शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

पाच वर्षांत वर्धा वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत १० जणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 15:34 IST

Wardha News वर्धा वनपरिक्षेत्रात वाघांच्या संख्येसह वन्यप्राण्यांची संख्याही अधिक आहे. संख्या वाढत असताना त्यांचा अधिवास, भ्रमणमार्ग खंडित होऊ लागले आहेत.

ठळक मुद्दे२०६ व्यक्ती झाले गंभीर जखमी २२५.५८ लाखांची आर्थिक मदत

 लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : वन्यप्राण्यांच्या वास्तव्य क्षेत्राचा संकोच झाल्याने मानव- वन्यजीव संघर्ष टोकाला पोहोचला आहे. वर्धा वनपरिक्षेत्रात वाघांच्या संख्येसह वन्यप्राण्यांची संख्याही अधिक आहे. संख्या वाढत असताना त्यांचा अधिवास, भ्रमणमार्ग खंडित होऊ लागले आहेत. त्यामुळे वन्यजीव आणि मानव आमने-सामने येऊ लागल्याने संघर्ष वाढलेला आहे. गेल्या पाच वर्षांत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत तब्बल १० जणांना आपला जीव गमवावा लागला असून, २०६ व्यक्तींना गंभीर इजा पोहोचली आहे.

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील मृतांसह गंभीर जखमी झालेल्यांना वनविभागाकडून आतापर्यंत २२५ लाख ८ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळाली असल्याची माहिती आहे. जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. उन्हाळ्यात अशा घटना जास्त प्रमाणात घडतात. वनात पाणीटंचाई निर्माण होत असल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावांकडे वळतात. इतकेच नव्हेतर जंगल क्षेत्रालगत असलेल्या शेतशिवारात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ असतोच.

वन्यप्राणी गावात प्रवेश करून जनावरांवर हल्ले, सरपण गोळा करणाऱ्या, शेतकाम करणाऱ्या अनेकांवर हल्ले करतात. त्यामुळे नागरिक जंगलात एकट्याने जाण्यास टाळतात. वनविभाग वन्यप्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी विविध उपाययोजना करून नागरिकांना जंगलात जाण्यापासून सावध करीत आहे. मात्र वन्यप्राणी हल्ल्याच्या घटनेत घट झालेली नाही. या घटनांतील सर्व मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात घरचा कर्ता व्यक्ती गेल्याच्या अनेक घटना आहेत. त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न त्यांच्यासमोर असून, भविष्यात मानव-वन्यप्राणी संघर्षातून कोणतीही जीवितहानी होऊ नये, यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याची गरज आहे.

अनेकांना आले अपंगत्व

जिल्ह्यातील वन क्षेत्रात वाघ, बिबटे, अस्वल आदींसारख्या वन्यप्राण्यांची संख्या अधिक आहे. अनेकदा शेतात काम करीत असलेल्या शेतकरी किंवा शेतमजुरांवर वन्यप्राणी हल्ले चढवितात. अशा घटनांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अनेकांना तर कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे.

मृतांसह जखमींना आर्थिक मदत

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात गेल्या पाच वर्षांत जखमी झालेल्या २०६ जणांना १२२ लाख ३५ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. तर मृत पावलेल्या १० व्यक्तींच्या कुटुंबाला १०३ लाख रुपयांची आर्थिक मदत वनविभागाकडून मिळाल्याची माहिती आहे.

वर्षनिहाय गंभीर झालेले व्यक्ती

वर्ष             गंभीर अनुदान (लाखांत)

२०१६-१७ ३२             १९.२६

२०१७-१८ ४०             १८.७५

२०१८-१९ ४५             २३.८६

२०१९-२० ६५             ४६.३६

२०२०-२१ २४             १४.३५

वर्षनिहाय मृत पावलेल्यांची संख्या

वर्ष            मृत अनुदान (लाखांत)

२०१७-१८ ०३            २४.००

२०१८-१९ ०४            ३४.००

२०१९-२० ०३            ४५.००

.................................

टॅग्स :Tigerवाघ