शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

आगीत शेतीसाहित्याची राखरांगोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 22:18 IST

येथील भाऊराव खंडूजी पलकंडवार यांच्या वाई शिवारातील शेतात लोंबकळणाऱ्या वीजतारांच्या घर्षणामुळे लागलेल्या आगीत शेतातील ठिबक सिंचन संचातील संपूर्ण यंत्रे, नळ्या व ३ हजार वेळू जळून खाक झालेत. शेतकऱ्याचे अंदाजे ३ लाखांवर नुकसान झाले.

ठळक मुद्देतीन लाखांवर नुकसान : लोंबकळणाऱ्या वीजतारामुळे घडली घटना

लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : येथील भाऊराव खंडूजी पलकंडवार यांच्या वाई शिवारातील शेतात लोंबकळणाऱ्या वीजतारांच्या घर्षणामुळे लागलेल्या आगीत शेतातील ठिबक सिंचन संचातील संपूर्ण यंत्रे, नळ्या व ३ हजार वेळू जळून खाक झालेत. शेतकºयाचे अंदाजे ३ लाखांवर नुकसान झाले.भाऊराव पलकंडवार यांचे वाई शिवारात तीन एक शेत आहे. त्या शेतात त्यांनी ठिंबक सिंचन योजना घेतली होती. शेतातून जाणाऱ्या वीजतारा तंगावे नसल्याने बऱ्याच दिवसांपासून लोंबकळत होत्या. या तारांमुळे आग लागू शकते म्हणून शेतकऱ्याने वीज वितरण कंपनीच्या स्थानिक कार्यालयात अनेकदा तक्रार केली. मात्र, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कायम दुर्लक्ष केले. याचाच परिणाम लोंबकळणाऱ्या तारांमध्ये घर्षण होऊन शेतात ठिणगी पडली. त्यातून लागलेल्या आगीमुळे शेतातील ठिंबक सिंचनाचे संयंत्र शेतात पसरविण्यासाठी जमा करून ठेवलेल्या नळ्या, तारांचे बंडल, तुषार सिंचनाचा संच व तीन हजार वेळू जळाले.या घटनेत शेतकऱ्याचे अंदाजे ३ लाखांचे नुकसान झाले. शेतकऱ्याच्या तक्रारीकडे वीज वितरण कंपनीच्या अधिकारी-कर्मचाºयांनी वेळीच लक्ष दिले असते तर ही घटना टाळता आली असती, अशी परिसरातील शेतकऱ्यांची भावना आहे. घटनेविषयी वीज वितरण कंपनीकडे तक्रार करण्यात आल्यानंतर कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन घटनेचा पंचनामा केल्याच माहिती आहे. वीज वितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी, अशी शेतकºयांची मागणी आहे. घटनेची अधिक पाहणी करण्यासाठी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी पुन्हा येणार असल्याचे शेतकºयांनी सांगितले.

टॅग्स :fireआगelectricityवीज