शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
4
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
5
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
8
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
9
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
10
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
11
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
12
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
13
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
14
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
15
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
16
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!
17
"तिला परत त्या असुरक्षित वातावरणात ढकललंच नाही पाहिजे...", हुंडाबळी प्रकरणावर नेहा शितोळे स्पष्टच बोलली
18
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
19
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
20
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले

गाव तिथे प्रवासी निवारा योजनेचा फज्जा

By admin | Updated: June 16, 2014 23:39 IST

महामंडळाने दळणवळण व्यवस्था सुरळीत व्हावी व प्रत्येक गाव शहराशी जोडले जावे यासाठी बसेसची सुविधा केली. तसेच प्रवाशांना थांबण्यासाठी गाव तिथे प्रवासी निवारा ही योजना राबविली.

दारोडा : महामंडळाने दळणवळण व्यवस्था सुरळीत व्हावी व प्रत्येक गाव शहराशी जोडले जावे यासाठी बसेसची सुविधा केली. तसेच प्रवाशांना थांबण्यासाठी गाव तिथे प्रवासी निवारा ही योजना राबविली. परंतु आजघडीला बहुतेक गावातील प्रवासी निवारे अखेरची घटका मोजत आहे. त्यामुळे या योजनेचा फज्जा उडाल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र दिसून येत आहे.या योजनेअंतर्गत जिल्ह्यात खासदार, आमदार निधीतून प्रवासी निवाऱ्याचे बांधकाम गावापासून १ ते २ कि़मी. अंतरावर करण्यात आले. पण मधल्या काही काळात त्याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे या प्रवासी निवाऱ्यांची अत्यंंत दुरवस्था झाली. प्रवाशांना उन्ह, वारा, पाऊस सहन करीत तासनतास बसची वाट पाहत रहावे लागत आहे.होत असलेल्या असुविधेमुळे गाव तिथे प्रवासी निवारा ही योजना शासनाचा निधी बुडविणारीच ठरली अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवासी वर्गातून उमटत आहे. ही योजना राबवूनही अद्याप काही गावांमध्ये प्रवासी निवाराच नाही. अशा गावांमध्ये महामंडळाची बस थांबण्याची शाश्वती नसते. त्यामुळे प्रवाशांना कुठे थांबावे हा प्रश्न पडला आहे.राज्यात एस.टी. प्रवासाचे मुख्य साधन आहे. शासनाने मोठा गाजावाजा करीते ही योजना राबविली. पण योजनेचे फलित मात्र साध्य झाले नाही. त्यातच ग्रामीण भागात बसेसची अवस्थाही अतिशय दयनीय झाली आहे. एक बस गेल्यावर दुसरी बस येण्यासाठी तासंतास वाट पहावी लागते. अनेकदा वाहक व चालक प्रवाशांशी, विद्यार्थ्यांशी असभ्य वर्तवणूक करतात. गत काही महिन्यात अशा तक्रारी वाढल्या आहेत. या योजनेचा फज्जाच उडाल्याने याकडे लोक प्रतिनिधीनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. शासनानेही याची दखल दखल घेवून, गाव तिथे प्रवासी निवारो व्हावे अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)