शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

Ganesh Chaturthi 2018; वर्धा जिल्ह्यात सेलूमध्ये लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली होती गणेश स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 11:06 IST

इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारतमातेला स्वतंत्र करण्यासाठी प्रत्येक भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याचे स्फुलींग चेतविण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सवाला सुरूवात केली.

ठळक मुद्देबारभाई गणेश मंडळाचे ११९ व्या वर्षात पदार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारतमातेला स्वतंत्र करण्यासाठी प्रत्येक भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याचे स्फुलींग चेतविण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सवाला सुरूवात केली. त्या काळी खुद्द लोकमान्य टिळकांच्या हस्ते सेलूत बारभई गणेश मंडळाची स्थापना झाली. गेल्या ११८ वर्षात ही परंपरा अविरतपणे सुरू आहे. सेलूच्या बारभाई गणेशमंडळाने यंदा ११९ व्या वर्षात पदार्पण केले आहे.समर्थ स्वामी रामदास यांनी आध्यात्मिकता टिकवून ठेवण्यासाठी गावागावात हनुमान मंदिर व आखाड्यांची श्रृंखला निर्माण केली होती. त्याच धर्तीवर लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सवाला प्रारंभ केला. सन १८९९ मध्ये लोकमान्य टिळक सेलू येथे आले होते. त्यांनी समाजातील काही लोकांना एकत्र करून स्वातंत्र्य लढा अधिक प्रखर करण्यासाठी प्रत्येकांच्या मनात स्वातंत्र्याचे अग्निकुंड प्रज्वलीत केले. या सभेला त्यावेळी बारा जण एकत्र आले म्हणून बारभाई गणेश मंडळ असे मंडळाचे नामकरणही टिळकांनी केले.मंडळाच्या पहिल्या सभेला लोकमान्य टिळकांसह गणपतराव जोशी, आबाजी वºहाडपांडे, रामदेव जाजोदीया, नथमल राठी, बेदरकरबुवा, रामविलास सराफ, श्रीचंद्र बेदमोहता, दीपचंद चौधरी, गजानन उपाध्ये, हिरालाल राठी आदी मंडळी उपस्थित होती. मारवाडी मोहल्यात सुरू झालेला हा उत्सव आजही उत्साहाने व विधिवत धार्मिक पद्धतीने पार पडतो.याकाळात केळझर येथे जंगल सत्याग्रह झाला होता. काहींना अटकही झाली होती. टिळकांच्या आदेशाला सर्वस्व मानणाऱ्या तेव्हाच्या देशप्रेमी विचारांच्या मंडळींनी तन, मन, धन याची बाजी लावीत स्वातंत्र्यप्राप्तीच्या अग्निकुंडात आपल्या सर्वस्वाच्या समिधा टाकण्यासाठी मागेपुढे पाहिले नाही. टिळकांच्या स्वातंत्र्य प्राप्तीच्या लढ्याला बळ दिले. पाचव्या पिढीच्या हाती या मंडळाची सुत्रे ज्येष्ठांनी दिली. ही नवी पिढी तेवढ्याच श्रद्धेने अखंडीतपणे ११९ व्या वर्षांच्या बाप्पाच्या आगमनाची तयारी करीत आहे. यंदाही विधीवत गणरायाची प्रतिष्ठापना करुन दहा दिवस विविध धार्मिक , सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करुन गावात भक्तीमय वातावरण निर्माण केले जाते.

श्रींची मूर्ती देण्यासाठी भक्तांची स्पर्धाबारभाई गणेश मंडळाशी जुळलेल्या प्रत्येक भाविकाला दरवर्षी आपल्याकडून मूर्ती देण्याची इच्छा असते, मात्र पुढील दहा वर्षे पर्यंतची मूर्ती दरवर्षी प्रत्येक एकजण या प्रमाणे श्रद्धापूर्वक स्वखर्चाने देण्यासाठी मंडळाकडे नावाची नोंदणी करून ठेवते. त्यामुळे इच्छा असूनही अनेकांना ‘श्री’ ची मूर्ती देता येत नाही. मूर्तीसाठी येणारा खर्च दरवर्षी प्रत्येक एक जण स्वत:कडे घेण्यासाठी जणू स्पर्धाच असते.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८