शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

चार एकर शेतात रानडुकरांचा धुमाकूळ

By admin | Updated: January 19, 2017 00:22 IST

आठ दिवसांपूर्वी वाई गावातील शेतकऱ्याचा रानडुकरांनी हल्ला करून बळी घेतला.

शेतकऱ्यांचे नुकसान : तूर, कपाशीचे पीक केले नष्ट रोहणा : आठ दिवसांपूर्वी वाई गावातील शेतकऱ्याचा रानडुकरांनी हल्ला करून बळी घेतला. त्याच गावातील शेतकरी पुंडलिक गजकेश्वर यांच्या चार एकर शेतात रानडुकरांनी अक्षरश: धुमाकूळ घातला. कापणीला आलेली तूर व वेचणीला आलेल्या कापसाची रात्री नासाडी केली. यामुळे झालेला खर्च कसा भरून निघेल, बँकांचे कर्ज व उधारी कशी फेडावी तथा संसाराचा गाडा कसा हाकावा, असा प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे. वाई येथील पुंडलिक गजकेश्वर यांचे वाई शिवारात सर्व्हे क्र. ४५ मध्ये १.२४ हेक्टर शेत आहे. त्यांनी या शेतात तूर व कपाशीचे पीक घेतले होते. तुरीचे पीक कापणीचा आले होते तर अद्याप अर्धा कापूस निघायचा होता. कापसाचा वेचा फुटला होता. अशावेळी रात्री या शेतात रानडुकरांच्या कळपाने धुडगूस घालत संपूर्ण पीक नष्ट केले. यात शेतकऱ्याचे अंदाजे ५० ते ६० हजार रुपयांचे नुकसान झाले. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी कष्टाने पीक घेत आहे. त्याचे रक्षण करताना स्वत:चा जीव धोक्यात घालतो; पण श्वापदांमुळे पीक नष्ट होते. रोहणा परिसरातील वाई, पिंपळधरी या जंगलव्याप्त भागात गत काही दिवसांपासून जंगली श्वापदांचा हैदोस वाढला आहे. आठ दिवसांपूर्वी एका शेतकऱ्यावर तुरीची कापणी करीत असताना रानडुकरांनी हल्ला करीत ठार केले. एक महिन्यापूर्वी याच शेत शिवारातील फनिंद्र रघाटाटे व अभिजीत बुरघाटे यांच्या शेतातील पिकांची नासधूस रानडुक्कर व रोह्यांनी केले. गजकेश्वर हे अल्पभूधारक व गरीब शेतकरी असून नुकसानामुळे ते खचले. वनविभागाने या प्रकरणात त्वरित आर्थिक मदत मिळवून द्यावी, श्वापदांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.(वार्ताहर)