शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

अंत्यसंस्कार; तारासावंगा नि:शब्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 05:00 IST

गाडेगाव येथील दशक्रियेचा कार्यक्रम आटोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी तीर्थक्षेत्र झुंज येथील वर्धा नदीच्या पात्रामध्ये नावेच्या साहाय्याने जात असताना ११ जण नाव उलटल्याने नदी पात्रात बुडाले. यामध्ये तारासावंगा येथील  आदिती सुखदेव खंडाळे (१३), मोनाली सुखदेव खंडाळे (१२), आश्विनी अमर खंडाळे (२१) व नवदाम्पत्य वृषाली अतुल वाघमारे (१९) आणि अतुल गणेश वाघमारे (२५) यांचा समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कतारासावंगा : अमरावती जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र झुंज येथील वर्धानदीच्या पात्रात नाव उलटल्याने ११ जणांना जलसमाधी मिळाली. यामध्ये तारासावंगा येथील पाच जणांचा समावेश असून तब्बल दोन दिवसांनंतर गुरुवारी पाचही जणांचे मृतदेह सापडले. याची माहिती गावात पोहोचताच नागरिकांनी नदीतीरावर धाव घेतली. शोकमग्न वातावरणात मृतदेह गावात आणून त्यांच्यावर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच दिवशी पाच जणांवर अंत्यसंस्कार करण्याची गावातील ही पहिलीच घटना असून संपूर्ण गाव नि:शब्द झाले होते.गाडेगाव येथील दशक्रियेचा कार्यक्रम आटोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी तीर्थक्षेत्र झुंज येथील वर्धा नदीच्या पात्रामध्ये नावेच्या साहाय्याने जात असताना ११ जण नाव उलटल्याने नदी पात्रात बुडाले. यामध्ये तारासावंगा येथील  आदिती सुखदेव खंडाळे (१३), मोनाली सुखदेव खंडाळे (१२), आश्विनी अमर खंडाळे (२१) व नवदाम्पत्य वृषाली अतुल वाघमारे (१९) आणि अतुल गणेश वाघमारे (२५) यांचा समावेश आहे. घटनेनंतर गावात एकच धावपळ उडाली. जिल्हा प्रशासनाने यंत्रणा कामाला लावून शोधमोहीम सुरू केली. राज्य आपत्ती विभागाच्या चमूकडून लागलीच शोध कार्य सुरू केले असता गुरुवारी सकाळी साडेपाच वाजतापासून राबविलेल्या मोहिमेदरम्यान सकाळी ११ वाजेपर्यंत आदिती खंडाळे, आश्विनी खंडाळे, वृषाली वाघमारे आणि अतुल वाघमारे या चौघांचे मृतदेह सापडले. याची माहिती गावकऱ्यांना मिळताच गावावर दु:खाचा डोेंगर कोसळला. गावकऱ्यासह नातलगांनी घटनास्थळी धाव घेवून एकच हंबरडा फोडला. हृदय पिळवटून टाकणाऱ्या आक्रोशामुळे सर्वत्र स्मशानशांतता पसरली होती. दुपारी चौघांचेही मृतदेह गावात आणल्यानंतर दोन सरणावर चौघांचे अंतिमसंस्कार करण्यात आला. या अंत्यसंस्काराकरिता वर्धा, अमरावती व नागपूर जिल्ह्यासह पंचक्रोशितील नागरिकांनी गर्दी केली होती. त्यानंतर दुपारी चार वाजताच्या सुमारास मोनाली खंडाळे हिचाही मृतदेह सापडल्याने तिच्यावरही सायंकाळी भर पावसात अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनेनंतर गेल्या दोन दिवसांपासून गावात एकाही घरी चूल पेटली नाही. पाचही जणांचे मृतदेह मिळेपर्यंत गावकऱ्यांनी अक्षरश: उपवासच केला होता. 

रुग्णवाहिकेतून झाले मुखदर्शन- गुरुवारी दुपारी चौघांचे मृतदेह गावात आणण्यात आले. मृतदेहांचे शवविच्छेदन केले असल्याने आई-वडिलांसह नातलगांना रुग्णवाहिकेतूनच मृतदेहांचे मुखदर्शन घेतले. यावेळी आक्रोशाने परिसर दणाणून गेला होता. हे दृश्य पाहून उपस्थितांच्याही डोळ्यातून अश्रू ओघळायला लागले. रुग्णवाहिकेतूनच मृतदेह गावातील भडक नाल्याच्या काठावर नेण्यात आले. तेथे दोन सरणावर चारही मृतदेहांना मुखाग्नी देण्यात आला.  या अंत्यसंस्काराला जि. प. सदस्य अंकिता होले, जि. प. सदस्य  त्रिलोकचंद कोहळे, उपसभापती गोविंद खंडाळे, गटविकास अधिकारी बारापात्रे, आष्टीचे ठाणेदार लक्ष्मण लोकरे, पोलीस उपनिरीक्षक देरकर, सचिन होले, गजानन भोरे, पोलीस पाटील अंजली कडू, सरपंच शीतल खंडाळे, विस्तार अधिकारी वानखेडे, अमर गोरे, आशिष फडफड, देवानंद पेठे, प्रशांत काकपुरे, ग्रामसेवक कटकतलवारे, माधव मानमोडे तसेच गावातील शिक्षक व नागरिक उपस्थित होते. 

नवदाम्पत्याच्या आयुष्याचा शेवटही सोबतीनेच...    nमहिन्याभरापूर्वी विवाह बंधनात अडकलेल्या अतुल व रूपाली वाघमारे परिवारासोबत दशक्रियेच्या कामाला गेले होते. नवीन आयुष्याचे स्वप्न रंगवित नावेतून प्रवास करीत असतानाच नाव उलटली आणि स्वप्नांचाही चुराडा झाला. नियतीच्या या घाताने दोघांचाही सोबतच शेवट झाला. त्यामुळे मृतदेह सापडल्यानंतर दोघांवरही एकाच सरणावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

झुंज येथील घटनेत माझ्या दोन्ही मुली पाण्यात बुडाल्या. मोठी आदिती आणि लहान मोनाली दोघीही अभ्यासू आणि परिवाराच्या फार लाडक्या होत्या. मी हातमजुरी करून दोन्ही मुलींचा सांभाळ केला. पण, आता त्याच नसल्याने घराचं घरपण हिरावून गेलं आहे. आमचा मोठा आधार अचानक निघून गेल्याने या दु:खातून कसे सावरणार? - सुखदेव खंडाळे, मोनाली व आदितीचे वडील

 

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघात