शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

सर्वसामान्य, तरूणांना उद्योगासाठी मुद्रा कर्ज द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 22:16 IST

राज्यात कुठेही शेतकरी कुटुंंबातील बेरोजगार युवकांना शेतीशी संबंधित क्रियाकलाप फिशकल्चर, मधमाशी पालन, कुक्कुटपालन, पशुधन पालन, ग्रेडिंग, क्रमवारी व एकत्रीकरण, कृषि उद्योग, नारळ, डेयरी, मत्स्यपालन, कृषीशास्त्र आणि कृषी व्यवसाय केंद्र अन्न व कृषी प्रक्रिया, सिंचन आणि विहिरी यासारख्या सुधारणा करण्यासाठी कर्ज मिळवितांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो.

ठळक मुद्देशैलेश अग्रवाल : केंद्रीय वित्त मंत्रालयातील आर्र्थिक विभागाचे उपसंचालक धर्मेंद्र कुमार यांना दिले पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यात कुठेही शेतकरी कुटुंंबातील बेरोजगार युवकांना शेतीशी संबंधित क्रियाकलाप फिशकल्चर, मधमाशी पालन, कुक्कुटपालन, पशुधन पालन, ग्रेडिंग, क्रमवारी व एकत्रीकरण, कृषि उद्योग, नारळ, डेयरी, मत्स्यपालन, कृषीशास्त्र आणि कृषी व्यवसाय केंद्र अन्न व कृषी प्रक्रिया, सिंचन आणि विहिरी यासारख्या सुधारणा करण्यासाठी कर्ज मिळवितांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. बॅकांनी तरूणांना व सर्वसामान्य लोकांना तत्काळ मुद्रा कर्ज वितरण्याची व्यवस्था करावी अशी मागणी एकच मिशन शेतकरी आरक्षणचे प्रनेते शैलेश अग्रवाल यांनी केली आहे. गौतीर्थावर आर्वी येथे आयोजित शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार यांच्या मेळाव्याला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या मेळाव्याला वर्धा व अमरावती जिल्ह्यातून मोठ्या संख्येने तरूण, शेतकरी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना शैलेश अग्रवाल म्हणाले की, पायपीट करुन ही राष्ट्रीय बँकातून कर्ज मिळत नाही व पर्याय नसल्याने महागड्या व्याजावर खाजगी कर्ज घ्यावे लागते. वित्त पुरवठा करणाऱ्या सर्व संस्थानांना रिजर्व बँकेच्या नियमानुसार कर्ज वाटपाचे सारखे निकष असतात, मग आम्हाला विविध कारणे समोर करुन राष्ट्रीयकृत बँका कर्ज का नाकारतात आणि पर्याय नसल्याने आम्ही खाजगी वित्तीय संस्थानांकडून महागड्या व्याजात कर्ज घेतो. मग या राष्ट्रीयकृत बँकांनी फक्त आमच्या खात्यातून किमान ठेवीच्या नावाखाली पाच पाच हजार कोटी लाटायचे आणि उद्योजकांनी केलेला तोटा भरुन काढायचा हा अनैतिक व्यवहार नाही काय? असा सवाल त्यांनी केला. बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी व आर्थिक पुनर्वसन करण्यासाठी मुद्रा कर्ज आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज देण्यासाठी सीबील तपासण्याचे औचित्य काय? हा फक्त कर्ज नाकारण्यासाठीचा डाव नाही का? असा सवाल त्यांनी केला. यासंदर्भात आपण स्वत दिल्ली येथे केंद्रीय वित्त मंत्रालयाचे आर्थिक विभागाचे उपसंचालक धर्मेद्रकुमार यांना भेटलो शेतकरी, बेरोजगार यांना मुद्रा योजनेतून कर्ज वितरण करणे असो वा शिक्षणासाठी कर्ज असो त्यांचे निकष बदलविले पाहिजे. सामान्यांना वेढीस धरणारे धोरण नको असे पत्र देऊन स्पष्ट केल्याचे ते म्हणाले.मुद्रा मेळाव्याचे होणार जिल्हाभर आयोजनआॅटोचालक, फेरीवाले, चारचाकी दुरूस्ती करणारे कारागिर, पानठेला चालक, चहा विक्रेते,चौक चौपाटीवरील नाश्त्याचे ठेले चालविणारे, सुतार, गवंडी, कुंभार, शिंपी, धोबी, भाजीपाला विक्रेते या सर्वांना मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज मिळवून देण्यासाठी प्रत्येक ठिकानी तरुणांचे आणि व्यावसायिकांचे मेळावे आयोजित करणार असून चार्टेड अकाउंंटट व निवृत्त बँक व्यवस्थापक उपस्थित राहून मार्गदर्शन करतील असे अग्रवाल म्हणाले.