शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सर्वसामान्य, तरूणांना उद्योगासाठी मुद्रा कर्ज द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 22:16 IST

राज्यात कुठेही शेतकरी कुटुंंबातील बेरोजगार युवकांना शेतीशी संबंधित क्रियाकलाप फिशकल्चर, मधमाशी पालन, कुक्कुटपालन, पशुधन पालन, ग्रेडिंग, क्रमवारी व एकत्रीकरण, कृषि उद्योग, नारळ, डेयरी, मत्स्यपालन, कृषीशास्त्र आणि कृषी व्यवसाय केंद्र अन्न व कृषी प्रक्रिया, सिंचन आणि विहिरी यासारख्या सुधारणा करण्यासाठी कर्ज मिळवितांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो.

ठळक मुद्देशैलेश अग्रवाल : केंद्रीय वित्त मंत्रालयातील आर्र्थिक विभागाचे उपसंचालक धर्मेंद्र कुमार यांना दिले पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यात कुठेही शेतकरी कुटुंंबातील बेरोजगार युवकांना शेतीशी संबंधित क्रियाकलाप फिशकल्चर, मधमाशी पालन, कुक्कुटपालन, पशुधन पालन, ग्रेडिंग, क्रमवारी व एकत्रीकरण, कृषि उद्योग, नारळ, डेयरी, मत्स्यपालन, कृषीशास्त्र आणि कृषी व्यवसाय केंद्र अन्न व कृषी प्रक्रिया, सिंचन आणि विहिरी यासारख्या सुधारणा करण्यासाठी कर्ज मिळवितांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. बॅकांनी तरूणांना व सर्वसामान्य लोकांना तत्काळ मुद्रा कर्ज वितरण्याची व्यवस्था करावी अशी मागणी एकच मिशन शेतकरी आरक्षणचे प्रनेते शैलेश अग्रवाल यांनी केली आहे. गौतीर्थावर आर्वी येथे आयोजित शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार यांच्या मेळाव्याला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या मेळाव्याला वर्धा व अमरावती जिल्ह्यातून मोठ्या संख्येने तरूण, शेतकरी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना शैलेश अग्रवाल म्हणाले की, पायपीट करुन ही राष्ट्रीय बँकातून कर्ज मिळत नाही व पर्याय नसल्याने महागड्या व्याजावर खाजगी कर्ज घ्यावे लागते. वित्त पुरवठा करणाऱ्या सर्व संस्थानांना रिजर्व बँकेच्या नियमानुसार कर्ज वाटपाचे सारखे निकष असतात, मग आम्हाला विविध कारणे समोर करुन राष्ट्रीयकृत बँका कर्ज का नाकारतात आणि पर्याय नसल्याने आम्ही खाजगी वित्तीय संस्थानांकडून महागड्या व्याजात कर्ज घेतो. मग या राष्ट्रीयकृत बँकांनी फक्त आमच्या खात्यातून किमान ठेवीच्या नावाखाली पाच पाच हजार कोटी लाटायचे आणि उद्योजकांनी केलेला तोटा भरुन काढायचा हा अनैतिक व्यवहार नाही काय? असा सवाल त्यांनी केला. बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी व आर्थिक पुनर्वसन करण्यासाठी मुद्रा कर्ज आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज देण्यासाठी सीबील तपासण्याचे औचित्य काय? हा फक्त कर्ज नाकारण्यासाठीचा डाव नाही का? असा सवाल त्यांनी केला. यासंदर्भात आपण स्वत दिल्ली येथे केंद्रीय वित्त मंत्रालयाचे आर्थिक विभागाचे उपसंचालक धर्मेद्रकुमार यांना भेटलो शेतकरी, बेरोजगार यांना मुद्रा योजनेतून कर्ज वितरण करणे असो वा शिक्षणासाठी कर्ज असो त्यांचे निकष बदलविले पाहिजे. सामान्यांना वेढीस धरणारे धोरण नको असे पत्र देऊन स्पष्ट केल्याचे ते म्हणाले.मुद्रा मेळाव्याचे होणार जिल्हाभर आयोजनआॅटोचालक, फेरीवाले, चारचाकी दुरूस्ती करणारे कारागिर, पानठेला चालक, चहा विक्रेते,चौक चौपाटीवरील नाश्त्याचे ठेले चालविणारे, सुतार, गवंडी, कुंभार, शिंपी, धोबी, भाजीपाला विक्रेते या सर्वांना मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज मिळवून देण्यासाठी प्रत्येक ठिकानी तरुणांचे आणि व्यावसायिकांचे मेळावे आयोजित करणार असून चार्टेड अकाउंंटट व निवृत्त बँक व्यवस्थापक उपस्थित राहून मार्गदर्शन करतील असे अग्रवाल म्हणाले.