शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

गॅस सिलिंडरचा भडका; पाच झोपड्या बेचिराख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2022 05:00 IST

बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास सावली (वाघ) गावातील झोपडपट्टीतील तुकाराम नांदे यांच्या झोपडीत जेवण तयार करणे सुरू असताना घरगुती गॅस सिलिंडरने पेट घेत आगीचा अचानक भडका उडाला. गॅस सिलिंडरने पेट घेतल्याचे लक्षात येताच झोपड्यांमधील नागिरकांनी घराबाहेर पळ काढला. पण, अचानक आगीचा भडका उडाल्याने बघताबघता पाच झोपड्यांना आगीने आपल्या कवेत घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : तालुक्यातील सावली (वाघ) येथे गॅस सिलिंडरचा भडका उडून लागलेल्या आगीत कष्टकऱ्यांच्या पाच झोपड्या जळून खाक झाल्या. ही घटना बुधवारी सकाळी घडली असून यात सुमारे पाच लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास सावली (वाघ) गावातील झोपडपट्टीतील तुकाराम नांदे यांच्या झोपडीत जेवण तयार करणे सुरू असताना घरगुती गॅस सिलिंडरने पेट घेत आगीचा अचानक भडका उडाला. गॅस सिलिंडरने पेट घेतल्याचे लक्षात येताच झोपड्यांमधील नागिरकांनी घराबाहेर पळ काढला. पण, अचानक आगीचा भडका उडाल्याने बघताबघता पाच झोपड्यांना आगीने आपल्या कवेत घेतले. दरम्यान, हिंगणघाट येथील अग्निशमन विभागाला घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच हिंगणघाट नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी अग्निशमन बंबासह घटनास्थळ गाठले. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी आगीवर पाण्याचा मारा करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविल्याने मोठी दुर्घटना टळली.

संसारोपयोगी साहित्याचा कोळसागॅस सिलिंडरचा भडका उडत लागलेल्या आगीत पाच झोपट्यांमधील अन्न-धान्यांसह कपडे आदी संसारोपयोगी साहित्य जळून कोळसा झाल्याने संसार उघड्यावर आलेल्या पाचही व्यक्तींचे मोठे नुकसान झाले आहे.

अन् संसार  आला  उघड्यावर -  अचानक लागलेल्या आगीत तुकाराम नांदे, माँझिपुडा समर, ऋषी मगरे, मधुकर बोडखे, आशा दोडके यांची झोपडी पूर्णपणे जळून कोळसा झाली. त्यामुळे या पाचही व्यक्तींचा संसार उघड्यावरच आला आहे.

नायब तहसीलदार पोहोचले घटनास्थळी-  आग लागल्याची माहिती मिळताच हिंगणघाट येथील नायब तहसीलदार समशेर खान पठाण, मंडळ अधिकारी प्रशांत निनावे, तलाठी प्रसाद पाचखेडे, पोलीस पाटील विशाल ढेंगळे, कोतवाल प्रकाश निमसरकर, ग्रामसेवक पोहणे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ठाकूर यांनी तातडीने घटनास्थळ गाठून पाहणी केली.

दोन तासांच्या प्रयत्नांती परिस्थितीवर नियंत्रण-      माहिती मिळताच हिंगणघाट नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी अग्निशमन बंबासह घटनास्थळ गाठले. -   परिसरातील नागरिकांच्या मदतीने तब्बल दोन तास शर्तीचे प्रयत्न केल्यावर परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.-   परिस्थितीवर वेळीच नियंत्रण मिळाल्याने पुढील अनर्थ टळला.

रोख रक्कमही झाली जळून खाक

-  अचानक लागलेल्या आगीत पाचही झोपड्यांमधील संसाराेपयोगी विविध साहित्यांसह रोख रक्कमही जळून कोळसा झाली आहे. त्यामुळे आता पुढे काय, असा प्रश्न या नुकसानग्रस्त कुटुंबीयांसमोर आहे. 

 

टॅग्स :fireआग