शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

पाच वर्षांत वर्धा वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत १० जणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 15:34 IST

Wardha News वर्धा वनपरिक्षेत्रात वाघांच्या संख्येसह वन्यप्राण्यांची संख्याही अधिक आहे. संख्या वाढत असताना त्यांचा अधिवास, भ्रमणमार्ग खंडित होऊ लागले आहेत.

ठळक मुद्दे२०६ व्यक्ती झाले गंभीर जखमी २२५.५८ लाखांची आर्थिक मदत

 लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : वन्यप्राण्यांच्या वास्तव्य क्षेत्राचा संकोच झाल्याने मानव- वन्यजीव संघर्ष टोकाला पोहोचला आहे. वर्धा वनपरिक्षेत्रात वाघांच्या संख्येसह वन्यप्राण्यांची संख्याही अधिक आहे. संख्या वाढत असताना त्यांचा अधिवास, भ्रमणमार्ग खंडित होऊ लागले आहेत. त्यामुळे वन्यजीव आणि मानव आमने-सामने येऊ लागल्याने संघर्ष वाढलेला आहे. गेल्या पाच वर्षांत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत तब्बल १० जणांना आपला जीव गमवावा लागला असून, २०६ व्यक्तींना गंभीर इजा पोहोचली आहे.

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील मृतांसह गंभीर जखमी झालेल्यांना वनविभागाकडून आतापर्यंत २२५ लाख ८ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळाली असल्याची माहिती आहे. जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. उन्हाळ्यात अशा घटना जास्त प्रमाणात घडतात. वनात पाणीटंचाई निर्माण होत असल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावांकडे वळतात. इतकेच नव्हेतर जंगल क्षेत्रालगत असलेल्या शेतशिवारात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ असतोच.

वन्यप्राणी गावात प्रवेश करून जनावरांवर हल्ले, सरपण गोळा करणाऱ्या, शेतकाम करणाऱ्या अनेकांवर हल्ले करतात. त्यामुळे नागरिक जंगलात एकट्याने जाण्यास टाळतात. वनविभाग वन्यप्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी विविध उपाययोजना करून नागरिकांना जंगलात जाण्यापासून सावध करीत आहे. मात्र वन्यप्राणी हल्ल्याच्या घटनेत घट झालेली नाही. या घटनांतील सर्व मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात घरचा कर्ता व्यक्ती गेल्याच्या अनेक घटना आहेत. त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न त्यांच्यासमोर असून, भविष्यात मानव-वन्यप्राणी संघर्षातून कोणतीही जीवितहानी होऊ नये, यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याची गरज आहे.

अनेकांना आले अपंगत्व

जिल्ह्यातील वन क्षेत्रात वाघ, बिबटे, अस्वल आदींसारख्या वन्यप्राण्यांची संख्या अधिक आहे. अनेकदा शेतात काम करीत असलेल्या शेतकरी किंवा शेतमजुरांवर वन्यप्राणी हल्ले चढवितात. अशा घटनांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अनेकांना तर कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे.

मृतांसह जखमींना आर्थिक मदत

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात गेल्या पाच वर्षांत जखमी झालेल्या २०६ जणांना १२२ लाख ३५ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. तर मृत पावलेल्या १० व्यक्तींच्या कुटुंबाला १०३ लाख रुपयांची आर्थिक मदत वनविभागाकडून मिळाल्याची माहिती आहे.

वर्षनिहाय गंभीर झालेले व्यक्ती

वर्ष             गंभीर अनुदान (लाखांत)

२०१६-१७ ३२             १९.२६

२०१७-१८ ४०             १८.७५

२०१८-१९ ४५             २३.८६

२०१९-२० ६५             ४६.३६

२०२०-२१ २४             १४.३५

वर्षनिहाय मृत पावलेल्यांची संख्या

वर्ष            मृत अनुदान (लाखांत)

२०१७-१८ ०३            २४.००

२०१८-१९ ०४            ३४.००

२०१९-२० ०३            ४५.००

.................................

टॅग्स :Tigerवाघ