शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
3
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
4
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
5
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
6
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
7
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
8
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
9
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
10
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
11
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
12
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
13
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
14
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
15
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
16
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
17
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
18
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
19
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
20
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?

वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांची रिक्त पदे भरा

By admin | Updated: September 10, 2015 02:46 IST

शहरातील वाहतूक पोलिसांची पदे रिक्त आहेत. यामुळे वाहतुकीच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे.

हिंगणघाट : शहरातील वाहतूक पोलिसांची पदे रिक्त आहेत. यामुळे वाहतुकीच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. शहरातील वाढती लोकसंख्या, वाहनांच्या संख्येत झालेली भरमसाठ वाढ व अपूरा वाहतूक पोलीस कर्मचारी वर्ग यामुळे पोलीस यंत्रणेवर अतिरिक्त ताण येत आहे. शिवाय सामान्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागतो. यासाठी शासनाने पोलीस विभागातील वाहतूक पोलिसांची रिक्त पदे त्वरित भरावीत, अशी मागणी जिल्हा लोकजनशक्ती पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.शासनाला दिलेल्या निवेदनातून तिमांडे यांनी हिंगणघाट शहराची लोकसंख्या ही जवळपास सव्वा लाख आहे. शहरी आणि ग्रामीण जनतेची मुख्य बाजारपेठ असून विदर्भातील क्रमांक दोनची कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ व राष्ट्रीय रेल्वे मुख्य महामार्गावर हे शहर वसले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. उपजिल्हा रुग्णालय, विविध महत्त्वाची शासकीय कार्यालये, दिवाणी आणि फौजदारी न्यायालये येथे आहेत. विविध राष्ट्रीयकृत बँका असून हिंगणघाट शहराची औद्योगिक नगरी म्हणून ओळख आहे. विविध कंपन्या शहर व परिसरात आहे. यामुळे वाढत्या वाहनांची वर्दळ आणि लोकसंख्या यांच्या तुलनेत पोलीस कर्मचारी वर्ग अपूरा आहे. परिणामी, मुख्य रस्ता, चौरस्ता, शासकीय कार्यालये, बाजारपेठ आदी परिसरातील वाहतुकीची समस्या जटील होत असल्याचे दिसून येत आहे. ही वाहतूक सांभाळण्याचा अतिरिक्त ताण अपूऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत असल्याचे दिसते. पोलिसांच्या कमतरतेमुळे वाहतुकीची समस्या पोलीस यंत्रणेपूढे एक आव्हानच ठरत आहे. राज्याच्या गृह विभागाने याची गांभिर्याने दखल घेणे गरजेचे झाले आहे. राज्यात आज लोकसंख्येच्या प्रमाणात कर्मचारी कमी पडत आहेत. हजारो पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. यामुळे शासनाने प्राधान्याने ही पदे भरणे गरजेचे झाले आहे. याबाबत शासनाने योग्य ती सकारात्मक भूमिका घेऊन किमान हिंगणघाट शहरातील पोलिसांची रिक्त पदे त्वरित भरावीत, अशी न्याय्य मागणी जिल्हा लोकजनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष संतोष तिमांडे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष राजश्री दुब्बावार, केशव तितरे, राजेंद्र मुनोत, सुभाष मिसाळे, मोरेश्वर पिंपळशेंडे, चुडीवाले, कावळे, याकुब, चंपत बावणे, गोविंदा दांडेकर, गोविंदा गायकवाड आदींनी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना सादर निवेदनातून केली आहे.(तालुका प्रतिनिधी)