शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

२५ हजार लोकसंख्येच्या आरोग्याशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 23:40 IST

शहरातील २५ हजार नागरिकांना गेल्या दहा दिवसापासून दुर्गंधीयुक्त पिवळया पाण्याचा पुरवठा होत असल्यामुळे साथीच्या आजारांनी तोंड वर काढले आहे. विशेष म्हणजे सहा किलोमीटर ममदापूर तलावातून जलशुद्धीकरण केंद्रावर पाणी पोहचल्यावर तेथे शुद्ध होतच नाही.

ठळक मुद्देदुर्गंधीयुक्त पिवळ्या पाण्याचा पुरवठा : ममदापूर तलावातून दुर्गंधीयुक्त पाणी जलशुद्धीकरण केंद्रात

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : शहरातील २५ हजार नागरिकांना गेल्या दहा दिवसापासून दुर्गंधीयुक्त पिवळया पाण्याचा पुरवठा होत असल्यामुळे साथीच्या आजारांनी तोंड वर काढले आहे. विशेष म्हणजे सहा किलोमीटर ममदापूर तलावातून जलशुद्धीकरण केंद्रावर पाणी पोहचल्यावर तेथे शुद्ध होतच नाही. त्यामुळे शासनाला लुटणारी यंत्रणा नियंत्रणात आणण्यासाठी वरिष्ठांनी व लोकप्रतिनिधींनी दखल घेण्याची मागणी आष्टी वासियांनी केली आहे.आष्टी नगरपंचायत हद्दीमधील एकूण १७ वॉर्डांना ममदापूर तलावामधुन पाणी आणून जलशुद्धीकरण केंद्रावरुन नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. जलशुद्धीकरण केंद्र आजारी पडले आहे. येथे शुद्ध होणाऱ्या पाण्याची पाहणी केली असता धक्कादायक माहिती पुढे आली. आहे. तलावातून लाल माती मिश्रित आलेले पाणी येथे शुद्ध होत नाही. ब्लिचींग पावडर व तुरटीचा वापर करुनही पाणी पिवळेच आहे. पाईपांना भलामोठा गंज चढला आहे. गेल्या अनेक वर्षापासून जलशुद्धीकरण केंद्राचे पाईप बदलविण्यात आले नाही. आष्टी पोलीस ठाण्याच्या मागील उंच टेकडीवर सदर केंद्र आहे येथे कोणीही फिरकून पाहत नाही. त्यामुळे महिन्याला देखभाल केल्या जात नाही. गोल रिंगण सिमेंट क्रॉक्रीटचे बनविले त्याठिकाणी शेवाळ प्रचंड साचली आहे. गेल्या दोन वर्षापासून एकदाही ड्राय करुन अळया नष्ट केल्या नाही एवढी भयंकर अवस्था आहे.ममदापूर तलावाची प्रत्यक्ष पाहणी केली असता तेथे गायी-म्हशी चारण्यासाठी गुराखी उन्हाळाभर जनावरांना तलावात बसायला सोडत होते. अनेक जनावर मृत्यु पावली ती याच पाण्यात पडून मेलीत. पशु पक्षी, रोही, डुक्कर यासारखे जंगली प्राणी येथे मेले. त्याचे मास पाण्यात कुजले. त्यामुळे पाण्याला प्रचंड वास येत आहे. तेच पाणी थेट जलशुद्धीकरण केंद्रात सोडण्यात येते. ममदापूर तलावात माती जास्त प्रमाणात आहे. गाळ काढण्याचे काम हाती घेतल्या जात नाही.तलावात रेती टाकल्या जात नाही. पाणी सोडण्याचे युनिट दुर्लक्षित आहे. येथे कोणीही येवून पाण्यात काही टाकले तर काहीच सुरक्षा नाही.ममदापूर तलाव व जलशुद्धीकरण केंद्र या दोन्हीच्या देखभाल व संरक्षणाची जबाबदारी नगरपंचायतीची आहे. मात्र त्यांचे दुर्लक्ष होत आहे. आष्टी, शहरामधून दरवर्षी लोकांकडून ४० लक्ष रुपये पाणीपट्टी कर गोळा होते. त्यामधून सर्व देखभाल केल्या जाते. पाणीकराच्या उत्पन्नातील ४० टक्केही निधी खर्च होत नसल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहे. दरवर्षी पावसाळ्यात पाणी पुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर येतो. पाणी पिवळे आले एवढी ओरड नागरिक करतात. प्रत्यक्षात वस्तुस्थिती फारच वाईट आहे. आष्टी नगरपंचायतची स्वच्छ पाणी देण्याची जबाबदारी आहे. पदाधिकाऱ्यांनी याची दखल घेवून दुर्गधीयुक्त पाण्याला आळा घालावा. स्वच्छ पाणी देण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्राला वरचेवर भेटी देवून स्वच्छ झाले की नाही याची पाहणी करावी, तुरटी व ब्लिचींग पाण्यात टाकण्याच्या सुचना द्याव्यात. ममदापूर तलावातील पाण्यात रेती टाकून स्वच्छता राखावी, जनावरांना पाण्यात बसु देव नये अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सामाजिक कार्य करणाऱ्यांनीही पाण्याच्या प्रश्नासाठी एकत्र येण्याची मागणी आष्टीकरांनी केली आहे. पाणीदार गावांसाठी काम करणाऱ्या संघटनानी ममदापूर तलावात गाळ काढण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी आहे. ग्रामस्थांचाही लोकसहभाग यात असायला हवा शासनावर अंवलंबून न राहता हे काम होऊ शकेल.पाण्याच्या व्हॉल्वभोवताल घाणच घाणपाणीपुरवठा करणाºया पाईपलाईन मधील प्रभागनिहाय पाणी सोडण्यासाठी असणारे पाण्याचे व्हॉल्व पाहिले असता त्यात घाणच घाण आहे. डुक्करांच्या पिण्याच्या पाण्याची सोय येथे असल्याचे दिसून आले. नाल्यांमधील कचरा साचला, त्यामुळे घाणीचे पाणी रस्त्यावरून वाहते. हेच पाणी, पाणी सोडण्याच्या व्हॉॅल्वमध्ये जमा होते. पाणीपुरवठा सुरू झाल्यावर अलबत घाणीचे पाणी नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यात जात आहे.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण