शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतील अस्थितरता कायमच

By admin | Updated: July 15, 2016 02:25 IST

स्थानिक नगर परिषदेच्या नगराध्यक्षासह पाच नगरसेवकांना जिल्हाधिकाऱ्यांनी एका आदेशाद्वारे अपात्र ठरविले.

पुलगाव येथील प्रकरण : अपात्र नगरसेवकांबाबत न्यायालयीन सुनावणी सोमवारी पुलगाव : स्थानिक नगर परिषदेच्या नगराध्यक्षासह पाच नगरसेवकांना जिल्हाधिकाऱ्यांनी एका आदेशाद्वारे अपात्र ठरविले. या आदेशाला या पाचही नगरसेवकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून आव्हान दिले. यावर गुरुवारी सुनावणी होणार होती; मात्र आता ही सुनावणी येत्या सोमवारी होणार असल्याचे न्यायालयाने जाहीर केले. याच काळात नगराध्यक्षाच्या निवडणुकीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यक्रम जाहीर केला. दरम्यान, न्यायालयीन सुनावणी पूर्ण होईस्तोवर नराध्यक्षाची निवडणूक होणार नसल्याचे न्यायालयाने आदेशित केल्याने या निवडणुकीबाबत अस्थिरता कायम आहे. महाराष्ट्र लोकल अथॉरिटी डिसक्वालिफीकेशन अ‍ॅक्ट १९८६ चे कलम ७ यु. एस. १६ (१ए) कलमान्वये जिल्हाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष मनीष साहूसह पाच नगरसेवकांना अपात्र ठरविले होते. त्यानंतर रिक्त असलेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होवून १२ जुलै २०१६ ला निवडणुकही होणार होती; परंतु अपात्र ठरविण्यात आलेल्या नगराध्यक्षासह पाचही नगरसेवकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानुसार नगराध्यक्ष निवडणुकीपुर्वीच ११ जुलै रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होवून नगराध्यक्ष पदाची निवडणूक न्यायालयीन सुनावणी पूर्ण होईपर्यंत पुढे ढकलण्यात आली. या प्रकरणी आज सुनावणी अपेक्षित होती; परंतु काही कारणास्तव ही सुनावणी येत्या सोमवारी होणार असल्याचे समजते. न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण शहरवासीयांचे लक्ष लागले असून या प्रकरणामुळे सत्तारूढ काँग्रेस पक्षातील दोन्ही गट दंड थोपटून आमने-सामने उभे ठाकले आहे.(तालुका प्रतिनिधी) पालिकेवर कुणाचाही वचक नाही नगर सेवकांच्या या राजकीय भानगडीत नगर परिषदेत कुणाचाही वचक राहिलेला नाही. शहरवासियांना पावसाच्या दिवसात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याची नागरिकांची ओरड आहे. आॅक्टोबर, नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या नगराध्यक्ष व नगर सेवकांच्या निवडणुकीसाठी अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झालेत. त्यांना शहरातील समस्यांचे नव्हे तर नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीचे वेध लागले आहे. अशातच गत कित्येक महिन्यापासून नगराध्यक्षाची खूर्ची रिक्त आहे. नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, गटनेता प्रत्येक समितीची सभापती या प्रत्येकाचे स्वतंत्र कक्ष आहेत. या राजकीय वादळात सर्वांचेच कक्ष कुलूपबंद आहेत. यामुळे आपल्या कामासाठी येणाऱ्या नागरिकांना आल्या पावलीच परतावे लागत असल्याची स्थिती आहे.