शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

नागपूर-अमरावती महामार्गावर विचित्र अपघात : पाच वाहने धडकली, ३ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2021 18:44 IST

नागपूर-अमरावती महामार्गावर मंगळवारी पहाटे ५ च्या सुमारास एक दोन नव्हे तब्बल पाच वाहने एकमेकांना धडकल्याची विचित्र घटना घडली. यात तीन जण जखमी झाले असून त्यांना नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

ठळक मुद्देपहाटे घडली घटना : सत्याग्रही घाटातील अपघात

वर्धा : नागपूर-अमरावती महामार्गावरील सत्याग्रही घाटात मंगळवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास एक दोन नव्हे तब्बल पाच वाहने एकमेकांवर धडकली. या घटनेत तीन जण जखमी झाले आहेत. या अपघाताची नोंद पोलिसांनी घेतली आहे.

नंदू ज्ञानेश्वर सोळंके, भागवत रामदास तेलंगरे व पुरुषोत्तम बेराडे तिन्ही रा. जालना  अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. माहितनुसार, जी. जे. ०३ बी. टी. ६४३२ क्रमांकाचा नादुरुस्त ट्रक रस्त्याच्या कडेला उभा हाेता. दरम्यान सिमेंटचे पोल घेऊन अमरावतीच्या दिशेने जाणाऱ्या एम. एच. २१ एक्स ५१५३ क्रमांकाच्या भरधाव ट्रकने उभ्या ट्रकला धडक दिली. यात नंदू, भागवत व पुरुषोत्तम हे तिघे जखमी झाले. अपघात झाल्याचे लक्षात येताच जखमींना मदत करण्यासाठी मागाहून येणाऱ्या एम. एच. ०४ बी. ओ. ६७४१ क्रमांकाच्या ट्रक चालकाने आपले वाहन थांबविले. अशातच एम. एच. ३२ सी. ७८६४ क्रमांकाची कारही थांबली. पण मागाहून येणाऱ्या अज्ञात भरधाव ट्रकने कार व ट्रकला धडक दिली. यामुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले आहे.

या अपघातामुळे नागपूर-अमरावती मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने २ किमीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच तळेगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना रुग्णालयाकडे रवाना केले. शिवाय अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या कडेला करून खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. जखमींची प्रकृती नाजूक असल्याने त्यांना नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Accidentअपघात