शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

आधी म्हणे पुस्तके परत घ्या, आता म्हणतात विद्यार्थ्यांकडेच असू द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 05:00 IST

शासनाच्या निर्देशाप्रमाणे यावर्षी त्या सर्व विद्यार्थ्यांसह पालकांना सूचना देऊन जुनी पाठ्यपुस्तके परत मागविली जात आहे. शिक्षण विभागाकडून आतापर्यंत या पाठ्यपुस्तकाचा नियमित आढावा घेतला जात असल्याने निम्यापेक्षा अधिक पालकांनी शाळेत येऊन पुस्तके परत केली आहे. इतकेच नाही तर नवीन शैक्षणिक सत्राला ऑनलाईन सुरुवात झाल्याने काही शाळांनी पहिल्या दिवशीपासून परत आलेली पुस्तके नवीन विद्यार्थ्यांना वितरितही केली आहे.

ठळक मुद्देशिक्षणाचा सावळागोंधळ : एक ना धड, भाराभर चिंध्या; अशीच अवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाकाळात शाळा बंद असतानाही शासनाकडून प्राप्त झालेल्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांकडून जुनी पाठ्यपुस्तके परत घेण्याचे काम सुरु आहे. शिक्षकांकडून दररोज पालकांना सूचना करुन पुस्तके परत मागितली जात आहे. आता शिक्षणमंत्र्यांनी ‘विद्यार्थ्यांकडे असलेली जुनी पुस्तके शाळेत जमा न करता सेतू अभ्यासक्रमाकरिता वापरावीत’, अशी घोषणा केली. त्यामुळे या सावळ्या गोंधळाने शिक्षकांचीही मोठी दमछाक होत असून सध्या शिक्षणाबाबत एक ना धड, भाराभर चिंध्या, अशीच अवस्था असल्याचे दिसून येत आहे.सर्व शिक्षा अभियान अंतर्गत पहिली ती आठवीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. दरवर्षी अभ्यासक्रम बदलत नसल्याने त्याच पुस्तकांचा पुनर्वापर करता येतो. म्हणून गेल्यावर्षी दिलेली पाठ्यपुस्तके यावर्षी परत घेऊन ती नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांना दिली जातात. गेल्या वर्षीपासून शाळा बंद असल्या तरीही विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्यात आले. शासनाच्या निर्देशाप्रमाणे यावर्षी त्या सर्व विद्यार्थ्यांसह पालकांना सूचना देऊन जुनी पाठ्यपुस्तके परत मागविली जात आहे. शिक्षण विभागाकडून आतापर्यंत या पाठ्यपुस्तकाचा नियमित आढावा घेतला जात असल्याने निम्यापेक्षा अधिक पालकांनी शाळेत येऊन पुस्तके परत केली आहे. इतकेच नाही तर नवीन शैक्षणिक सत्राला ऑनलाईन सुरुवात झाल्याने काही शाळांनी पहिल्या दिवशीपासून परत आलेली पुस्तके नवीन विद्यार्थ्यांना वितरितही केली आहे. मात्र, आता अचानक शिक्षणमंत्र्यांनी घोषणा करुन जुनी पाठ्यपुस्तके परत न घेता ती विद्यार्थ्यांकडेच राहू द्यावी, जेणेकरुन त्याचा वापर ते सेतू अभ्यासक्रमाकरिता करतील, असे निर्देश दिले. यामुळे शाळांचा गोंधळ उडाला आहे. आता शाळांना परत घेतलेली पुस्तके त्याच विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागणार आहे. आधी पुस्तके परत घेण्यासाठी तर आता तीच पुस्तके त्याच विद्यार्थ्यांना देण्यासाठी शिक्षकांना खटाटोप करावा लागणार आहे. अशा निर्णयातून शिक्षकांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरु असल्याची भावना व्यक्त होत आहे.

यापूर्वी शासनाकडून प्राप्त निर्देशानुसार आतापर्यंत विद्यार्थ्यांकडून पाठ्यपुस्तके जमा करणे सुरु आहे. त्याचा दररोज आढावा घेतला जात असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनेक शाळांमध्ये ५० टक्के पेक्षा अधिक पाठ्यपुस्तके जमा झाली आहे. आता विद्यार्थ्यांकडून पाठ्यपुस्तके जमा न करण्याची घोषणा शिक्षणमंत्र्यांनी केली. त्यामुळे सर्व स्तरावर गोंधळ उडाला असून कुणाचा पायपोस कुठे आहे तेच कळत नाही. आता पुन्हा जमा केलेली पाठ्यपुस्तके त्याच विद्यार्थ्यांना वितरित करण्यासाठी तीच यंत्रणा शिक्षकांना कामाला लावणार. शासन-प्रशासन स्तरावर पूर्ण विचारांती निर्णय होत नसल्याने शिक्षकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.विजय कोंबे, राज्य सरचिटणीस,   महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती 

आपत्ती काळात परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात. फार पूर्वी पाठ्यपुस्तक परत घेण्याच्या सूचना सर्व शाळांना दिल्या होत्या. पण, आता कोविडमुळे शाळा बंद असल्याने दोन दिवसांपूर्वी सेतू अभ्यासक्रमाबाबत निर्णय घेण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांकडील पुस्तके परत न घेता सेतू अभ्याक्रमाकरिता वापरावी, असे निर्देश दिल्याने लगेचच पुस्तके परत करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार आता शिक्षक विद्यार्थ्यांना पुस्तके परत करतील.संजय मेहरे, प्रभारी शिक्षणाधिकारी,  प्राथमिक, वर्धा 

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळा