शहरं
Join us  
Trending Stories
1
"सीमा उघडा, आम्हाला वाचवा..."; बांगलादेशात अडकलेल्या हिंदूंची भारताकडे विनवणी
2
बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
3
सुट्टीच्या मुडमध्ये असाल तर सावधान! ३१ डिसेंबरपर्यंत 'ही' ३ महत्त्वाची कामे उरका, अन्यथा १ जानेवारीपासून आर्थिक व्यवहारांना बसणार ब्रेक
4
चुलत भावासोबतच शरीरसंबंध, तरुणी राहिली गर्भवती; गर्भपात करण्यासाठी गोळी घेतली अन् गेला जीव
5
भाजपा नेत्याच्या कारने ५ जणांना चिरडलं; जमावाने पकडलं, मात्र पोलिसांच्या तावडीतून आरोपी फरार
6
जपानमधील एका एक्सप्रेसवेवर ५० हून अधिक वाहनांची टक्कर, एकाचा मृत्यू; २६ जण जखमी
7
आपल्या मुलांसाठी LIC च्या 'या' स्कीममध्ये करू शकता गुंतवणूक; जबरदस्त रिटर्नसह मिळेल इन्शुरन्स, पटापट पाहा डिटेल्स
8
भयंकर! पंतप्रधान आवास योजनेचा मिळाला नाही लाभ; पेट्रोल टाकून थेट ग्रामपंचायतीला लावली आग
9
Nitish Kumar : Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
10
Post Office Investment Scheme: दररोज करा छोटी बचत, मिळतील १७ लाख रुपये; पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम करेल मालामाल, पटापट पाहा डिटेल्स
11
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
12
Scorpio Yearly Horoscope 2026: वृश्चिक राशीसाठी नवीन वर्ष 2026: आव्हानांमधून प्रगतीची 'आशा'; परिश्रमात सातत्य ठेवल्यास होणार नाही निराशा 
13
Nashik Municipal Corporation Election : मित्रपक्षाच्या ३ माजी नगरसेवकांवरही भाजपाचा गळ, ९०हून अधिक सक्षम उमेदवार असल्याचा दावा
14
औटघटकेची ठरली तिसऱ्या आघाडीची चर्चा! निलंबित नेत्यांची होणार घरवापसी, नागपुरात घेतली वरिष्ठांची भेट
15
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
16
Libra Yearly Horoscope 2026: तूळ राशीसाठी नवीन वर्ष 2026 नियोजन आणि स्वप्नपूर्तीचे वर्ष; 'या' एका चुकीमुळे होऊ शकते मोठे नुकसान!
17
पिंपरीत आम्ही १२५ जागा जिंकू, अजित पवारांना फक्त तीनच जागा मिळणार', भाजपा आमदाराचा दावा
18
फोननंतर विजयकुमारांचा बंडाचा झेंडा; गोरे, तडवळकर मुंबईकडे, उमेदवारीवरून रणकंदन
19
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
20
आता कॅब बुक करताना मिळणार महिला ड्रायव्हर निवडण्याचा पर्याय, महिलांच्या सुरक्षेसाठा सरकारचा मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धीतील वृक्षकटाईबाबत वनविभाग अनभिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 15:07 IST

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी वर्धा जिल्ह्यातील किती वृक्ष कापले जातील याची साधी माहितीही जिल्ह्यातील वनविभागाला देण्यात आली नसल्याचे माहिती अधिकारातून उजेडात आले आहे.

ठळक मुद्देतोडलेल्या झाडांची माहितीच नाही माहिती अधिकारातून प्रकार उघड

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या महत्त्वाकांशी प्रकल्पांपैकी एक अशी नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गाची ओळख. हा महामार्ग वर्धा जिल्ह्यातून जात असला तरी सदर महामार्गासाठी वर्धा जिल्ह्यातील छोटी-मोठी अशी किती वृक्ष कापली जातील याची साधी माहितीही जिल्ह्यातील वनविभागाला देण्यात आली नसल्याचे माहिती अधिकारातून उजेडात आले आहे. त्यामुळे एमएसआरडीसीच्या व वन विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.मराठवाडा व विदर्भाच्या विकासासाठी समृद्धी महामार्ग फायद्याचाच ठरणार आहे. या महामार्गामुळे उद्योग व व्यापाराला चालणा मिळणार, असे सांगितले जाते. इतकेच नव्हे तर नागपूर ते मुंबई हे अंतर कापण्यासाठी सध्या १४ तास लागत असून समुद्धी महामार्गाच्या निर्मितीनंतर केवळ ८ तासातच हे अंतर पूर्ण करता येणार आहे. हा महामार्ग नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे व मुंबई या जिल्ह्यातून जात आहे. सुमारे २६ तालुक्यातील ३९२ गावांचा संबंध या महामार्गाशी येणार आहे. समुद्धी महामार्गाचे काम एकूण पाच टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्याचे काम विदर्भातून सुरू झाले आहे. नागपूर-मुंबई या समुद्धी महामार्गाच्या निर्मितीदरम्यान सुमारे ५० पेक्षा जास्त उडाणपुल आणि २४ हून अधिक इंटरचेंजेस तसेच पाच भूयारी मार्ग निर्माण होतील. उल्लेखनिय म्हणून ग्रिन फिल्ड कॉरिडोर हे एक वैशिष्ट या महामार्गाचे आहे. असे असले तरी या महामार्गाच्या निर्मितीदरम्यान मोठ्या प्रमाणात वृक्ष तोडली जात आहे. वर्धा जिल्ह्यातून जाणाऱ्या समुद्धी महामार्गात किती वृक्ष तोडली जाणार आहे याची माहिती जाणून घेण्यासाठी वर्धेतील ज्येष्ठ आरटीआय कार्यकर्ता तसेच वृक्षप्रेमी ताराचंद चौबे यांनी वन विभागाला माहितीच्या अधिकारात सुमारे तीन मुद्द्यांन्वये माहिती विचारली. त्यावर वन विभागाने समुद्धी महामार्गाकरिता होत असलेल्या वृक्ष कत्तलीसाठी कुठलीही परवानगी देण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे होत असलेली वृक्ष तोड अवैध तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अपिल न करताच आदेश झाला पारितयेथील उपवनसंरक्षक कार्यालयाला आरटीआय कार्यकर्ता ताराचंद चौबे यांनी माहितीच्या अधिकारान्वये समुद्धी महामार्गाकरिता होत असलेल्या अवैध वृक्ष कत्तलीबाबत माहिती मागविली. त्यावर वन विभागाने असमाधानकारक उत्तर देत आमच्याकडून वृक्षतोड संदर्भात परवानगी दिली नसल्याची स्पष्टोक्ती लेखी पत्राद्वारे केली आहे. असे असले तरी कुठलाही अपिल अर्ज दाखल न करता उपवनसंरक्षक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सदर माहिती वर्धा, हिंगणी व आर्वी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी ताराचंद चौबे यांना तात्काळ देण्याचा आदेश पत्र क्रमांक/सवंस/तेंदू : १८५ अन्वये निर्गमित केला आहे. परिणामी, वन विभागातील अधिकाऱ्यांनी माहितीच्या अधिकाराचा चांगला अभ्यास करणे गरजेचेचे असल्याचे दिसून येते. शिवाय तसे आवश्यक असल्याचेही बोलले जात आहे.

ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्त्वात गत दोन वर्षांपासून वृक्षाचे महत्त्व ओळखून मोठ्या प्रमाणात वृक्षरोपण केले जात आहे. मात्र, विकासाच्या नावाखाली सध्या मोठ्या प्रमाणात अवैध वृक्ष कत्तल केली जात आहे. हा प्रकार निंदनियच असून विकासाला आमचा विरोध नाही; पण विकास साधताना वृक्षही जगावे यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. उपवनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाने माहिती अधिकाराद्वारे आपल्याला दिलेले उत्तर असमाधानकारकच आहे. सदर अधिकाऱ्यांनी तात्काळ माहिती उपलब्ध करून द्यावी.- ताराचंद चौबे, आरटीआय कार्यकर्ता, वर्धा

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग