शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

मसाळा गावातून चार अल्पवयीन मित्र बेपत्ता, सेलू पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल

By चैतन्य जोशी | Updated: September 25, 2022 13:23 IST

गावात एकत्र खेळणारे, बागडणारी चार अल्पवयीन मुले अचानक सायंकाळच्या सुमारास गावातून बेपत्ता झाली.

वर्धा :

गावात एकत्र खेळणारे, बागडणारी चार अल्पवयीन मुले अचानक सायंकाळच्या सुमारास गावातून बेपत्ता झाली. ही घटना सेलू तालुक्यातील मसाळा गावात शनिवारी रात्रीच्या सुमारास उजेडात आली. मुले बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली असून रात्रभर पाेलीस कुमक आणि नागरिकांनी रात्र जागून काढली. याप्रकरणी सेलू पोलिसांनी रात्री उशिरा अपहरणाचा गुन्हा दाखल केला. पप्पू देवढे (१३), राज येदानी (१३), राजेंद्र येदाणी(१२), संदीप भुरानी (०८) अशी बेपत्ता झालेल्या मुलांची नावे आहे.

शनिवारी सकाळच्या सुमारास मनोज मुंगसाजी देवढे याने त्याचा मुलगा पप्पू देवढे याला शाळेतून घरी आणले आणि तो शेतात कामावर निघून गेला. सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास मनोज काम आटोपून घरी आला असता त्याला पप्पू घरी दिसुन आला नाही. अंधार पडत असल्याने मनोजने पप्पूचा गावात शोध घेतला असता त्याचे तीन मित्र देखील गावातून बेपत्ता असल्याची त्याला माहिती मिळाली. दरम्यान चारही मुलांचे आई वडिल शोधात निघाले. मात्र, कुठेही ती मुले मिळून न आल्याने घरच्यांनी सेलू पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी तत्काळ या घटनेची दखल घेत मसाळा गाव गाठून पंचनामा करुन अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी दिली.रात्रभर ‘एसपीं’चा गावात मुक्काममसाळा गावातून चार अल्पवयीन मुलं बेपत्ता झाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरताच. पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक संजय गायकवाड तसेच आदी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी थेट सेलू नजीकच्या मसाळा गावात भेट दिली. गावातील परिरसरात तसेच जंगल परिसरात रात्रभर शोध मोहीम राबविली. मात्र, मुलांचा कुठेही थांगपत्ता लागला नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी