शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षारोपणावर भर, संवर्धन ‘बॅकफुट’वर

By admin | Updated: August 29, 2016 00:40 IST

निसर्गाचा समतोल ढासळत आहे. वाढते औद्योगिकीकरण आणि वृक्षतोड यामुळे प्रदूषण वाढत आहे.

अहवाल कागदोपत्रीच : रोहयोंतर्गत ९.४२ लाख रोपांची लागवड गौरव देशमुख वर्धानिसर्गाचा समतोल ढासळत आहे. वाढते औद्योगिकीकरण आणि वृक्षतोड यामुळे प्रदूषण वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊनच शासनाद्वारे शतकोटी वृक्ष लागवड उपक्रम हाती घेण्यात आला. शिवाय गावोगावी रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यासाठी आवाहन केले जाते; पण झाडे लावल्यानंतर त्यांच्या संवर्धनाकडे फारसे लक्ष दिले जात नाही, हे वास्तव आहे. उन्हाळा आला की, कोवळी झाडे करपत असल्याने वृक्ष लागवडीवरील खर्च व्यर्थ ठरत आहे. २०१२-१३ ते २०१५-१६ या तीन वर्षांतील आकडेवारी पाहता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायत, कृषी विभागामार्फत १०० टक्के वृक्ष लागवड करण्यात आली; पण संवर्धनाकडे दुर्लक्ष करण्यात आले. पावसाळ्यात वृक्ष लागवडीला उधान येते; पण उन्हाळा सुरू होताच वृक्षांचा विसर पडतो. त्या रोपट्यांचे संवर्धन करण्याची गरज कुणालाही वाटत नाही. प्रशासनाच्या बाबतीतही हिच बाब समोर येत आहे. वर्धा जिल्ह्यात २०१२ ते १५ दरम्यान ७ लाख २९ हजार ८९१ वृक्षांची लागवड करण्यात आली. यात २०१२-१३ मध्ये ७७ हजार २०४, २०१३-१४ मध्ये १ लाख ७३ हजार २२८ तर २०१४-१५ मध्ये २ लाख ९९ हजार ७ वृक्षांची लागवड करण्यात आली. मार्च २०१५ पर्यंत १ लाख ८० हजार ४५२ वृक्षांची लागवड झाली; पण यात किती झाडे जगली, किती करपली याबाबत नक्की माहिती उपलब्ध नाही. कागदोपत्री मात्र सर्व रोपटी जगल्याचीच नोेंद असल्याचे दिसू येत आहे. यावर्षी १ जुलै रोजी दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत यंत्रणानिहाय वृक्ष लागवड करण्यात आली. यात गटविकास अधिकारी पं.स. (सर्व) १ लाख ६५ हजार १६६, कार्यकारी अभियंता लघु सिंचन (वर्धा, हिंगणघाट, आर्वी) ४ हजार ५००, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जि.प. वर्धा २ हजार ३०, शिक्षण विभाग माध्य. १० हजार ३९६, शिक्षण विभाग प्राथमिक २५ हजार ७८, पशुसंवर्धन विभाग १ हजार ७९८, जिल्हा आरोग्य अधिकारी २ हजार ८०० तर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाद्वारे २०० वृक्षांची लागवड करण्यात आली. या जि.प. यंत्रणेनिहाय २ लाख १२ हजार २३८ वृक्षांची लागवड करण्यात आली; पण यापैकी १० टक्के रोपटी तरी जगतील काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्या वृक्षांच्या संवर्धनाकडे कितपत लक्ष दिले जाते, हा प्रश्नच असून याचा विचार होणे गरजेचे आहे.