शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
4
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
5
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
6
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
7
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
8
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
9
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
10
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
11
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
12
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
13
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
14
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
15
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
16
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
17
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
18
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
19
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं

वृक्षारोपणावर भर, संवर्धन ‘बॅकफुट’वर

By admin | Updated: August 29, 2016 00:40 IST

निसर्गाचा समतोल ढासळत आहे. वाढते औद्योगिकीकरण आणि वृक्षतोड यामुळे प्रदूषण वाढत आहे.

अहवाल कागदोपत्रीच : रोहयोंतर्गत ९.४२ लाख रोपांची लागवड गौरव देशमुख वर्धानिसर्गाचा समतोल ढासळत आहे. वाढते औद्योगिकीकरण आणि वृक्षतोड यामुळे प्रदूषण वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊनच शासनाद्वारे शतकोटी वृक्ष लागवड उपक्रम हाती घेण्यात आला. शिवाय गावोगावी रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यासाठी आवाहन केले जाते; पण झाडे लावल्यानंतर त्यांच्या संवर्धनाकडे फारसे लक्ष दिले जात नाही, हे वास्तव आहे. उन्हाळा आला की, कोवळी झाडे करपत असल्याने वृक्ष लागवडीवरील खर्च व्यर्थ ठरत आहे. २०१२-१३ ते २०१५-१६ या तीन वर्षांतील आकडेवारी पाहता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायत, कृषी विभागामार्फत १०० टक्के वृक्ष लागवड करण्यात आली; पण संवर्धनाकडे दुर्लक्ष करण्यात आले. पावसाळ्यात वृक्ष लागवडीला उधान येते; पण उन्हाळा सुरू होताच वृक्षांचा विसर पडतो. त्या रोपट्यांचे संवर्धन करण्याची गरज कुणालाही वाटत नाही. प्रशासनाच्या बाबतीतही हिच बाब समोर येत आहे. वर्धा जिल्ह्यात २०१२ ते १५ दरम्यान ७ लाख २९ हजार ८९१ वृक्षांची लागवड करण्यात आली. यात २०१२-१३ मध्ये ७७ हजार २०४, २०१३-१४ मध्ये १ लाख ७३ हजार २२८ तर २०१४-१५ मध्ये २ लाख ९९ हजार ७ वृक्षांची लागवड करण्यात आली. मार्च २०१५ पर्यंत १ लाख ८० हजार ४५२ वृक्षांची लागवड झाली; पण यात किती झाडे जगली, किती करपली याबाबत नक्की माहिती उपलब्ध नाही. कागदोपत्री मात्र सर्व रोपटी जगल्याचीच नोेंद असल्याचे दिसू येत आहे. यावर्षी १ जुलै रोजी दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत यंत्रणानिहाय वृक्ष लागवड करण्यात आली. यात गटविकास अधिकारी पं.स. (सर्व) १ लाख ६५ हजार १६६, कार्यकारी अभियंता लघु सिंचन (वर्धा, हिंगणघाट, आर्वी) ४ हजार ५००, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जि.प. वर्धा २ हजार ३०, शिक्षण विभाग माध्य. १० हजार ३९६, शिक्षण विभाग प्राथमिक २५ हजार ७८, पशुसंवर्धन विभाग १ हजार ७९८, जिल्हा आरोग्य अधिकारी २ हजार ८०० तर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाद्वारे २०० वृक्षांची लागवड करण्यात आली. या जि.प. यंत्रणेनिहाय २ लाख १२ हजार २३८ वृक्षांची लागवड करण्यात आली; पण यापैकी १० टक्के रोपटी तरी जगतील काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्या वृक्षांच्या संवर्धनाकडे कितपत लक्ष दिले जाते, हा प्रश्नच असून याचा विचार होणे गरजेचे आहे.