शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या पेपरला ५११, दुसऱ्याला ५२६ विद्यार्थ्यांनी मारली दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 05:00 IST

परीक्षेकरिता जिल्ह्यातील पाचवीचे ४ हजार १० तर आठवीचे २ हजार ८२८ असे एकूण ६ हजार ९३८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. आज आठही तालुक्यातील ७४ परीक्षा केंद्रावरुन दोन पाळीत ही परीक्षा घेण्यात आली. कोरोनाच्या नियमांचे पालन करुन सर्व सोयी-सुविधा परीक्षा केंद्रावर पुरविण्यात आल्या होत्या. सकाळी ११ ते दुपारी १२.३० या वेळेत झालेल्या पहिल्या पेपरला पाचवीचे २९३ तर आठवीचे २१८ असे एकूण ५११ विद्यार्थी गैरहजर होते.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाची महामारी आणि पूरपरिस्थिमुळे तब्बल तिनदा पुढे ढकलण्यात आलेली पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीपरीक्षा आज जिल्ह्यातील ७४ केंद्रावर शांततेत पार पडली. दोन पाळीत घेण्यात आलेल्या या परीक्षेमध्ये पाचशेपेक्षा अधिक विद्यार्थी अनुपस्थित होते. या परीक्षेदरम्यान प्रत्येक केंद्रावर पोलिसांचीही सुरक्षा होती.महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेकरिता जिल्ह्यातील पाचवीचे ४ हजार १० तर आठवीचे २ हजार ८२८ असे एकूण ६ हजार ९३८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. आज आठही तालुक्यातील ७४ परीक्षा केंद्रावरुन दोन पाळीत ही परीक्षा घेण्यात आली. कोरोनाच्या नियमांचे पालन करुन सर्व सोयी-सुविधा परीक्षा केंद्रावर पुरविण्यात आल्या होत्या. सकाळी ११ ते दुपारी १२.३० या वेळेत झालेल्या पहिल्या पेपरला पाचवीचे २९३ तर आठवीचे २१८ असे एकूण ५११ विद्यार्थी गैरहजर होते. तर दुपारी १.३० ते ३.०० वाजेदरम्यान झालेल्या दुसऱ्या पेपरला पाचवीचे ३०२ तर आठवीचे २२४ असे ५२६ विद्यार्थी गैरहजर होते. पहिल्या पेपर पेक्षा दुसऱ्या पेपरला गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक होती. परीक्षा शांततेप पार पडावी याकरिता शिक्षण विभागाकडून दहा भरारी पथक नेमन्यात आले होते. या पथकांनी तालुकास्तरावरही भेटी देवून केंंद्रावरील परिस्थितींचा आढावा घेतला. सर्वच परीक्षा केंद्रावर शिष्यवृत्तीची परीक्षा सुरळीत पार पडली.

   स्वच्छतेचा अभाव- शिष्यवृत्ती परीक्षेकरिता वर्धा शहरातील न्यू इंग्लिश कॉन्व्हेटेही परीक्षा केंद्र होते. बऱ्याच दिवसांपासून शाळा बंद असल्याने वर्ग खोल्यांच्या स्वच्छतेअभावी जाळे लागलेले आहे. त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, अशी तक्रार पालकांनी लोकमतकडे केली. पण, स्वच्छतेचा विषय सोडला तर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती, असे निदर्शनास आले. 

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्तीexamपरीक्षा