शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
11
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
12
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
13
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
14
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
15
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
16
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
17
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
18
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
19
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
20
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक

आधी म्हणे पुस्तके परत घ्या, आता म्हणतात विद्यार्थ्यांकडेच असू द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 05:00 IST

शासनाच्या निर्देशाप्रमाणे यावर्षी त्या सर्व विद्यार्थ्यांसह पालकांना सूचना देऊन जुनी पाठ्यपुस्तके परत मागविली जात आहे. शिक्षण विभागाकडून आतापर्यंत या पाठ्यपुस्तकाचा नियमित आढावा घेतला जात असल्याने निम्यापेक्षा अधिक पालकांनी शाळेत येऊन पुस्तके परत केली आहे. इतकेच नाही तर नवीन शैक्षणिक सत्राला ऑनलाईन सुरुवात झाल्याने काही शाळांनी पहिल्या दिवशीपासून परत आलेली पुस्तके नवीन विद्यार्थ्यांना वितरितही केली आहे.

ठळक मुद्देशिक्षणाचा सावळागोंधळ : एक ना धड, भाराभर चिंध्या; अशीच अवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाकाळात शाळा बंद असतानाही शासनाकडून प्राप्त झालेल्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांकडून जुनी पाठ्यपुस्तके परत घेण्याचे काम सुरु आहे. शिक्षकांकडून दररोज पालकांना सूचना करुन पुस्तके परत मागितली जात आहे. आता शिक्षणमंत्र्यांनी ‘विद्यार्थ्यांकडे असलेली जुनी पुस्तके शाळेत जमा न करता सेतू अभ्यासक्रमाकरिता वापरावीत’, अशी घोषणा केली. त्यामुळे या सावळ्या गोंधळाने शिक्षकांचीही मोठी दमछाक होत असून सध्या शिक्षणाबाबत एक ना धड, भाराभर चिंध्या, अशीच अवस्था असल्याचे दिसून येत आहे.सर्व शिक्षा अभियान अंतर्गत पहिली ती आठवीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. दरवर्षी अभ्यासक्रम बदलत नसल्याने त्याच पुस्तकांचा पुनर्वापर करता येतो. म्हणून गेल्यावर्षी दिलेली पाठ्यपुस्तके यावर्षी परत घेऊन ती नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांना दिली जातात. गेल्या वर्षीपासून शाळा बंद असल्या तरीही विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्यात आले. शासनाच्या निर्देशाप्रमाणे यावर्षी त्या सर्व विद्यार्थ्यांसह पालकांना सूचना देऊन जुनी पाठ्यपुस्तके परत मागविली जात आहे. शिक्षण विभागाकडून आतापर्यंत या पाठ्यपुस्तकाचा नियमित आढावा घेतला जात असल्याने निम्यापेक्षा अधिक पालकांनी शाळेत येऊन पुस्तके परत केली आहे. इतकेच नाही तर नवीन शैक्षणिक सत्राला ऑनलाईन सुरुवात झाल्याने काही शाळांनी पहिल्या दिवशीपासून परत आलेली पुस्तके नवीन विद्यार्थ्यांना वितरितही केली आहे. मात्र, आता अचानक शिक्षणमंत्र्यांनी घोषणा करुन जुनी पाठ्यपुस्तके परत न घेता ती विद्यार्थ्यांकडेच राहू द्यावी, जेणेकरुन त्याचा वापर ते सेतू अभ्यासक्रमाकरिता करतील, असे निर्देश दिले. यामुळे शाळांचा गोंधळ उडाला आहे. आता शाळांना परत घेतलेली पुस्तके त्याच विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागणार आहे. आधी पुस्तके परत घेण्यासाठी तर आता तीच पुस्तके त्याच विद्यार्थ्यांना देण्यासाठी शिक्षकांना खटाटोप करावा लागणार आहे. अशा निर्णयातून शिक्षकांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरु असल्याची भावना व्यक्त होत आहे.

यापूर्वी शासनाकडून प्राप्त निर्देशानुसार आतापर्यंत विद्यार्थ्यांकडून पाठ्यपुस्तके जमा करणे सुरु आहे. त्याचा दररोज आढावा घेतला जात असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनेक शाळांमध्ये ५० टक्के पेक्षा अधिक पाठ्यपुस्तके जमा झाली आहे. आता विद्यार्थ्यांकडून पाठ्यपुस्तके जमा न करण्याची घोषणा शिक्षणमंत्र्यांनी केली. त्यामुळे सर्व स्तरावर गोंधळ उडाला असून कुणाचा पायपोस कुठे आहे तेच कळत नाही. आता पुन्हा जमा केलेली पाठ्यपुस्तके त्याच विद्यार्थ्यांना वितरित करण्यासाठी तीच यंत्रणा शिक्षकांना कामाला लावणार. शासन-प्रशासन स्तरावर पूर्ण विचारांती निर्णय होत नसल्याने शिक्षकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.विजय कोंबे, राज्य सरचिटणीस,   महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती 

आपत्ती काळात परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात. फार पूर्वी पाठ्यपुस्तक परत घेण्याच्या सूचना सर्व शाळांना दिल्या होत्या. पण, आता कोविडमुळे शाळा बंद असल्याने दोन दिवसांपूर्वी सेतू अभ्यासक्रमाबाबत निर्णय घेण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांकडील पुस्तके परत न घेता सेतू अभ्याक्रमाकरिता वापरावी, असे निर्देश दिल्याने लगेचच पुस्तके परत करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार आता शिक्षक विद्यार्थ्यांना पुस्तके परत करतील.संजय मेहरे, प्रभारी शिक्षणाधिकारी,  प्राथमिक, वर्धा 

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळा