शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांची रिक्त पदे भरा

By admin | Updated: September 10, 2015 02:46 IST

शहरातील वाहतूक पोलिसांची पदे रिक्त आहेत. यामुळे वाहतुकीच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे.

हिंगणघाट : शहरातील वाहतूक पोलिसांची पदे रिक्त आहेत. यामुळे वाहतुकीच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. शहरातील वाढती लोकसंख्या, वाहनांच्या संख्येत झालेली भरमसाठ वाढ व अपूरा वाहतूक पोलीस कर्मचारी वर्ग यामुळे पोलीस यंत्रणेवर अतिरिक्त ताण येत आहे. शिवाय सामान्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागतो. यासाठी शासनाने पोलीस विभागातील वाहतूक पोलिसांची रिक्त पदे त्वरित भरावीत, अशी मागणी जिल्हा लोकजनशक्ती पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.शासनाला दिलेल्या निवेदनातून तिमांडे यांनी हिंगणघाट शहराची लोकसंख्या ही जवळपास सव्वा लाख आहे. शहरी आणि ग्रामीण जनतेची मुख्य बाजारपेठ असून विदर्भातील क्रमांक दोनची कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ व राष्ट्रीय रेल्वे मुख्य महामार्गावर हे शहर वसले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. उपजिल्हा रुग्णालय, विविध महत्त्वाची शासकीय कार्यालये, दिवाणी आणि फौजदारी न्यायालये येथे आहेत. विविध राष्ट्रीयकृत बँका असून हिंगणघाट शहराची औद्योगिक नगरी म्हणून ओळख आहे. विविध कंपन्या शहर व परिसरात आहे. यामुळे वाढत्या वाहनांची वर्दळ आणि लोकसंख्या यांच्या तुलनेत पोलीस कर्मचारी वर्ग अपूरा आहे. परिणामी, मुख्य रस्ता, चौरस्ता, शासकीय कार्यालये, बाजारपेठ आदी परिसरातील वाहतुकीची समस्या जटील होत असल्याचे दिसून येत आहे. ही वाहतूक सांभाळण्याचा अतिरिक्त ताण अपूऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत असल्याचे दिसते. पोलिसांच्या कमतरतेमुळे वाहतुकीची समस्या पोलीस यंत्रणेपूढे एक आव्हानच ठरत आहे. राज्याच्या गृह विभागाने याची गांभिर्याने दखल घेणे गरजेचे झाले आहे. राज्यात आज लोकसंख्येच्या प्रमाणात कर्मचारी कमी पडत आहेत. हजारो पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. यामुळे शासनाने प्राधान्याने ही पदे भरणे गरजेचे झाले आहे. याबाबत शासनाने योग्य ती सकारात्मक भूमिका घेऊन किमान हिंगणघाट शहरातील पोलिसांची रिक्त पदे त्वरित भरावीत, अशी न्याय्य मागणी जिल्हा लोकजनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष संतोष तिमांडे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष राजश्री दुब्बावार, केशव तितरे, राजेंद्र मुनोत, सुभाष मिसाळे, मोरेश्वर पिंपळशेंडे, चुडीवाले, कावळे, याकुब, चंपत बावणे, गोविंदा दांडेकर, गोविंदा गायकवाड आदींनी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना सादर निवेदनातून केली आहे.(तालुका प्रतिनिधी)