शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

गाव तिथे प्रवासी निवारा योजनेचा फज्जा

By admin | Updated: June 16, 2014 23:39 IST

महामंडळाने दळणवळण व्यवस्था सुरळीत व्हावी व प्रत्येक गाव शहराशी जोडले जावे यासाठी बसेसची सुविधा केली. तसेच प्रवाशांना थांबण्यासाठी गाव तिथे प्रवासी निवारा ही योजना राबविली.

दारोडा : महामंडळाने दळणवळण व्यवस्था सुरळीत व्हावी व प्रत्येक गाव शहराशी जोडले जावे यासाठी बसेसची सुविधा केली. तसेच प्रवाशांना थांबण्यासाठी गाव तिथे प्रवासी निवारा ही योजना राबविली. परंतु आजघडीला बहुतेक गावातील प्रवासी निवारे अखेरची घटका मोजत आहे. त्यामुळे या योजनेचा फज्जा उडाल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र दिसून येत आहे.या योजनेअंतर्गत जिल्ह्यात खासदार, आमदार निधीतून प्रवासी निवाऱ्याचे बांधकाम गावापासून १ ते २ कि़मी. अंतरावर करण्यात आले. पण मधल्या काही काळात त्याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे या प्रवासी निवाऱ्यांची अत्यंंत दुरवस्था झाली. प्रवाशांना उन्ह, वारा, पाऊस सहन करीत तासनतास बसची वाट पाहत रहावे लागत आहे.होत असलेल्या असुविधेमुळे गाव तिथे प्रवासी निवारा ही योजना शासनाचा निधी बुडविणारीच ठरली अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवासी वर्गातून उमटत आहे. ही योजना राबवूनही अद्याप काही गावांमध्ये प्रवासी निवाराच नाही. अशा गावांमध्ये महामंडळाची बस थांबण्याची शाश्वती नसते. त्यामुळे प्रवाशांना कुठे थांबावे हा प्रश्न पडला आहे.राज्यात एस.टी. प्रवासाचे मुख्य साधन आहे. शासनाने मोठा गाजावाजा करीते ही योजना राबविली. पण योजनेचे फलित मात्र साध्य झाले नाही. त्यातच ग्रामीण भागात बसेसची अवस्थाही अतिशय दयनीय झाली आहे. एक बस गेल्यावर दुसरी बस येण्यासाठी तासंतास वाट पहावी लागते. अनेकदा वाहक व चालक प्रवाशांशी, विद्यार्थ्यांशी असभ्य वर्तवणूक करतात. गत काही महिन्यात अशा तक्रारी वाढल्या आहेत. या योजनेचा फज्जाच उडाल्याने याकडे लोक प्रतिनिधीनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. शासनानेही याची दखल दखल घेवून, गाव तिथे प्रवासी निवारो व्हावे अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)