शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

वृक्षारोपणावर भर, संवर्धन ‘बॅकफुट’वर

By admin | Updated: August 29, 2016 00:40 IST

निसर्गाचा समतोल ढासळत आहे. वाढते औद्योगिकीकरण आणि वृक्षतोड यामुळे प्रदूषण वाढत आहे.

अहवाल कागदोपत्रीच : रोहयोंतर्गत ९.४२ लाख रोपांची लागवड गौरव देशमुख वर्धानिसर्गाचा समतोल ढासळत आहे. वाढते औद्योगिकीकरण आणि वृक्षतोड यामुळे प्रदूषण वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊनच शासनाद्वारे शतकोटी वृक्ष लागवड उपक्रम हाती घेण्यात आला. शिवाय गावोगावी रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यासाठी आवाहन केले जाते; पण झाडे लावल्यानंतर त्यांच्या संवर्धनाकडे फारसे लक्ष दिले जात नाही, हे वास्तव आहे. उन्हाळा आला की, कोवळी झाडे करपत असल्याने वृक्ष लागवडीवरील खर्च व्यर्थ ठरत आहे. २०१२-१३ ते २०१५-१६ या तीन वर्षांतील आकडेवारी पाहता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायत, कृषी विभागामार्फत १०० टक्के वृक्ष लागवड करण्यात आली; पण संवर्धनाकडे दुर्लक्ष करण्यात आले. पावसाळ्यात वृक्ष लागवडीला उधान येते; पण उन्हाळा सुरू होताच वृक्षांचा विसर पडतो. त्या रोपट्यांचे संवर्धन करण्याची गरज कुणालाही वाटत नाही. प्रशासनाच्या बाबतीतही हिच बाब समोर येत आहे. वर्धा जिल्ह्यात २०१२ ते १५ दरम्यान ७ लाख २९ हजार ८९१ वृक्षांची लागवड करण्यात आली. यात २०१२-१३ मध्ये ७७ हजार २०४, २०१३-१४ मध्ये १ लाख ७३ हजार २२८ तर २०१४-१५ मध्ये २ लाख ९९ हजार ७ वृक्षांची लागवड करण्यात आली. मार्च २०१५ पर्यंत १ लाख ८० हजार ४५२ वृक्षांची लागवड झाली; पण यात किती झाडे जगली, किती करपली याबाबत नक्की माहिती उपलब्ध नाही. कागदोपत्री मात्र सर्व रोपटी जगल्याचीच नोेंद असल्याचे दिसू येत आहे. यावर्षी १ जुलै रोजी दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत यंत्रणानिहाय वृक्ष लागवड करण्यात आली. यात गटविकास अधिकारी पं.स. (सर्व) १ लाख ६५ हजार १६६, कार्यकारी अभियंता लघु सिंचन (वर्धा, हिंगणघाट, आर्वी) ४ हजार ५००, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जि.प. वर्धा २ हजार ३०, शिक्षण विभाग माध्य. १० हजार ३९६, शिक्षण विभाग प्राथमिक २५ हजार ७८, पशुसंवर्धन विभाग १ हजार ७९८, जिल्हा आरोग्य अधिकारी २ हजार ८०० तर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाद्वारे २०० वृक्षांची लागवड करण्यात आली. या जि.प. यंत्रणेनिहाय २ लाख १२ हजार २३८ वृक्षांची लागवड करण्यात आली; पण यापैकी १० टक्के रोपटी तरी जगतील काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्या वृक्षांच्या संवर्धनाकडे कितपत लक्ष दिले जाते, हा प्रश्नच असून याचा विचार होणे गरजेचे आहे.