शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
5
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
6
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
7
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
8
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
9
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
10
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
11
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
12
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
13
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
14
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
15
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
16
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
17
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
18
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
19
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
20
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!

वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांची रिक्त पदे भरा

By admin | Updated: September 10, 2015 02:46 IST

शहरातील वाहतूक पोलिसांची पदे रिक्त आहेत. यामुळे वाहतुकीच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे.

हिंगणघाट : शहरातील वाहतूक पोलिसांची पदे रिक्त आहेत. यामुळे वाहतुकीच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. शहरातील वाढती लोकसंख्या, वाहनांच्या संख्येत झालेली भरमसाठ वाढ व अपूरा वाहतूक पोलीस कर्मचारी वर्ग यामुळे पोलीस यंत्रणेवर अतिरिक्त ताण येत आहे. शिवाय सामान्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागतो. यासाठी शासनाने पोलीस विभागातील वाहतूक पोलिसांची रिक्त पदे त्वरित भरावीत, अशी मागणी जिल्हा लोकजनशक्ती पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.शासनाला दिलेल्या निवेदनातून तिमांडे यांनी हिंगणघाट शहराची लोकसंख्या ही जवळपास सव्वा लाख आहे. शहरी आणि ग्रामीण जनतेची मुख्य बाजारपेठ असून विदर्भातील क्रमांक दोनची कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ व राष्ट्रीय रेल्वे मुख्य महामार्गावर हे शहर वसले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. उपजिल्हा रुग्णालय, विविध महत्त्वाची शासकीय कार्यालये, दिवाणी आणि फौजदारी न्यायालये येथे आहेत. विविध राष्ट्रीयकृत बँका असून हिंगणघाट शहराची औद्योगिक नगरी म्हणून ओळख आहे. विविध कंपन्या शहर व परिसरात आहे. यामुळे वाढत्या वाहनांची वर्दळ आणि लोकसंख्या यांच्या तुलनेत पोलीस कर्मचारी वर्ग अपूरा आहे. परिणामी, मुख्य रस्ता, चौरस्ता, शासकीय कार्यालये, बाजारपेठ आदी परिसरातील वाहतुकीची समस्या जटील होत असल्याचे दिसून येत आहे. ही वाहतूक सांभाळण्याचा अतिरिक्त ताण अपूऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत असल्याचे दिसते. पोलिसांच्या कमतरतेमुळे वाहतुकीची समस्या पोलीस यंत्रणेपूढे एक आव्हानच ठरत आहे. राज्याच्या गृह विभागाने याची गांभिर्याने दखल घेणे गरजेचे झाले आहे. राज्यात आज लोकसंख्येच्या प्रमाणात कर्मचारी कमी पडत आहेत. हजारो पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. यामुळे शासनाने प्राधान्याने ही पदे भरणे गरजेचे झाले आहे. याबाबत शासनाने योग्य ती सकारात्मक भूमिका घेऊन किमान हिंगणघाट शहरातील पोलिसांची रिक्त पदे त्वरित भरावीत, अशी न्याय्य मागणी जिल्हा लोकजनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष संतोष तिमांडे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष राजश्री दुब्बावार, केशव तितरे, राजेंद्र मुनोत, सुभाष मिसाळे, मोरेश्वर पिंपळशेंडे, चुडीवाले, कावळे, याकुब, चंपत बावणे, गोविंदा दांडेकर, गोविंदा गायकवाड आदींनी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना सादर निवेदनातून केली आहे.(तालुका प्रतिनिधी)