शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

सर्वसामान्य, तरूणांना उद्योगासाठी मुद्रा कर्ज द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 22:16 IST

राज्यात कुठेही शेतकरी कुटुंंबातील बेरोजगार युवकांना शेतीशी संबंधित क्रियाकलाप फिशकल्चर, मधमाशी पालन, कुक्कुटपालन, पशुधन पालन, ग्रेडिंग, क्रमवारी व एकत्रीकरण, कृषि उद्योग, नारळ, डेयरी, मत्स्यपालन, कृषीशास्त्र आणि कृषी व्यवसाय केंद्र अन्न व कृषी प्रक्रिया, सिंचन आणि विहिरी यासारख्या सुधारणा करण्यासाठी कर्ज मिळवितांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो.

ठळक मुद्देशैलेश अग्रवाल : केंद्रीय वित्त मंत्रालयातील आर्र्थिक विभागाचे उपसंचालक धर्मेंद्र कुमार यांना दिले पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यात कुठेही शेतकरी कुटुंंबातील बेरोजगार युवकांना शेतीशी संबंधित क्रियाकलाप फिशकल्चर, मधमाशी पालन, कुक्कुटपालन, पशुधन पालन, ग्रेडिंग, क्रमवारी व एकत्रीकरण, कृषि उद्योग, नारळ, डेयरी, मत्स्यपालन, कृषीशास्त्र आणि कृषी व्यवसाय केंद्र अन्न व कृषी प्रक्रिया, सिंचन आणि विहिरी यासारख्या सुधारणा करण्यासाठी कर्ज मिळवितांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. बॅकांनी तरूणांना व सर्वसामान्य लोकांना तत्काळ मुद्रा कर्ज वितरण्याची व्यवस्था करावी अशी मागणी एकच मिशन शेतकरी आरक्षणचे प्रनेते शैलेश अग्रवाल यांनी केली आहे. गौतीर्थावर आर्वी येथे आयोजित शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार यांच्या मेळाव्याला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या मेळाव्याला वर्धा व अमरावती जिल्ह्यातून मोठ्या संख्येने तरूण, शेतकरी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना शैलेश अग्रवाल म्हणाले की, पायपीट करुन ही राष्ट्रीय बँकातून कर्ज मिळत नाही व पर्याय नसल्याने महागड्या व्याजावर खाजगी कर्ज घ्यावे लागते. वित्त पुरवठा करणाऱ्या सर्व संस्थानांना रिजर्व बँकेच्या नियमानुसार कर्ज वाटपाचे सारखे निकष असतात, मग आम्हाला विविध कारणे समोर करुन राष्ट्रीयकृत बँका कर्ज का नाकारतात आणि पर्याय नसल्याने आम्ही खाजगी वित्तीय संस्थानांकडून महागड्या व्याजात कर्ज घेतो. मग या राष्ट्रीयकृत बँकांनी फक्त आमच्या खात्यातून किमान ठेवीच्या नावाखाली पाच पाच हजार कोटी लाटायचे आणि उद्योजकांनी केलेला तोटा भरुन काढायचा हा अनैतिक व्यवहार नाही काय? असा सवाल त्यांनी केला. बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी व आर्थिक पुनर्वसन करण्यासाठी मुद्रा कर्ज आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज देण्यासाठी सीबील तपासण्याचे औचित्य काय? हा फक्त कर्ज नाकारण्यासाठीचा डाव नाही का? असा सवाल त्यांनी केला. यासंदर्भात आपण स्वत दिल्ली येथे केंद्रीय वित्त मंत्रालयाचे आर्थिक विभागाचे उपसंचालक धर्मेद्रकुमार यांना भेटलो शेतकरी, बेरोजगार यांना मुद्रा योजनेतून कर्ज वितरण करणे असो वा शिक्षणासाठी कर्ज असो त्यांचे निकष बदलविले पाहिजे. सामान्यांना वेढीस धरणारे धोरण नको असे पत्र देऊन स्पष्ट केल्याचे ते म्हणाले.मुद्रा मेळाव्याचे होणार जिल्हाभर आयोजनआॅटोचालक, फेरीवाले, चारचाकी दुरूस्ती करणारे कारागिर, पानठेला चालक, चहा विक्रेते,चौक चौपाटीवरील नाश्त्याचे ठेले चालविणारे, सुतार, गवंडी, कुंभार, शिंपी, धोबी, भाजीपाला विक्रेते या सर्वांना मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज मिळवून देण्यासाठी प्रत्येक ठिकानी तरुणांचे आणि व्यावसायिकांचे मेळावे आयोजित करणार असून चार्टेड अकाउंंटट व निवृत्त बँक व्यवस्थापक उपस्थित राहून मार्गदर्शन करतील असे अग्रवाल म्हणाले.