शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
3
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
4
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
5
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
6
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
7
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
8
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
9
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
10
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
11
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
12
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
13
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
14
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
15
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
16
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
17
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
18
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
19
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
20
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!

गांधी आर्थिक, सामाजिकसह मानवीय मूल्यांना जोडतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 05:00 IST

सध्याच्या विज्ञान युगात गांधीजींच्या आर्थिक, सामाजिक विकास मूल्यांना समजणे गरजेचे आहे. सामाजिक परिवर्तन घडविणारे अर्थशास्त्र शिकवले पाहिजे. आज भविष्याच्या समस्येविषयी नवीन पिढी विचारत आहे. त्याचे उत्तर देता आले पाहिजे. नयी तालीम शिक्षण प्रणाली समजावून घेतली पाहिजे. शेवटी जे करणार आहे ते मानवासाठी, त्यामुळे गांधीजींच्या अर्थशास्त्राला समजावून घेतले पाहिजे, असे प्रा. वेळुकर यांनी स्पष्ट केले.

लोकमत न्यूज नेटवर्क सेवाग्राम : राजीव गांधी देशाचे पंतप्रधान असताना पंचायत राज अमलात आणले गेले, पण त्याची योग्य अंमलबजावणी झाली नाही. परिवर्तन फक्त महात्माच करू शकतात असे नसून अहिंसेच्या माध्यमातून फार मोठे क्रांतिकारक बदल, परिवर्तन मोहनदास यांनी केले आहे. आज व्हॉटस्ॲप, विद्यापीठाच्या माध्यमातून काय ज्ञान मिळणार? अहिंसेचा अर्थ खऱ्या अर्थाने गांधीजींनी दिला. त्यांनी जीवनात अहिंसा अंगीकारली. शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचणे आवश्यक आहे. गांधी आर्थिक, सामाजिक व मानवीय मूल्यांना जोडण्याचे काम करतात, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. राजन वेळुकर यांनी केले.सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या यात्री निवास सभागृहात दोन दिवसीय गांधी आणि ग्रामस्वराज्य या विषयावर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ते परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. व्यासपीठावर सेवाग्राम आश्रमचे अध्यक्ष टी. आर. एन. प्रभू, सामाजिक विज्ञान संस्थेचे अध्यक्ष डॉ. जार्ज मॅथ्यू, जमनालाल बजाज मेमोरियल लायब्ररी आणि रिसर्च सेंटर सेवाग्रामचे संचालक डॉ. सी. बी. के. जोसेब यांची उपस्थिती होती.प्रा. वेळुकर पुढे म्हणाले, गांधी देशासाठी क्रांतिकारक ठरले. त्यांचे महत्त्व आज, काल आणि उद्याही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. भाषण ऐकण्यापेक्षा त्याचे सकारात्मक परिणाम आणि रुजणे आवश्यक असते. गांधीजींनी अहिंसेचा उपयोग केला. गांधी समजण्यासाठी अहंकार सोडावाच लागतो. आज आपण जीडीपीबाबत खूप काही ऐकतो, पण यात मानवी मूल्याचे काय? असा प्रश्न याप्रसंगी वेळुकर यांनी उपस्थित केला. सध्याच्या विज्ञान युगात गांधीजींच्या आर्थिक, सामाजिक विकास मूल्यांना समजणे गरजेचे आहे. सामाजिक परिवर्तन घडविणारे अर्थशास्त्र शिकवले पाहिजे. आज भविष्याच्या समस्येविषयी नवीन पिढी विचारत आहे. त्याचे उत्तर देता आले पाहिजे. नयी तालीम शिक्षण प्रणाली समजावून घेतली पाहिजे. शेवटी जे करणार आहे ते मानवासाठी, त्यामुळे गांधीजींच्या अर्थशास्त्राला समजावून घेतले पाहिजे, असे प्रा. वेळुकर यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी गांधी फाऊंडेशन, हाऊस ऑफ लॉर्डस युनायटेड किंग्डमचे सदस्य लॉर्ड भिकू पारेख यांचा संदेश भाषणाचा व्हिडिओ दाखविण्यात आला, तसेच राष्ट्रीय गांधी संग्रहालय दिल्लीच्या माजी संचालिका वर्षा दास यांनीही आपले विचार व्हिडिओच्या माध्यमातून मांडले. प्रास्ताविक डॉ. जार्ज मॅथ्यू यांनी केले. संचालन प्रियंका यादव यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉ. सी. बी. के. जोसेफ यांनी मानले.

‘गांधी आश्रम’ सामान्य जीवन जगण्याचे उत्तम उदाहरण - प्रभू- गांधीजींच्या दृष्टीने प्रगती विकासाचे स्थान व्यक्ती असावा. सामान्य जीवन आपण जगू शकतो याचे जिवंत उदाहरण गांधीजींचे आश्रम होय. स्वातंत्र्यलढ्याची राजधानी सेवाग्राम राहिले. नयी तालीम शिक्षण प्रणाली आदर्श असून ग्रामस्वराज्य ही कल्पना पंचायत राजच्या माध्यमातून समाजातील तळागाळापर्यंत पोहोचली नाही. भविष्याचा विचार करता परिवर्तन हे व्यक्तीपासून होते. जे गांधीजींनी आपल्या जीवनातून आपल्यासमोर ठेवले आहे, असे याप्रसंगी टी. आर. एन. प्रभू यांनी सांगितले.

 

टॅग्स :Sewagramसेवाग्राम