शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
3
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
4
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
5
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
6
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
7
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
8
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
9
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
10
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
11
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
12
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
13
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
14
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
15
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
16
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
17
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
18
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
19
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
20
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा

वर्ध्यात गादी कारखान्याला भीषण आग; लाखोंचे साहित्य जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2022 16:44 IST

दररोजप्रमाणे दुकानात कामकाज सुरू असतानाच दुपारी १२ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. धूर निघू लागला, पाहता-पाहता आगीने रौद्ररुप धारण केल्याने आग दुकानात पसरली.

ठळक मुद्देमहादेवपुरा परिसरातील घटना शॉर्टसर्किटने आग लागल्याचा अंदाज

वर्धा : वाढत्या उन्हामुळे आगीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असतानाच शहरातील वर्दळीचा असलेल्या महादेवपुरा परिसरातील शिव गादी भंडार या गादी कारखान्याला सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत दुकानातील लाखो रुपयांचे साहित्य तसेच कापसाच्या गाठी जळून कोळसा झाल्या. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

चेतन गियानी यांच्या मालकीचे महादेवपुरा परिसरात शिव गादी भंडार आहे. या दुकानात गादी बनविण्यासह फर्निचरचे सर्व साहित्य बनविण्याचे काम केले जातात. दररोजप्रमाणे दुकानात कामकाज सुरू असतानाच दुपारी १२ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. धूर निघू लागला, पाहता-पाहता आगीने रौद्ररुप धारण केल्याने आग दुकानात पसरली. आगीचे लोळ उठताना दिसताच दुकानात काम करणाऱ्यांनी हाती येईल ते साहित्य बाहेर काढले. मात्र, आगीने अख्खे दुकानच कवेत घेतल्याने सर्व साहित्याचा कोळसा झाला. आगीमध्ये तळमजला तसेच पहिल्या माळ्यावरील साहित्य तसेच यंत्रसामग्री जळून खाक झाली.

अग्निशमन बंबाने केला पाण्याचा मारा

आगीचे लोळ उठताना दिसताच परिसरात एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ झाली. आगीची माहिती मिळताच नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत अग्निशमन बंबाच्या साहाय्याने आगीवर पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न केले. अखेर अथक परिश्रामानंतर आगीवर नियंत्रण मिळाले. मात्र, यात दुकानमालक गियानी यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

अडीच तास आग अन् साहित्याची राखरांगोळी

शिव गादी भंडार या दुकानात कापूस, रुई, गाद्या, क्राॅपलॉन, फोम, कापड, रुई तसेच फोमच्या गाद्या, घरातील सर्व इंटेरिअर डेकोरेशनकरिता वापरण्यात येणारे साहित्य, कापडी पडदे, कापड आदी साहित्य होते. आगीमध्ये सर्व साहित्य यंत्रासहित जळून राखरांगोळी झाली.

यापूर्वीही लागली होती दुकानाला आग

शिव गादी भंडार या दुकानाला यापूर्वीही आग लागल्याची घटना घडली होती. आतापर्यंत या दुकानाला आग लागल्याची ही तिसरी घटना असल्याचे परिसरातील नागरिकांकडून बोलल्या जात होते. मात्र, नेमकी उन्हाळ्यातच आग कशी लागते, असेही परिसरातील नागरिकातून बोलल्या जात होते हे विशेष.

१५ दिवसांपूर्वी रोहित्राने घेतला होता पेट

महादेवपुरा परिसरात असलेल्या शिव गादी भंडार या दुकानालगतच असलेल्या रोहित्राने पेट घेतल्याची घटना १५ दिवसांपूर्वी घडली होती. सुदैवाने कुणालाही हानी झाली नव्हती. अग्निशमन दलाच्या बंबाच्या सहाय्याने रोहित्रावर पाण्याचा मारा करून आग विझविण्यात आली होती. सोमवारी देखील रोहित्रावरून जाणारी वीज बंद करण्यात आली होती.

टॅग्स :fireआगwardha-acवर्धा