शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बोगस बियाणे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 23:23 IST

गत खरीपात बीटी कपाशीवर आलेल्या बोंडअळीने सर्वांना जेरीस आणले. यामुळे यंदा बीटी बियाणे खरेदी करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाकडून सावधानतेचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गत खरीपात बीटी कपाशीवर आलेल्या बोंडअळीने सर्वांना जेरीस आणले. यामुळे यंदा बीटी बियाणे खरेदी करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कृषी विभागाने केलेल्या सर्व्हेनुसार बाजारात बोगस बीटी बियाणे दाखल झाले आहेत. ते महाशक्ती आर.आर. किंवा बी.जी.-३ या नावाने विकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा बोगस बियाण्यांपासून शेतकऱ्यांना सावध राहण्याचे आवाहन जिल्हा कृषी विकास अधिकाऱ्यांनी केली आहे.कोणत्याही प्रकारची चाचणी न होता, असे बियाणे बाजारात आलेले असते. त्यामुळे अशा बियाण्यापासून शेतकऱ्यांचे नुकसान होते. अशा अनधिकृत बियाण्याचे कोणतेही देयक किंवा परवाना नसतो. त्यामुळे शेतकºयांना अशा बोगस बियाण्यामुळे नुकसान झाल्यास कोणतीही नुकसान भरपाई शासनामार्फत देण्यात येत नाही.शेतकºयांनी बियाणे खरेदी करताना अधिकृत परवाना असणाºया कृषी सेवा केंद्रातूनच बियाणे खरेदी करावे. खरेदी करताना खरेदीची पावती, पिशवी, टँग इत्यादी जपून ठेवावे. पॉकिटावर लॉट नंबर, अंतिम मुदत, उगवन शक्ती इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात. बियाणे योग्य असल्याबाबत खात्री करावी. बोगस बियाणे विक्री करीत असल्याची माहिती मिळताच कृषी विभागाशी संपर्क साधावा असे जिल्हा कृषी विकास अधिकाऱ्यांनी कळविले आहे.शेतकऱ्यांनी रासायनिक खते व बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजीशेतकऱ्यांनी रासायनिक खत, बियाणे व किटकनाशक खरेदी करताना फसवणूक होऊ नये यासाठी शासन मान्यता कृषी निविष्ठाचा विक्री परवाना असलेल्या कृषी केंद्रातूनच रासायनिक खते, बियाणे व किटकनाशके खरेदी करावी, असे आवाहन जिल्हा कृषी विकास अधिकारी यांनी केले आहे.बोगस व बेकायदेशीर बियाणे म्हणजे काय ?ज्या बियाण्याच्या उत्पादनास व विक्रीस शासनाची परवानगी नसणे, बियाण्याचे उत्पन्नासंबंधी खोटे दावे करून शेतकऱ्यांना आमिष दाखविण्यात येते. बियाण्यांच्या व्यवहारामध्ये शासनमान्य दराने बिल शेतकऱ्यास दिले जात नाही. बियाण्याच्या पाकिटावर बियाण्याच्या गुणवत्तेचा तपशील व कोणत्याही तंत्रज्ञानाचा उल्लेख नसतो. बियाण्याच्या परीक्षणापूर्व वापरामुळे जमिनीवर तथा पर्यावरणावर विपरीत परिणाम होऊ शकतो. अशा अनधिकृत बियाण्याच्या वापरामुळे जर शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले तर त्यासाठी नुकसान भरपाईची हमी शासन वा ग्राहक मंचसुद्धा घेऊ शकत नाही.खरेदी करताना घेण्याच्या काळजीसंदर्भात कृषी अधिकाऱ्यांचे निर्देशकुठलेही रासायनिक खत, बियाणे व किटकनाशक अधिकृत व परवानाधारक विक्रेत्याकडूनच खरेदी करावे. खरेदी करताना पक्क्याबिलाचा आग्रह करावा. पक्के बिल देण्यास नकार दिल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा तक्रार नोंदवाावी. बिलावरखरेदी केलेल्या बियाण्याच्या गुणवत्तेचा संपूर्ण तपशील नोंदविलेला आहे किंवा नाही याची खात्री करावी. खरेदी केलेल्या बियाण्याचे पाकिट सिलबंद, माहोरबंद तथा लेबलसह असल्याची खात्री करावी. बियाणे उगवण क्षमतेची अंतीम तारीख पाहूनच पाकीट व बॅग खरेदी करावी. बियाणे उत्पादित किमतीपेक्षा जास्त किमतीने विक्री करीत आढळल्यास त्वरीत दाखल करावी. सध्यास्थितीत जिल्ह्यामध्ये सर्व प्रकारचे बियाणे व खते मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी विशिष्ट वाणांचा तुटवडा असल्याचा अफवांवर विश्वास ठेऊ नये. कोणत्याही अपप्रचावर विश्वास न ठेवता परवानाधारक विक्रेत्यांकडूनच कृषी निविष्ठा खरेदी कराव्यात.