शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
थायलंडमध्ये भारतीय पर्यटकांचे लाजिरवाने कृत्य; मौजमजेसाठी बारगर्ल बोलविली आणि तिच्या शरीरावरच घेतला आक्षेप...
3
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
4
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
5
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
6
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
7
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
8
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
9
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
10
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
11
विघ्नहर्ता, प्रवासाचे विघ्न दूर करशील का? गणपती विशेष गाड्या पहिल्या मिनिटालाच फुल्ल
12
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
13
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
14
‘स्लिपिंग प्रिन्स’ला कधीच जाग येणार नाही! सौदीच्या 'झोपलेल्या राजकुमारा'चा प्रवास थांबला
15
कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?
16
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
17
स्विगी-झोमॅटो : ‘गिग’ कामगारांना हवी कायद्याची सुरक्षा
18
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल
20
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 

वाघोडा गावात तहसीलदार दाखल

By admin | Updated: July 20, 2015 02:05 IST

तालुक्यातील वाघोडा गावातील शेतकऱ्यांनी आत्महत्येची परवानगी द्या, नाहीतर आमचे गाव विकत घ्या, अशी भूमिका जाहीर केली.

गावकऱ्यांशी चर्चा : अहवाल तयार करणारकारंजा (घाडगे) : तालुक्यातील वाघोडा गावातील शेतकऱ्यांनी आत्महत्येची परवानगी द्या, नाहीतर आमचे गाव विकत घ्या, अशी भूमिका जाहीर केली. त्यांच्या या भूमिकेची दखल घेत तहसीलदार जी. बालपांडे यांच्यासह तालुका कृषी अधिकारी महंत व त्यांचे सहकारी रविवारी गावाला दाखल झाले. त्यांनी गावकऱ्यांशी चर्चा करून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले. या भागातील जमिनी हलक्या प्रतिच्या आहेत. अशात पावसाने दडी मारल्याने पिकांची स्थिती ढासळली आहे. यामुळे शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे, असा अहवाल तयार करून तो जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येईल. त्यानंतर काय तो निर्णय घेण्यात येणार असल्याचे बालपांडे यांनी गावकऱ्यांना सांगितले. मृग नक्षत्रात दोन ते तीन दिवस पाऊस पडला. यात शेतकऱ्यांनी पेरणी केली. पिकाची उगवण न झाल्याने दुबार पेरणी करावी लागली. त्यानंतर २८ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. आता पाऊस न आल्यामुळे कर्जाचा डोंगर वाढणार. यामुळे जगणे कठीण होण्याची वेळ आली आहे. अशात शासनही पाठीशी नाही, असे म्हणत गावकऱ्यांनी आंदोलन पुकारले. त्यांच्या आंदोलनाची दखल घेत आज अधिकारी गावात आले. मात्र विभागाच्या लोकप्रतिनिधींनी अद्यापही गावाला भेट दिली नसल्याने रोष व्यक्त होत आहे. (शहर प्रतिनिधी)