शहरं
Join us  
Trending Stories
1
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
2
खळबळजनक! नांदेडमध्ये मशीन गनचे ३९१ राऊंड कालव्यात सापडले
3
Exit Poll : कंगना राणौत की विक्रमादित्य सिंह... कोण मारणार बाजी?; जाणून घ्या, मंडीचा एक्झिट पोल
4
दोन राज्यांत मतमोजणी, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची मुसंडी, तर सिक्कीममध्ये SKM निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने 
5
T20 WC, USA vs CAN: यजमानांचा दबदबा! १० सिक्स आणि ४ फोर; एकट्या 'जोन्स'ने कॅनडाला घाम फोडला
6
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
7
आयकर विभागाचा मोठा छापा; हवाला व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांकडून २५ कोटींची रोकड, हिरे, सोनं जप्त
8
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
9
सातवा टप्पाही पूर्ण; निकालाची प्रतीक्षा; ८,३६० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद
10
'मी केदारनाथला गेल्यावर..'; सुशांतच्या बहिणीची भावूक पोस्ट, फोटो शेअर करत सांगितलं खास कनेक्शन
11
किती खरे आणि किती खोटे ठरले यापूर्वीचे ‘एक्झिट पाेल’?, मतदानानंतर सर्वांचे असते याकडे लक्ष
12
T20 WC 2024: ऑस्ट्रेलिया नाही! पण भारत फायनल खेळणार; 'युवी'ने सांगितला खेळ भावनांचा
13
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
14
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
15
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
17
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
18
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
19
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 
20
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली

पशुगणनेत वर्धा जिल्हा राज्यात पाचव्या स्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 12:01 AM

प्रत्येक पाच वर्षांनी पशुगणना होणे क्रमप्राप्त असून रखडलेली २० वी पशुगणना पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न होत आहेत. या पशुगणना प्रक्रियेत वर्धा जिल्हा राज्यात पाचव्या स्थानी आहे. इतकेच नव्हे तर वर्धा जिल्ह्यात ६२.६१ टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे.

ठळक मुद्देमार्च अखेरपर्यंत करावा लागेल अहवाल सादर । टॅबद्वारे नोंद घेण्याचे ६२.६१ टक्के झाले काम

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : प्रत्येक पाच वर्षांनी पशुगणना होणे क्रमप्राप्त असून रखडलेली २० वी पशुगणना पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न होत आहेत. या पशुगणना प्रक्रियेत वर्धा जिल्हा राज्यात पाचव्या स्थानी आहे. इतकेच नव्हे तर वर्धा जिल्ह्यात ६२.६१ टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे.पशुगणना पूर्ण करण्याची अखेरची मुदत ३१ डिसेंबर होती. परंतु, विविध कारणांमुळे पशुगणनेचे काम पूर्ण न झाल्याने मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा नव्या जोमाने पशुगणनेच्या कामाला गती देण्यात आली. वर्धा जिल्ह्यातील पशुंची गणना करण्यासाठी ११४ टॅब, पॉवर बँक व सिम उपलब्ध करून देण्यात आले आहे.इतकेच नव्हे तर टॅबमध्ये असलेले पूर्वीचे २.० अ‍ॅप वर्जन प्रत्यक्ष काम करण्यासाठी त्रासदायक असल्याने ३.० हे वर्जन टाकून पशुच्या गणनेच्या कामाला गती देण्यात आली. वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख ९ हजार ८४६ ठिकाणी भेटी देऊन टॅबद्वारे पशुची नोंद घेण्यात आली आहे. तर राज्यात प्रथम क्रमांवर गोंदिया, द्वितीय स्थानी अकोला, तृतीय स्थानी हिंगोली तर चतुर्थ स्थानी बुलढाणा जिल्हा असल्याचे सांगण्यात आले. सदर पशुगणना पूर्ण करून मार्च अखेरपर्यंत अहवाल सादर करावा लागणार आहे.मुंबई शेवटच्या स्थानी२० व्या पशुगणनेचे गोंदिया जिल्ह्याने ८७.८१ टक्के काम पूर्ण केले आहे. शिवाय हा जिल्हा सध्या प्रथम क्रमांकावर आहे. तर वर्धा जिल्ह्यात पशुच्या गणनेचे काम ग्रामीण भागात ७१.४२ तर शहरी भागात ४३.३७ टक्के झाले आहे. वर्धा जिल्ह्यात एकूण ६२.६१ टक्के काम झाल्याने वर्धा जिल्हा हा सध्या पशुगणनेच्या कामात राज्यात पाचव्या स्थानी आहे. तर २.३० टक्केच काम झाल्याने मुंबई शेवटून पहिल्या स्थानी असल्याचे सांगण्यात आले.