शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
6
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
7
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
8
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
9
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
10
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
11
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
12
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
13
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
14
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
15
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
16
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
17
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
18
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
19
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
20
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले

ग्राहकांच्या उत्तम सेवेसाठी पहिल्यांदाच अभियंत्यांचा एल्गार

By admin | Updated: September 21, 2015 01:53 IST

महावितरणच्या वर्धा विभागात सुमारे दीड लाख ग्राहक आहेत.

मागण्यांकडे दुर्लक्ष : साहित्य, मनुष्यबळ पुरविण्यास असमर्थतावर्धा : महावितरणच्या वर्धा विभागात सुमारे दीड लाख ग्राहक आहेत. या ग्राहकांना सेवा देताना अभियंत्यांची दमछाक होते. अपूऱ्या व्यवस्थेमध्ये ही सेवा प्रदान करावी लागत असल्याने अडचणीचे ठरते. महावितरणकडून अभियंत्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जाते. यामुळे आता अभियंत्यांनीच महावितरणविरूद्ध एल्गार पुकारला आहे. ग्राहकांना उत्तम सेवा प्रदान करण्याकरिता बहुदा पहिल्यांदाच अभियंते आंदोलनाची तयारी करताना दिसताहेत.महावितरणचे वर्धा विभागात वर्धा, सेलू व देवळी असे तीन तालुके आहेत. या तीन तालुक्यांमधील सुमारे दीड लाख ग्राहकांना सेवा दिली जाते. महावितरणचे हे जाळे जुने असून जीर्ण झाले आहे. त्यातही नियमित सुव्यवस्था न झाल्याने ग्राहकांना सेवा पुरविणे कठीण झाले आहे. याबाबत प्रशासनाला मागणी करूनही विद्युत लाईनची सुव्यवस्था करण्यासाठी योग्य उपाययोजना केल्या जात नाही. तोकडे साहित्य उपलब्ध करून दिले जाते. यामुळे ग्राहकांना अखंडित विद्युत पुरवठा व उत्तम सेवा देणे अशक्य झाले आहे. अनियमित व खंडित वीज पुरवठ्यामुळे ग्राहकांचा रोष मात्र विभागीय तथा उपविभागीय अभियंत्यांवरच असतो. अनेकदा अभियंत्यांना शिवीगाळ व धक्काबुक्कीच्या प्रकारांनाही सामोरे जावे लागते. महावितरणने साहित्य व मनुष्यबळ पुरविल्यास लाईनची दुरूस्ती करून ग्राहकांना अखंडित सेवा देणे शक्य आहे; पण त्याकडे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करतात. महावितरणने योग्य साहित्य व मनुष्यबळ पुरवावे, या मागणीसाठी सबआॅर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन वर्धा यांनी एल्गार पुकारला आहे. महावितरणच्या इतिहासात पहिल्यांदाच ग्राहकांच्या उत्तम सेवेसाठी अभियंते आंदोलनाच्या तयारीत आहेत. याबाबत कार्यकारी अभियंत्यांना नोटीसही देण्यात आली आहे. शिवाय वर्धा विभागातील सुमारे ४० अभियंत्यानी साखळी उपोषण करण्याचाही निर्णय घेतला आहे. सध्या वर्धा विभागात हे आंदोलन होत असून कारवाई न झाल्यास सर्वच विभागात होणार आहे. ग्राहकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणारे महावितरण अभियंत्यांच्या आंदोलनाची दखल घेणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)