शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
2
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
3
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
4
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
5
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
6
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
7
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
8
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
9
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
10
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
11
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
12
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
13
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
14
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
15
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
16
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
17
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
18
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
19
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
20
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी

गांधीवादी कार्यकर्ते जयवंत मठकर यांचे पुण्यात निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2022 13:06 IST

गांधीवादी कार्यकर्ते व सेवाग्राम आश्रमचे माजी अध्यक्ष जयवंत मठकर यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. ते गेल्या दोन महिन्यांपासून आजारी होते.

सेवाग्राम (वर्धा) : गांधी, विनोबा, जयप्रकाश यांच्या विचारांचे पाईक असलेले सर्वोदयी आणि विविध संस्थांच्या माध्यमातून भारतभर सतत कार्यरत असणारे सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष जयवंत गंगाराम मठकर यांचे वयाच्या ८५  व्या वर्षी निधन झाले. ते गेल्या दोन महिन्यांपासून आजारी होते. सोमवारी पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यात मंगळवारला सकाळी अंतसंस्कार पार पडला.

गांधी, विनोबा आणि जयप्रकाश यांची विचारसरणी आणि सर्वोदयाचा विचार घेऊन आयुष्यभर त्यांनी काम केले. साने गुरूजी, कथामाला, राष्ट्रसेवा दल, सर्व सेवा संघ, सर्वोदय मंडळ, खादी ग्रामोद्योग मध्यवर्ती संघ, महात्मा गांधी लोकसेवा संघ, महाराष्ट्र सेवा संघ, महाराष्ट्र ग्रामदान मंडळाचे अध्यक्ष, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान इ.संस्थेत त्यांनी विविध पदांवर कार्य केले.

जयवंत मठकरांचा जीवनप्रवास

जयवंत मठकर हे मुळचे रत्नागिरी जिल्ह्यातील मठ या गावचे. त्यांचा जीवनप्रवास हा खडतर असाच राहिला आहे. मठकर यांचा परिचय सर्वोदय जगतात "काका"म्हणूनच सदैव राहिला आहे. त्यांचे विचार व कार्याची छाप याचा प्रत्यक्ष अनुभव सेवाग्रामसह वर्धा येथील अनेक संस्थानी, लोकांनी अनुभवला आहे. माणसे जोडणे, युवकांना सक्रिय करणे, जबाबदारी देणे यामधून ते सर्वांमध्ये लोकप्रिय बनले होते.

त्यांचा पाच वर्षांचा काळ हा आश्रम वासियांसाठी तसेच सेवाग्राम वासियांसाठी अत्यंत महत्त्वाचा व स्मरणीय असाच राहिला आहे. त्यांनी कापूस ते कापड हा उपक्रम सुरू केला. यातून आश्रमातच खादीला चालना दिली. पर्यटकही सूतकताई व विनाई पाहून गांधीजींच्या काळातील खादीचे काम प्रत्यक्ष पाहता येऊ लागले. सेवाग्राम येथील दारूबंदी महिलांना सक्रिय करणे, सर्वोपरी मदत करीत असल्याने दारूविक्रेत्यांवर नियंत्रण आले होते.

सर्वोदय समाज संमेलन घेण्यात त्यांचा विशेष पुढाकार होता. गांधीजींचे नातू प्रा.जगमोहन गांधी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अॅड. प्रकाश आंबेडकर यांना एकाच विचार पिठावर आश्रमात आणून गांधी-आंबेडकर वाद हा कधीच नव्हता तर ती वैचारिक लढाई होती हे त्यांनी दाखवून दिले.

सेवाग्राम आश्रमातील कार्यकर्त्यांशी त्यांचा संबंध प्रेमवत आणि पारिवारिक असाच राहिला आहे. कार्यकर्त्यांना नेहमीच ते मान सन्मान देत, आस्थेने चौकशी करीत असे. त्यांच्या निधनाने एक सक्रिय कार्यकर्ता गमावला आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, जावई, एक मुलगा, सून, नातवंडे आणि मोठा आप्तपरिवार आहे.

टॅग्स :Deathमृत्यूSewagramसेवाग्रामwardha-acवर्धाsocial workerसमाजसेवक