याला मारण्यासाठी धावला हारिस रौफ; रस्त्यातच मोठा गोंधळ
20
जीम ट्रेनरच्या प्रेमात अडकली, पतीच्या हत्येची सुपारी दिली; प्लॅन A फसला, त्यानंतर...

गिरड परिसराला गारपिटीचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 11:17 PM

सर्वत्र पावसाची प्रतीक्षा असताना रविवारी गिरडसह परिसरात वादळी पावसाने हजेरी लावली.

ठळक मुद्देकापसाचे पीक जमीनदोस्त : वादळी वाºयासह पावसाचा मारा

लोकमत न्यूज नेटवर्कगिरड : सर्वत्र पावसाची प्रतीक्षा असताना रविवारी गिरडसह परिसरात वादळी पावसाने हजेरी लावली. यावेळी झालेल्या गाररपिटीमुळे कपाशीचे पीक जमिनदोस्त झाल्याने शेतकºयांचे नुकसान झाले आहे.गत १५ दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतकºयांच्या नजरा आकाशाकडे होत्या. शेतातील उभे पीक कसे वाचवावे हिच चिंता शेतकºयांना भेडसावत असताना गिरड परिसरात रविवारी दुपारी वादळीवाºयासह पाऊस व गारपिटाने हजेरी लावली.रविवारी गिरड, मोहगांव, आर्वी, तावी, शिवणफळ येदलाब येथे मुसळधार पाऊस झाला. या गावांमध्ये शेतातून पाणी निघाल्याने नाले तुंडुब भरून गेले. मात्र या गावां व्यतिरिक्त तालुक्यात कुठेही पाऊस पडला नसल्याचे सांगण्यात येते. वादळीवाºयासह झालेल्या पावसामुळे व गारपिटामुळे शेतकºयांचे बºयापैकी नुकसान झाले आहे. रविवारच्या पाऊस व गारपिटामुळे कपाशी, सोयाबीन व तूर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.पोलीस ठाण्यातील झाड उन्मळून पडलेया वादळी वाºयामुळे अने झाडे उन्मळून पडली. यात गिरड येथील पोलीस ठाण्यातील ५० वर्षांपूर्वीचे जुने गुलमोहराचे झाड उन्मळून पडले. यासह परिसरात १० ते १५ जागची मोठमोठाली झाडे वादळामुळे पडल्याचे सांगण्यात येते. झालेल्या वादळीवाºयासह गारपिटामुळे कुठलीही जीवीत हाणी झाली नसली तरी शेतकºयांची चिंता वाढविली आहे. या पावसाने गिरड, चोरविवारा, भनगापुर, नान्ही, बोथली शिवणफळ, आर्वी या शिवारातील शेतकºयांचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येते.ुदमदार पावसामुळे चिकणी (जा.) परिसरातील पिकांना संजीवनीचिकणी (जामणी)- दिवसभर अंगाला चटके देणारे ऊन होते. परंतु, सूर्यणारायण मावळतीला जात असताना अचानक वातावरणात बदल झाला. काळ्या ढगांनी आकाशात एकच गर्दी करून परिसरात दमदार पावसाने हजेरी दिली. या भागातील शेतकºयांसह नागरिकांना पावसाची प्रतीक्षा होती. सोमवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे परिसरातील कपाशी, तूर, सोयाबीन व विविध प्रकारच्या भाजीपाला पिकांना संजीवनी मिळाली आहे.विजेचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळलासेवाग्राम- दिवसभर वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिक व शेतकरी त्रस्त असताना सायंकाळी आकाशात एकच गर्दी करून विजांच्या कडकडाटात व ढगांच्या गडगडाटात परिसरात पावसाच्या सरी झाल्या. पावसाने दडी मारल्याने सर्वत्र चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती. विविध पीकही पाण्याअभावी माना टाकत होती. पाऊस न झाल्यास जनावरांच्या चाºयासह पाण्याचा प्रश्न भेडसावेल असे बोलले जात असताना परिसरात पाऊस झाला. अजूनही या भागातील विहिरी व जलायशांमधील पाणी पातळीत पाहिजे तशी वाढ झालेली नसल्याचे वास्तव आहे. या भागातील शेतकºयांसह नागरिकांना काळ्या ढगातून जोरदार पाऊस होईल, अशी आशा आहे. इतके असले तरी सोमवारी झालेल्या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे.